शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात सरकार फेल, जाब विचारणार

By admin | Updated: December 3, 2015 03:33 IST

शेतकऱ्यांबाबत राज्य सरकारचे धोरण उदासीन आहे. शेतकरी कर्जमाफी, महागाई , शेतकरी, कामगार, महिला अत्याचार, वाढती गुन्हेगारी आदी सर्वच पातळीवर वर्षभरात सरकार अपयशी ठरले आहे.

अशोक चव्हाण : ८ डिसेंबरला विधानभवनावर मोर्चानागपूर : शेतकऱ्यांबाबत राज्य सरकारचे धोरण उदासीन आहे. शेतकरी कर्जमाफी, महागाई , शेतकरी, कामगार, महिला अत्याचार, वाढती गुन्हेगारी आदी सर्वच पातळीवर वर्षभरात सरकार अपयशी ठरले आहे. वर्षपूर्तीचे सोहळे साजरे करणाऱ्या सरकारला या सर्वबाबींचा अधिवेशनात व बाहेरही काँग्रेसतर्फे जाब विचारला जाईल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिला. एकूणच यंदाच्या हिवाळी अधिवेशनात सरकारची कोंडी करण्यासाठी कॉंग्रेसने जोर लावल्याचे दिसून येत आहे.खा. चव्हाण बुधवारी यांनी दिवसभर काँग्रेस पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मोर्चासंबंधातील तयारीचा आढावा घेतला. यानंतर रविभवन येथे पत्रकार परिषदेत चव्हाण म्हणाले, दुष्काळी भागात पाणी आणि चारा टंचाई आहे. यंदाच्या वर्षात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. काही शेतकऱ्यांवर तर इच्छामरण मागण्याची वेळ आली आहे. तरीदेखील राज्य शासनाने शेतकऱ्यांना मदत केलेली नाही. राज्यातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ८ डिसेंबर रोजी आपल्या नेतृत्त्वात विधिमंडळावर मोर्चा काढला जाईल. दीक्षाभूमी परिसरातून सकाळी ११ वाजता मोर्चा सुरू होईल . यात विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, माणिकराव ठाकरे यांच्यासह राज्यातील विविध भागातील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होतील. मागण्यांचे निवेदन सरकारला दिले जाईल. कापसाला प्रति क्विंटल ८ हजार भाव देण्यात यावा, सोयाबीन व संत्रा उत्पादकांना सरकारने मदत करावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली. डाळीचे वाढलेले भाव, पडलेल्या धाडी, त्यानंतर बाजारात विक्रीसाठी आलेली डाळ यात मोठा घोळ असल्याचा आरोप करीत अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी राजीनामा देण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे व जिल्हाध्यक्ष सुनिता गावंडे, प३देश सचिव रामकिशन ओझा प्रामुख्याने उपस्थित होते.