शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणातूनच मिळतात ‘विंग्ज आॅफ फ्लाय’

By admin | Updated: September 27, 2014 02:36 IST

आजचे युग हे विज्ञान, तंत्रज्ञानाचे आहे. स्वप्नांना गाठताना उंच भरारी घेण्याच्या अनेक संधी जगात उपलब्ध आहेत.

नागपूर : आजचे युग हे विज्ञान, तंत्रज्ञानाचे आहे. स्वप्नांना गाठताना उंच भरारी घेण्याच्या अनेक संधी जगात उपलब्ध आहेत. गरज आहे ती योग्य मार्गदर्शन आणि उंच झेप घेण्यासाठी स्वत:ला तयार करण्याची. अन् शिक्षणातूनच ‘विंग्ज आॅफ फ्लाय’ मिळू शकतात असे मत भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शंभराव्या दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाच्या क्रीडांगणावर पार पडलेल्या या ऐतिहासिक सोहळ्याला मॅगसेसे पुरस्कार प्राप्त तसेच ‘सर्च’ संस्थेचे संचालक डॉ.अभय बंग, महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ.संजय चहांदे व विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांची प्रमुख उपस्थिती होती.शंभराव्या दीक्षांत समारंभानिमित्त ‘परम’सुपर संगणकाचे निर्माते व संगणकतज्ज्ञ डॉ.विजय भटकर यांचा मानद ‘डी.लिट.’ प्रदान करण्यात आली. यावेळी डॉ.कलाम यांनी संवादपूर्ण शैलीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नागपूर विद्यापीठ गेल्या ९१ वर्षांपासून देशाच्या जडणघडणीसाठी सेवा देत आहे. पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यास एक वर्षाचा कालावधी लागतो. याचाच अर्थ नागपूर विद्यापीठाने आतापर्यंत चक्क ९१ वेळा सूर्याला प्रदक्षिणा घातल्या आहेत असे डॉ.कलाम म्हणाले. चांगल्या शिक्षणातून संशोधनाला प्रोत्साहन मिळते. शिक्षकाचे संशोधनाप्रती असलेले प्रेम आणि त्यांचा अनुभव यामुळे संस्थेचा विकास होता व कुठल्याही संस्थेचा दर्जा हा तेथील संशोधनावरून ठरत असतो. त्यामुळे शिक्षण, संशोधन व दर्जा यांचे एक चक्र आहे असे प्रतिपादनदेखील त्यांनी केले. प्रत्येक विद्यार्थ्याने तो खरोखरच कशाकरिता लोकांच्या स्मरणात राहील यासंदर्भात विचार करावा असे आवाहन डॉ.कलाम यांनी केले. पदवी मिळविल्यानंतर आता जीवनाचा अर्थ शोधण्याचे आव्हान विद्यार्थ्यांसमोर आहे. पण स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करण्याच्या मोठ्या संधीदेखील आहे असे मत डॉ.अभय बंग यांनी व्यक्त केले. डॉ.चहांदे यांनीदेखील विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या व ऐतिहासिक टप्पा गाठल्याबद्दल विद्यापीठाचे अभिनंदन केले.प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांनी १०० व्या दीक्षांत समारंभामुळे विद्यापीठाच्या परंपरेत एक नवा अध्याय जुळल्याचे सांगितले. कोणत्याही विद्यापीठाला भूतकाळात रमणे परवडणारे नसते. नागपूर विद्यापीठ ज्ञानसंपादन व ज्ञाननिर्मितीचे केंद्र बनावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)