शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वेगळ्या विदर्भासाठी हवा दृढ निर्धार

By admin | Updated: May 8, 2015 02:21 IST

दांडेकर समिती, केळकर समिती झाली. या समितीच्या अहवालावरच महाराष्ट्र झुलत आहे ..

नागपूर : दांडेकर समिती, केळकर समिती झाली. या समितीच्या अहवालावरच महाराष्ट्र झुलत आहे पण विदर्भाला काहीही मिळाले नाही. अनेकांच्या फसव्या आश्वासनांवर वैदर्भीयांनी विश्वास ठेवला आणि शोषण सुरूच राहिले. विदर्भ आपला आहे आणि तो मागण्याचा आपला अधिकार अबाधित आहे. पण केवळ पुस्तकांनी विदर्भ वेगळा होणार नाही. त्यासाठी राजकीय नेत्यांची, जनतेची दृढ इच्छाशक्ती असली पाहिजे, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी व्यक्त केले. विश्वस्त प्रकाशनाच्यावतीने ज्येष्ठ पत्रकार, लेखक प्रभाकर कोंडबत्तुनवार यांच्या ‘आरसा विदर्भाचा’ या पुस्तकाचे प्रकाशन विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या सभागृहात गुरुवारी करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार उमेशबाबू चौबे, रणजित मेश्राम, प्राचार्य बबन तायवाडे, माजी कुलगुरु हरिभाऊ केदार आणि लेखक प्रभाकर कोंडबत्तुनवार उपस्थित होते. डॉ. खांदेवाले म्हणाले, ३४ हजार आत्महत्या ज्या प्रदेशात होतात, त्या प्रदेशाने पुन्हा उभे राहुच नये का? या पुस्तकातून आपण एक धडा घ्यायला हवा, हे आपले राज्य आहे आणि ते आपल्याला मिळायलाच हवे. त्याशिवाय विदर्भाचे शोषण थांबणार नाही. विदर्भाचा इतिहास, माणसे, नेते आणि आकडेवारी समजून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. हरिभाऊ केदार म्हणाले, संयुक्त महाराष्ट्र झाल्यावर कुठल्याही भागावर अन्याय होणार नाही, अशा वल्गना करण्यात आला पण अन्याय झालाच, हा इतिहास आहे. या पुस्तकातून हा सारा इतिहास अभ्यासपूर्णतेने आला आहे. बबनराव तायवाडे म्हणाले, या पुस्तकामुळे विदर्भाबाबतच्या माझ्या भूमिका स्पष्ट झाल्या. हे पुस्तक वैदर्भीयांची मानसिकता तयार करेल, यात शंका नाही. रणजित मेश्राम म्हणाले, वेगळ्या विदर्भाबाबत शिवसेनेने भूमिका घेतली पण काँग्रेस, भाजपाने भूमिकाच घेतली नाही. तेलंगणा वेगळा झाला कारण राजकीय भूमिका होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विदर्भाबाबत त्यांची भूमिका विचारण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. उमेश चौबे म्हणाले, विदर्भाबाबतची आपली निष्ठाच कमी पडत असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. विश्वासघात होत असताना शोषणाची प्रतिक्रियाही नसावी, हे दुर्दैवी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक बबन नाखले यांनी तर पुस्तकाची भूमिका प्रभाकर कोंडबत्तुनवार यांनी सांगितली. संचालन अशोक भड तर आभार विठ्ठलराव कोंबाडे यांनी मानले. (प्रतिनिधी)