शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
4
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
5
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
6
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
7
उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
8
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
9
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
10
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
11
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
12
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
14
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
15
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
16
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
17
रात्री खोकल्याचं औषध प्यायला, पण सकाळी उठलाच नाही; ५ वर्षाच्या मुलाच्या मृत्युनं खळबळ!
18
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
19
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
20
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...

खैरलांजी हत्याकांडातील आरोपीला पाठीशी घालणाऱ्यांना मत देणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 00:49 IST

बौद्ध आंबेडकरी समाजातील काही बुद्धिजीवी हे भाजपला हरविण्यासाठी काँग्रेसला मतदान करा, असे आवाहन करीत आहेत. तेव्हा खैरलांजी हत्याकांडातील आरोपींना पाठीशी घालणाऱ्यांना तुम्ही मतदान करणार का? असा थेट सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते, भारिप बहुजन महासंघाचे शहराध्यक्ष आणि खैरलांजी हत्याकांडानंतर झालेल्या आंदोलनातील एक प्रमुख कार्यकर्ते रवी शेंडे यांनी सोमवारी येथे पत्रपरिषदेत उपस्थित केला.

ठळक मुद्देवंचित बहुजन आघाडीचा सवाल :काँग्रेस-भाजप सारखेच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बौद्ध आंबेडकरी समाजातील काही बुद्धिजीवी हे भाजपला हरविण्यासाठी काँग्रेसला मतदान करा, असे आवाहन करीत आहेत. तेव्हा खैरलांजी हत्याकांडातील आरोपींना पाठीशी घालणाऱ्यांना तुम्ही मतदान करणार का? असा थेट सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते, भारिप बहुजन महासंघाचे शहराध्यक्ष आणि खैरलांजी हत्याकांडानंतर झालेल्या आंदोलनातील एक प्रमुख कार्यकर्ते रवी शेंडे यांनी सोमवारी येथे पत्रपरिषदेत उपस्थित केला.रवी शेंडे म्हणाले,भाजप हा जातीयवादी पक्ष आहे. त्यामुळे त्याला हरवणे आवश्यक आहे. परंतु बौद्ध आंबेडकरी समाजातील काही बुद्धिजीवी लोक भाजपची भीती दाखवून काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. हे बरोबर नाही. त्यांना काँग्रेसचा प्रचार करायचाच असेल तर उघडपणे करावा, परंतु छुपा अजेंडा चालवू नये. काँग्रेसने ७० वर्षांपासून आपल्या समाजावर सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रात अन्याय केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये निवडून येऊ नये म्हणून कॉँग्रेसनेच प्रयत्न केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना लोकसभा निवडणुकीत निवडून येऊ दिले नाही. दोनवेळा त्यांचा पराभव केला. इतकेच नव्हे तर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांना हिंदू स्मशान भूमीत जागा देण्यासाठी मज्जाव केला. हा इतिहास आम्ही विसरणार आहोत का? असा प्रश्नही शेंडे यांनी उपस्थित केला.संपूर्ण जगाला हादरवून टाकणारे खैरलांजी हत्याकांड भंडारा जिल्ह्यात घडले. भोतमांगे कुटुंबाला संपवण्यात आले. देशात जेव्हा कधी समाजावर जातीय हल्ले होतात, तेव्हा खैरलांजीचे उदाहरण दिले जाते. इतके अमानुष ते हत्याकांड होते. या हत्याकांडातील आरोपींना शिक्षा मिळावी म्हणून देशभरात आंदोलन झाले. आम्हीही त्यात सहभागी होतो. हजारो आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले. हजारो तरुण तुरुंगात गेले. हजारोंनी लाठ्याकाठ्या खाल्ल्या. इतकेच नव्हे तर अनेक जण गोळीबरालाही सामोरे गेले. परंतु त्याच वेळी खैरलांजी हत्याकांडातील आरोपींना वाचविण्याचे काम काही नेतेमंडळी करीत होते. अशा लोकांना काँग्रेसने उमेदवारी दिली. तेव्हा अशा लोकांच्या पाठीमागे समाजाने कसे उभे राहावे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.खैरलांजीचा लढा संपलेला नाहीखैरलांजी हत्याकांडातील आरोपीला शिक्षा मिळावी यासाठी समाजाचा लढा आजही सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. तो संपलेला नाही, याची आठवणही रवी शेंडे यांनी यावेळी करून दिली.वंचित बहुजन आघाडी हाच पर्यायकाँग्रेस-भाजपा सारखेच आहे. बौद्ध आंबेडकरी समाजाचे एकूणच वंचित समाजाचे भले हे दोन्ही पक्ष करू शकत नाही. त्यासाठी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर व एमआयएमचे नेते खा. असदुद्दीन ओवेसी यांनी निर्माण केलेली वंचित बहुजन आघाडी ही एक सक्षम पर्याय आहे. त्यामुळे समाजाने या आघाडीच्या पाठीमागे उभे राहावे, असे आवाहनही रवी शेंडे यांनी केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019