शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

वर्षभरात सरकार फेल, जाब विचारणार

By admin | Updated: December 3, 2015 03:33 IST

शेतकऱ्यांबाबत राज्य सरकारचे धोरण उदासीन आहे. शेतकरी कर्जमाफी, महागाई , शेतकरी, कामगार, महिला अत्याचार, वाढती गुन्हेगारी आदी सर्वच पातळीवर वर्षभरात सरकार अपयशी ठरले आहे.

अशोक चव्हाण : ८ डिसेंबरला विधानभवनावर मोर्चानागपूर : शेतकऱ्यांबाबत राज्य सरकारचे धोरण उदासीन आहे. शेतकरी कर्जमाफी, महागाई , शेतकरी, कामगार, महिला अत्याचार, वाढती गुन्हेगारी आदी सर्वच पातळीवर वर्षभरात सरकार अपयशी ठरले आहे. वर्षपूर्तीचे सोहळे साजरे करणाऱ्या सरकारला या सर्वबाबींचा अधिवेशनात व बाहेरही काँग्रेसतर्फे जाब विचारला जाईल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिला. एकूणच यंदाच्या हिवाळी अधिवेशनात सरकारची कोंडी करण्यासाठी कॉंग्रेसने जोर लावल्याचे दिसून येत आहे.खा. चव्हाण बुधवारी यांनी दिवसभर काँग्रेस पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मोर्चासंबंधातील तयारीचा आढावा घेतला. यानंतर रविभवन येथे पत्रकार परिषदेत चव्हाण म्हणाले, दुष्काळी भागात पाणी आणि चारा टंचाई आहे. यंदाच्या वर्षात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. काही शेतकऱ्यांवर तर इच्छामरण मागण्याची वेळ आली आहे. तरीदेखील राज्य शासनाने शेतकऱ्यांना मदत केलेली नाही. राज्यातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ८ डिसेंबर रोजी आपल्या नेतृत्त्वात विधिमंडळावर मोर्चा काढला जाईल. दीक्षाभूमी परिसरातून सकाळी ११ वाजता मोर्चा सुरू होईल . यात विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, माणिकराव ठाकरे यांच्यासह राज्यातील विविध भागातील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होतील. मागण्यांचे निवेदन सरकारला दिले जाईल. कापसाला प्रति क्विंटल ८ हजार भाव देण्यात यावा, सोयाबीन व संत्रा उत्पादकांना सरकारने मदत करावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली. डाळीचे वाढलेले भाव, पडलेल्या धाडी, त्यानंतर बाजारात विक्रीसाठी आलेली डाळ यात मोठा घोळ असल्याचा आरोप करीत अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी राजीनामा देण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे व जिल्हाध्यक्ष सुनिता गावंडे, प३देश सचिव रामकिशन ओझा प्रामुख्याने उपस्थित होते.