शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

काही महिन्यातच प्रवासी निवाऱ्याचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:11 IST

उमरेड : प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, तसेच उन, वारा, पाऊस आणि नैसर्गिक संकटकालीन आपत्तीतून बचाव होण्यासाठी प्रत्येक गावातील बसथांब्यांवर ...

उमरेड : प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, तसेच उन, वारा, पाऊस आणि नैसर्गिक संकटकालीन आपत्तीतून बचाव होण्यासाठी प्रत्येक गावातील बसथांब्यांवर प्रवासी निवारा उभारला जातो. एकीकडे बऱ्याच वर्षांपासून प्रवासी निवारे अजूनही शाबूत आहेत तर दुसरीकडे नव्यानेच उभारण्यात आलेल्या प्रवासी निवाऱ्याचा काही महिन्यातच ‘बोजवारा’ उडाल्याने या प्रवासी निवाऱ्याच्या गुणवत्तेवर आता प्रश्न विचारले जात आहेत. उमरेड ते वरोरा या सिमेंट रस्त्यावर प्रवासी निवाऱ्याची दयनिय अवस्था झाली आहे.

उमरेड ते वरोरा या सिमेंट रस्त्याचे काम सध्या युद्धस्तरावर सुरू आहे. अशावेळी उमरेड ते मालेवाडा या १८ किलोमीटरच्या अंतरापर्यंत सुमारे १५ प्रवासी निवारे उभारण्यात आले आहेत. स्टेनलेस स्टिल आणि लोखंडी जाळीचा वापर करीत या प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम ठिकठिकाणी पूर्णत्त्वास आले. अशातच काही महिने उलटत नाही तोच वाहनाच्या एका धडकेत प्रवासी निवारा मोडकडीस आल्याचे चित्र दिसून येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बायपास चौकनजीक असलेल्या स्मारक समितीच्या कार्यालयालगत असलेल्या प्रवासी निवाऱ्याची झालेली ही अवस्था निवाऱ्याची गुणवत्ता आणि दर्जा यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे. काही गावांना प्रवासी निवारा उभारण्यात आला नाही. वगळण्यात आले, असा आरोपही होत असून, या कामाच्या संपूर्ण गुणवत्तेची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.