शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

गडचिरोलीतील चार गावे संपर्काबाहेरच; हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2022 20:20 IST

Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला फटकारले. सरकारचे अधिकारी एसी रूममध्ये बसून केवळ चालढकल करीत आहेत, असे ताशेरेही ओढले.

ठळक मुद्देअधिकारी एसी रूममध्ये बसून चालढकल करीत असल्याचे ताशेरे

नागपूर : दिना धरणाच्या पाण्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील वेंगणूर, सुरगाव, अळंगेपल्ली व पडकाटोला ही चार गावे गेल्या जूनपासून संपर्काबाहेर आहेत. या गावांना संपर्कात आणण्याकरिता अद्याप काहीच ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. परिणामी, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला फटकारले. सरकारचे अधिकारी एसी रूममध्ये बसून केवळ चालढकल करीत आहेत, असे ताशेरेही ओढले.

ही गावे मुलचेरा तालुक्यात आहेत. गेल्या तारखेला न्यायालयाने या गावांना संपर्कात आणण्याकरिता चार आठवड्यांमध्ये तात्पुरते रस्ते, पूल व इतर आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्या, असा आदेश सरकारला दिला होता. पक्के रोड, पूल व इतर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली होती. परंतु, सरकारने संबंधित गावांना केवळ सात वेगवान नाव दिल्या. रस्ते व पूल बांधण्याविषयी काहीच केले नाही. त्यामुळे न्यायालयाने नाराजी व्यक्त केली व या गावांतील नागरिकांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, याकडे सरकारचे लक्ष वेधले. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व गोविंद सानप यांच्यासमक्ष सुनावणी झाली. या गावांतील आदिवासी नागरिकांनी गेल्या जूनमध्ये उच्च न्यायालयाला पत्र लिहून स्वत:च्या व्यथा सांगितल्या होत्या. त्यावरून न्यायालयाने यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. ॲड. रेणुका सिरपूरकर यांनी न्यायालय मित्र म्हणून कामकाज पाहिले.

आराखडा तयार करण्याचा आदेश

या चार गावांमध्ये आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी येत्या १६ नोव्हेंबरपर्यंत विकासकामांचा आरखडा व खर्चाचा प्रस्ताव तयार करा; तसेच तो आराखडा व प्रस्ताव सरकारला सादर करा, असा आदेशही उच्च न्यायालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय