शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये फूट, फडणवीस-शिंदे एकाकी; पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
5
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
8
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
9
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
10
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
11
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
12
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
13
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
14
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
15
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
16
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   
19
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
20
Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!

वर्षभरात सरकार फेल, जाब विचारणार

By admin | Updated: December 3, 2015 03:33 IST

शेतकऱ्यांबाबत राज्य सरकारचे धोरण उदासीन आहे. शेतकरी कर्जमाफी, महागाई , शेतकरी, कामगार, महिला अत्याचार, वाढती गुन्हेगारी आदी सर्वच पातळीवर वर्षभरात सरकार अपयशी ठरले आहे.

अशोक चव्हाण : ८ डिसेंबरला विधानभवनावर मोर्चानागपूर : शेतकऱ्यांबाबत राज्य सरकारचे धोरण उदासीन आहे. शेतकरी कर्जमाफी, महागाई , शेतकरी, कामगार, महिला अत्याचार, वाढती गुन्हेगारी आदी सर्वच पातळीवर वर्षभरात सरकार अपयशी ठरले आहे. वर्षपूर्तीचे सोहळे साजरे करणाऱ्या सरकारला या सर्वबाबींचा अधिवेशनात व बाहेरही काँग्रेसतर्फे जाब विचारला जाईल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिला. एकूणच यंदाच्या हिवाळी अधिवेशनात सरकारची कोंडी करण्यासाठी कॉंग्रेसने जोर लावल्याचे दिसून येत आहे.खा. चव्हाण बुधवारी यांनी दिवसभर काँग्रेस पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मोर्चासंबंधातील तयारीचा आढावा घेतला. यानंतर रविभवन येथे पत्रकार परिषदेत चव्हाण म्हणाले, दुष्काळी भागात पाणी आणि चारा टंचाई आहे. यंदाच्या वर्षात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. काही शेतकऱ्यांवर तर इच्छामरण मागण्याची वेळ आली आहे. तरीदेखील राज्य शासनाने शेतकऱ्यांना मदत केलेली नाही. राज्यातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ८ डिसेंबर रोजी आपल्या नेतृत्त्वात विधिमंडळावर मोर्चा काढला जाईल. दीक्षाभूमी परिसरातून सकाळी ११ वाजता मोर्चा सुरू होईल . यात विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, माणिकराव ठाकरे यांच्यासह राज्यातील विविध भागातील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होतील. मागण्यांचे निवेदन सरकारला दिले जाईल. कापसाला प्रति क्विंटल ८ हजार भाव देण्यात यावा, सोयाबीन व संत्रा उत्पादकांना सरकारने मदत करावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली. डाळीचे वाढलेले भाव, पडलेल्या धाडी, त्यानंतर बाजारात विक्रीसाठी आलेली डाळ यात मोठा घोळ असल्याचा आरोप करीत अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी राजीनामा देण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे व जिल्हाध्यक्ष सुनिता गावंडे, प३देश सचिव रामकिशन ओझा प्रामुख्याने उपस्थित होते.