शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

सरकार पेट्रोकेमिकल प्रकल्पाची सुरक्षितता पाहणार का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2022 20:48 IST

Nagpur News कुठलाही प्रकल्प उभारत असताना त्याची सुरक्षिततादेखील तपासण्याची आवश्यकता असते. रत्नागिरीत सातत्याने चक्रीवादळांचा धोका असतो. त्या तुलनेत विदर्भात नैसर्गिक संकटांचा धोका कमी असल्याची भूमिका तज्ज्ञांनी मांडली आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीत वारंवार नैसर्गिक संकटांचा धोकापेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स-रिफायनरीसाठी विदर्भच योग्य ठिकाण

नागपूर : विदर्भात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स व रिफायनरी यावी, अशी मागणी जोर धरत असताना राज्य शासनाने रत्नागिरीसाठी सकारात्मक संकेत दाखविले. त्यामुळे ही मागणी लावून धरणाऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. कुठलाही प्रकल्प उभारत असताना त्याची सुरक्षिततादेखील तपासण्याची आवश्यकता असते. रत्नागिरीत सातत्याने चक्रीवादळांचा धोका असतो. त्या तुलनेत विदर्भात नैसर्गिक संकटांचा धोका कमी असल्याची भूमिका तज्ज्ञांनी मांडली आहे.

समुद्रकिनारा नसेल तरी पेट्रोकेमिकल रिफायनरी उभारली जाऊ शकते. या प्रकल्पासाठी मुबलक जमीन उपलब्ध असलेला विदर्भ हा चांगला पर्याय ठरू शकतो व याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांना पत्र लिहिले होते. एकूण स्थिती व मागणीचा विचार करता रत्नागिरीपेक्षा नागपुरातच पेट्रोलियम कॉम्प्लेक्स-रिफायनरी व्यवहार्य असल्याचा दावा या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

सर्वच बाबींचा विचार करता रत्नागिरीऐवजी नागपूरचाच विचार झाला पाहिजे. कोकणातील रत्नागिरी आणि आजूबाजूचा परिसर मान्सूनमध्ये अत्यंत संवेदनशील असतो. शिवाय किनाऱ्यांजवळ चक्रीवादळाचा नेहमीच धोका असतो व त्यामुळे मालमत्तेलादेखील धोका निर्माण होतो. दशकभरात चक्रीवादळांची संख्या वाढली असून, भविष्यात हा त्रास वाढू शकतो. त्या तुलनेत विदर्भ हवामानाच्या आघाड्यांवर अधिक सुरक्षित आहे. विदर्भ आणि मध्य भारत रत्नागिरी हवामान परिस्थितीच्या अगदी विरुद्ध आहे. वर्षभर हवेतील किमान आर्द्रता कमी असते व वातावरण बहुतेक कोरडे असते. विदर्भात कमी दाबाचे क्षेत्र किंवा इतर चक्रीवादळांचा धोकादेखील नसतो. त्यामुळे येथे गुंतवणूक सुरक्षित ठरेल. राजकीय कारणांसाठी रत्नागिरीचा आग्रह योग्य नाही, असे मत ‘वेद’चे उपाध्यक्ष प्रदीप माहेश्वरी यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Petrolपेट्रोल