शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

हिवाळ्यातील परदेशी पाहुणे लागले परतीला ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:09 IST

नागपूर : पक्ष्यांना काेणत्या देशाची सीमा थांबवू शकत नाही, असे म्हणतात. गेली चार-पाच महिने विदर्भातील नद्या, तलाव, पाणथळ जमिनी, ...

नागपूर : पक्ष्यांना काेणत्या देशाची सीमा थांबवू शकत नाही, असे म्हणतात. गेली चार-पाच महिने विदर्भातील नद्या, तलाव, पाणथळ जमिनी, शेतशिवार ज्यांच्या किलबिलाटाने फुलला हाेता, ते परदेशी पाहुणे आता परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. ऊन वाढू लागल्याने त्यांना आता थंड प्रदेशातील त्यांच्या घराची ओढ लागली असून, ते मार्गस्थ झाले आहेत. हिवाळी पाहुणे जात असले तरी उन्हाळ्यामध्ये येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांचे मात्र आगमन सुरू झाले आहे.

पावसाळा सुरू झाल्यानंतर युराेप, अमेरिका, रशिया, मंगाेलिया अशा देशातील वेगवेगळ्या प्रजातीचे पक्षी हजाराे किलाेमीटरचा प्रवास करीत आपल्या देशात आणि मजल-दरमजल करून विदर्भातही पाेहचत असतात. तलाव, पाणथळ जमिनी, शेतावर या पक्ष्यांची शाळा भरलेली असते. पावसाळा व पुढे हिवाळा असे चार-सहा महिने तरी त्यांचा मुक्काम येथे असताे. पक्षी अभ्यासक यादव तरटे पाटील यांच्यानुसार त्यांच्या मूळ अधिवासाकडे थंडी वाढत असल्याने ते आपल्याकडे माेर्चा वळवतात. यातील काही हिमालयातून व त्या पलीकडच्या देशातून येत असतात. वातावरणात गारवा राहत असल्याने त्यांना आकर्षण असते. यातील बहुतेक पक्षी केवळ उदर भरणाच्या गरजेपाेटी इकडे येतात, पण काही प्रजननाच्या दृष्टीनेही येतात. त्यामुळे अनेक पक्षी पिलांसह परतीच्या प्रवासाला लागले आहेत. मात्र त्याबराेबर उन्हाळी पक्ष्यांचेही आगमन हाेत आहे.

- परतीला लागलेले हिवाळी पक्षी

मोठी टिबुकली, राजहंस, काळा ढोक, कांड्या करकोचा, कलहंस, गजरा, परी, सरग बड्डा, सुंदर बटवा, चिमण शेंदऱ्या, शेंदूर बड्डा, ठिपकेदार गरु, निलय, कुलंग, सोन टिटवा, लहान वाळू टिटवा आदी पक्षी हजाराेच्या संख्येने परतीच्या मार्गाला लागले आहेत.

उन्हाळी पाहुणे आले

नदी टिटवी, राखी डोक्याची टिटवी, मोठा आर्ली आदी पक्ष्यांचे आगमन झाले आहे. याशिवाय आणखीही काही पक्ष्यांचे, मध्य आशिया, युराेप व हिमालयाच्या भागातून आगमन हाेणार आहे. उन्हाळ्यात येत असले तरी त्यांनाही पाणथळ जमिनीचाच आधार घ्यावा लागताे, हे विशेष.

हिवाळ्यात आलेल्या स्थलांतरित पक्ष्यांच्या परतीची सुरुवात झाली आहे. युरोप, मध्य आशिया, युरेशिया, मंगोलिया आदी भागातून येणारे हे विदेशी पक्षी पर्यावरण संतुलनात महत्त्वाची भूमिका बजावतात. ऊन वाढू लागल्याने ते आता त्यांच्या मायदेशी परत जात आहेत.

- यादव तरटे पाटील, सदस्य - राज्य वन्यजीव मंडळ