शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीतील चार गावे संपर्काबाहेरच; हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2022 20:20 IST

Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला फटकारले. सरकारचे अधिकारी एसी रूममध्ये बसून केवळ चालढकल करीत आहेत, असे ताशेरेही ओढले.

ठळक मुद्देअधिकारी एसी रूममध्ये बसून चालढकल करीत असल्याचे ताशेरे

नागपूर : दिना धरणाच्या पाण्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील वेंगणूर, सुरगाव, अळंगेपल्ली व पडकाटोला ही चार गावे गेल्या जूनपासून संपर्काबाहेर आहेत. या गावांना संपर्कात आणण्याकरिता अद्याप काहीच ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. परिणामी, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला फटकारले. सरकारचे अधिकारी एसी रूममध्ये बसून केवळ चालढकल करीत आहेत, असे ताशेरेही ओढले.

ही गावे मुलचेरा तालुक्यात आहेत. गेल्या तारखेला न्यायालयाने या गावांना संपर्कात आणण्याकरिता चार आठवड्यांमध्ये तात्पुरते रस्ते, पूल व इतर आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्या, असा आदेश सरकारला दिला होता. पक्के रोड, पूल व इतर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली होती. परंतु, सरकारने संबंधित गावांना केवळ सात वेगवान नाव दिल्या. रस्ते व पूल बांधण्याविषयी काहीच केले नाही. त्यामुळे न्यायालयाने नाराजी व्यक्त केली व या गावांतील नागरिकांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, याकडे सरकारचे लक्ष वेधले. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व गोविंद सानप यांच्यासमक्ष सुनावणी झाली. या गावांतील आदिवासी नागरिकांनी गेल्या जूनमध्ये उच्च न्यायालयाला पत्र लिहून स्वत:च्या व्यथा सांगितल्या होत्या. त्यावरून न्यायालयाने यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. ॲड. रेणुका सिरपूरकर यांनी न्यायालय मित्र म्हणून कामकाज पाहिले.

आराखडा तयार करण्याचा आदेश

या चार गावांमध्ये आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी येत्या १६ नोव्हेंबरपर्यंत विकासकामांचा आरखडा व खर्चाचा प्रस्ताव तयार करा; तसेच तो आराखडा व प्रस्ताव सरकारला सादर करा, असा आदेशही उच्च न्यायालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय