शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

कोरोना संक्रमण काळातील उपचाराअभावी कर्करोगाचा उद्रेक होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2022 06:00 IST

Nagpur News निरंतर उपचाराची गरज असलेल्या रुग्णांना कोरोनामुळे वेळेत उपचार घेता आले नसल्याने, पुढील दोन वर्षात हा आजार विक्राळ रूप धारण करण्याची शक्यता नॅशनल कॅन्सर ग्रीड ऑफ इंडियाच्या संशोधकांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देसंशोधकांनी व्यक्त केली भीती धास्तीपोटी ओमायक्रॉन संक्रमणातही कर्करुग्ण तपासणीसाठी घेताहेत पुढाकार

मेहा शर्मा 

नागपूर : कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रकोपात नियमित उपचार घेत असलेले कर्करुग्ण आरोग्यविषयक प्रोटोकॉलमुळे हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नव्हते. निरंतर उपचाराची गरज असलेल्या रुग्णांना कोरोनामुळे वेळेत उपचार घेता आले नसल्याने, पुढील दोन वर्षात हा आजार विक्राळ रूप धारण करण्याची शक्यता नॅशनल कॅन्सर ग्रीड ऑफ इंडियाच्या संशोधकांनी आपल्या लॅन्सेट ऑन्कोलॉजी संशोधनात व्यक्त केली आहे.

कोरोना संक्रमणाच्या डेल्टा व्हेरिएंटच्या लाटेतील संक्रमणाच्या धास्तीने त्या काळात ८३,६०० ते १,११,५०० रुग्णांना कर्करोग झाल्याचे निदान होऊ शकले नव्हते. सध्या सुरू असलेल्या तिसऱ्या लाटेतील ओमायक्रॉनचा आरोग्यावर होणारा दुष्परिणाम सौम्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कसलीही रिस्क घेण्याच्या मनस्थितीत कर्करुग्ण नाहीत. आजाराच्या तिव्रतेचे वेळीच निदान व्हावे आणि उपचार सुरू करता यावे म्हणून कर्करुग्ण स्वत:च पुढाकार घेत असून, हॉस्पिटलमध्ये येताना दिसत आहेत; मात्र अजूनही ५० टक्के कर्करुग्ण हॉस्पिटलमध्ये येत नाहीत, ही चिंतेची बाब असल्याचे आरएसटी रिजनल कॅन्सर हॉस्पिटलचे ऑन्कोलॉजिस्ट डॉ. श्रीराम काणे यांनी सांगितले. मी स्वत: कोरोना संक्रमण झालेल्या सहा-सात कर्करुग्णांना हाताळले आहे. त्यांच्यात अगदीच सौम्य लक्षणे होती. आम्ही आता रुग्णांमधील भीती घालविण्याचे प्रयत्न करत असून, त्यांना पुढील उपचार घेण्यास प्रोत्साहित करत असल्याचे डॉ. श्रीराम काणे म्हणाले.

सामान्य कोरोना संक्रमित रुग्ण आणि कोरोना संक्रमित कर्करुग्ण यांच्यात तसा किरकोळ फरक असून, कर्करुग्णांना फुफ्फुसाचा संसर्ग झालेला आढळला नाही किंवा त्यांना ऑक्सिजनची गरजही भासलेली नाही. अशा रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारीही कमी आहे. दीर्घ प्रवास करून उपचारासाठी येणाऱ्या बाहेरगावच्या रुग्णांना कोरोना प्रोटोकॉलचे पालन करणे अवघड जाते; मात्र पुढच्या दोन-तीन आठवड्यात परिस्थिती आटोक्यात येण्याची चिन्हे दिसत असल्याचेही डॉ. काणे यांनी सांगितले. कोरोना संक्रमित कर्करुग्णांवरील उपचार इतरांसारखाच असून, सौम्य लक्षणे असलेल्या संक्रमित रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याची परवानगी आयसीएमआरने दिली असल्याने कर्करुग्णांवरील उपचार सहज झाल्याचे डॉ. काणे यांनी सांगितले.

लसीकरण हे रुग्णांना मानसिक बळ देणारे ठरले असून, आता बूस्टर डोस घेण्यासाठीही प्रोत्साहित करत आहोत. त्यामुळे कर्करुग्ण उपचारासाठी स्वत:च येत असल्याचे ऑन्कोलॉजिस्ट डॉ. वैभव चौधरी यांनी सांगितले.

..............

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस