शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

जल विद्युत प्रकल्पांना वाव

By admin | Updated: June 12, 2015 02:47 IST

नागपूर : राज्यात लघु जल विद्युत प्रकल्पांच्या माध्यमातून अतिरिक्त वीजनिर्मिती करण्यास चांगला वाव आहे. नवीन अपारंपरिक

२५ मेगावॅट क्षमतेपर्यंतच्या प्रकल्पांचा समावेश नागपूर : राज्यात लघु जल विद्युत प्रकल्पांच्या माध्यमातून अतिरिक्त वीजनिर्मिती करण्यास चांगला वाव आहे. नवीन अपारंपरिक ऊर्जा धोरणांतर्गत २५ मेगावॅट क्षमतेपर्यंतच्या सर्व लघु जल विद्युत प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच ४०० मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांना पुढीलप्रमाणे तरतुदी व प्रोत्साहनात्मक बाबी लागू राहणार आहेत. या प्रकल्पांसाठी लागणाऱ्या लघु दाब, उच्च दाब आणि अति उच्च दाब उपकेंद्राचे व पारेषण आणि वितरण वाहिन्यांचे सर्वेक्षण महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी व प्रकल्पधारक संयुक्तपणे करतील. अशा प्रकल्पांच्या ठिकाणापासून ते लघु दाब, उच्च दाब व अति उच्च दाब उपकेंद्रापर्यंत जोडल्या जाणाऱ्या ११ केव्ही व त्यापेक्षा अधिक दाबाच्या वाहिन्यांचा समावेश या निष्कासन व्यवस्थेत केला जाईल. पवनऊर्जेपासून ५००० मेगावॅट निर्मिती राज्यात पवनऊर्जेचा वापर, प्रकल्प उभारणीसाठी अनुकूल वातावरण व येथील वारा परिमापन लक्षात घेता नवीन धोरणात ५००० मेगावॅट क्षमतेचे पवनऊर्जा प्रकल्प सुरू करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये पवनऊर्जा प्रकल्पस्थळी असलेला अनुकूल वाव विचारात घेऊन योग्य मायक्रोसाईटिंग करू न उच्चतम सुधारित तंत्रज्ञानावर आधारित व अधिक क्षमतेची पवनऊर्जा जनित्रे आस्थापित करण्याची मुभा प्रकल्पधारकांना दिली जाणार आहे. या धोरणांतर्गत पवनऊर्जा प्रकल्पांसाठी घेण्यात येणाऱ्या जमिनींच्या बाबतीत बिगर शेती जमिनीची (नॉन अ‍ॅग्रीकल्चर लॅन्ड) मानीव दर्जा (डिमांड स्टेटस्) लागू राहतील. तसेच या प्रकल्पांना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून संमती किंवा नाहरकत प्रमाणपत्र घेण्यापासून सूट मिळणार आहे. गत १४ आॅक्टोबर २००८ च्या धोरणांतर्गत २००० मेगावॅट क्षमतेचे पवनऊ र्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतरच्या सर्व प्रकल्पांना नवीन धोरणांतर्गत नमूद केलेल्या तरतुदी लागू राहणार आहेत. तसेच नवीन धोरणांतर्गत कार्यान्वित प्रकल्पांना महाऊर्जाकडे नोंदणी करणे आवश्यक राहणार आहे. उसाच्या चिपाडावर आधारित प्रकल्प साखर कारखाने व कृषी उद्योगांमधून उपलब्ध होणाऱ्या उप-पदार्थांपासून (उसाचे चिपाड,भातकोंडा) अतिरिक्त वीज उपलब्ध होऊ शकते. शिवाय शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालावर अधिक लाभ मिळू शकतो. अशा प्रकल्पांना चालना दिली जाणार आहे. नवीन धोरणांतर्गत १००० मेगावॅट क्षमतेच्या उसाचे चिपाड व कृषी अवशेषांवर आधारित सह-वीज प्रकल्पांना प्रोत्साहित करण्याची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पांसाठी निष्कासन व्यवस्थेची उभारणी व खर्च याबाबत महाराष्ट्र वीज नियामक आयोगाची नियमावली व आदेश लागू राहतील. मात्र निष्कासन व्यवस्था उभारणीसाठी घेण्यात येणारे पर्यवेक्षण शुल्क लागू राहणार नाही. या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेचा वापर हा स्वत:च्या वापरासाठी केल्यास प्रकल्प कार्यान्वित झाल्याच्या दिनांकापासून पहिल्या १० वर्षांकरिता विद्युत शुल्क आकारले जाणार नाही. मागील १ एप्रिल २०१५ पासून मूलभूत सुविधा संमतीप्राप्त करणाऱ्या प्रकल्पांना या धोरणांतर्गत असलेल्या तरतुदी व प्रोत्साहनात्मक बाबी लागू राहतील, तसेच महाऊ र्जाकडून मूलभूत सुविधा संमती देण्यात येईल.