शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

यंदा ९४ वे मराठी साहित्य संमेलन होणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 10:26 IST

Nagpur News नाशिक येथे नियोजित ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होईल का, हा प्रश्न उपस्थित व्हायला लागला आहे.

ठळक मुद्देनियोजनाच्या हालचाली थंडावल्या महामंडळ निवडेल का ऑनलाईनचा पर्याय?

प्रवीण खापरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संक्रमणाच्या तीव्रतेवर लॉकडाऊनचा निर्णय शासन घेते आणि ते उठवतेही. मात्र, संक्रमणाच्या धोक्याने छोट्या छोट्या कुटुंबांच्या नियोजनाचा बोजवारा उडलाय. जेथे शासन, प्रशासन, यंत्रणा हतबल झाले, तेथे मोठमोठी महामंडळे, संस्थांची काय बिशाद. साहित्य व सांस्कृतिक क्षेत्राचे तर पार हाल झाले आहेत. या सगळ्यांचा विचार करताना नाशिक येथे नियोजित ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होईल का, हा प्रश्न उपस्थित व्हायला लागला आहे.

जानेवारी २०२० मध्ये ९३वे साहित्य संमेलन उस्मानाबाद (धाराशिव) येथे पार पडल्यानंतर कोरोना संक्रमणाच्या पहिल्या लाटेने आक्रमण केले आणि मार्च २०२० पासून संपूर्ण भारत लॉकडाऊनमध्ये गेला. लाट ओसरल्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने ९४व्या संमेलनाची तयारी केली. अनेक वादावादीनंतर नाशिक हे संमेलनस्थळ म्हणून निश्चित झाले आणि मार्च महिन्यातील तारखाही निश्चित झाल्या. मात्र, दरम्यान फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा कोरोना संक्रमणाने तोंड काढले आणि पहिल्या पेक्षाही दुसरी लाट चौपटीने भयंकर ठरली. कोणत्याही स्थितीत संमेलन पार पडणार, असे म्हणणारे महामंडळ अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी अखेर संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून महामंडळ क्वारंटाईनमध्ये गेल्याची स्थिती आहे. संमेलन स्थगित झाल्यानंतर महामंडळाच्या संपूर्ण हालचालीच बंद पडल्या आहेत. संक्रमणाचा जोर ओसरत असून, टप्प्याटप्प्यात लॉकडाऊनही मागे घेतले जात आहे. मात्र, संक्रमणाच्या पहिल्या लाटेनंतरचा गाफीलपणा आणि वर्तमानातील भयानक स्थिती बघता शासन सार्वजनिक कार्यक्रमांवर कठोर निर्बंध आणणार हे निश्चित. अशा स्थितीत नाशिक येथील नियोजित ९४वे साहित्य संमेलन यंदा होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित व्हायला लागला आहे. त्यातच कोरोना काळात पार पडलेल्या इतर लहानमोठ्या साहित्य संमेलनांप्रमाणे महामंडळ ऑनलाईनचा पर्याय निवडेल का, हा एक प्रश्न निर्माण झाला आहे.

विश्व मराठी संमेलन ऑनलाईन

गेल्याच महिन्यात विश्व मराठी परिषदेच्या वतीने ऑनलाईन संमेलन पार पडले. या संमेलनात देश-विदेशातून मोठ्या संख्येने साहित्यप्रेमींनी सहभाग नोंदविला होता. त्याच अनुषंगाने १ जुलैपासून पुन्हा एकदा परिषदेतर्फे विविध ऑनलाईन कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. याच धर्तीवर नव्या युगाची नवी हाक आणि गरज म्हणून साहित्य महामंडळानेही असला प्रयोग राबविण्यास हरकत नसल्याची चर्चा साहित्य वर्तुळात सुरू आहे.

ऑनलाईनचा पर्याय शक्यच नाही

इतर कुठल्याही कार्यक्रमांची आणि मराठी साहित्य संमेलनाची तुलना करणे शक्य नाही. साहित्य संमेलन म्हणून प्रत्यक्ष भेटी-गाठीतून विचारांचे आदान-प्रदान होणारा हा हक्काचा सोहळा आहे. आम्ही संमेलन घेण्यास उत्सुक आहोत. त्यासाठी कोरोना संक्रमणाच्या स्थितीचे अवलोकन केले जाईल. या संदर्भात जुलैच्या अखेर बैठक बोलाविण्यात येईल. मात्र, शासन-प्रशासनाचे काय नियम असतात, त्यावरच बैठक आणि संमेलनाच्या नियोजनाचे ठरणार आहे.

- कौतिकराव ठाले-पाटील, अध्यक्ष : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

...............

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन