शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

काही महिन्यातच प्रवासी निवाऱ्याचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:11 IST

उमरेड : प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, तसेच उन, वारा, पाऊस आणि नैसर्गिक संकटकालीन आपत्तीतून बचाव होण्यासाठी प्रत्येक गावातील बसथांब्यांवर ...

उमरेड : प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, तसेच उन, वारा, पाऊस आणि नैसर्गिक संकटकालीन आपत्तीतून बचाव होण्यासाठी प्रत्येक गावातील बसथांब्यांवर प्रवासी निवारा उभारला जातो. एकीकडे बऱ्याच वर्षांपासून प्रवासी निवारे अजूनही शाबूत आहेत तर दुसरीकडे नव्यानेच उभारण्यात आलेल्या प्रवासी निवाऱ्याचा काही महिन्यातच ‘बोजवारा’ उडाल्याने या प्रवासी निवाऱ्याच्या गुणवत्तेवर आता प्रश्न विचारले जात आहेत. उमरेड ते वरोरा या सिमेंट रस्त्यावर प्रवासी निवाऱ्याची दयनिय अवस्था झाली आहे.

उमरेड ते वरोरा या सिमेंट रस्त्याचे काम सध्या युद्धस्तरावर सुरू आहे. अशावेळी उमरेड ते मालेवाडा या १८ किलोमीटरच्या अंतरापर्यंत सुमारे १५ प्रवासी निवारे उभारण्यात आले आहेत. स्टेनलेस स्टिल आणि लोखंडी जाळीचा वापर करीत या प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम ठिकठिकाणी पूर्णत्त्वास आले. अशातच काही महिने उलटत नाही तोच वाहनाच्या एका धडकेत प्रवासी निवारा मोडकडीस आल्याचे चित्र दिसून येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बायपास चौकनजीक असलेल्या स्मारक समितीच्या कार्यालयालगत असलेल्या प्रवासी निवाऱ्याची झालेली ही अवस्था निवाऱ्याची गुणवत्ता आणि दर्जा यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे. काही गावांना प्रवासी निवारा उभारण्यात आला नाही. वगळण्यात आले, असा आरोपही होत असून, या कामाच्या संपूर्ण गुणवत्तेची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.