शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

सरकार पेट्रोकेमिकल प्रकल्पाची सुरक्षितता पाहणार का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2022 20:48 IST

Nagpur News कुठलाही प्रकल्प उभारत असताना त्याची सुरक्षिततादेखील तपासण्याची आवश्यकता असते. रत्नागिरीत सातत्याने चक्रीवादळांचा धोका असतो. त्या तुलनेत विदर्भात नैसर्गिक संकटांचा धोका कमी असल्याची भूमिका तज्ज्ञांनी मांडली आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीत वारंवार नैसर्गिक संकटांचा धोकापेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स-रिफायनरीसाठी विदर्भच योग्य ठिकाण

नागपूर : विदर्भात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स व रिफायनरी यावी, अशी मागणी जोर धरत असताना राज्य शासनाने रत्नागिरीसाठी सकारात्मक संकेत दाखविले. त्यामुळे ही मागणी लावून धरणाऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. कुठलाही प्रकल्प उभारत असताना त्याची सुरक्षिततादेखील तपासण्याची आवश्यकता असते. रत्नागिरीत सातत्याने चक्रीवादळांचा धोका असतो. त्या तुलनेत विदर्भात नैसर्गिक संकटांचा धोका कमी असल्याची भूमिका तज्ज्ञांनी मांडली आहे.

समुद्रकिनारा नसेल तरी पेट्रोकेमिकल रिफायनरी उभारली जाऊ शकते. या प्रकल्पासाठी मुबलक जमीन उपलब्ध असलेला विदर्भ हा चांगला पर्याय ठरू शकतो व याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांना पत्र लिहिले होते. एकूण स्थिती व मागणीचा विचार करता रत्नागिरीपेक्षा नागपुरातच पेट्रोलियम कॉम्प्लेक्स-रिफायनरी व्यवहार्य असल्याचा दावा या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

सर्वच बाबींचा विचार करता रत्नागिरीऐवजी नागपूरचाच विचार झाला पाहिजे. कोकणातील रत्नागिरी आणि आजूबाजूचा परिसर मान्सूनमध्ये अत्यंत संवेदनशील असतो. शिवाय किनाऱ्यांजवळ चक्रीवादळाचा नेहमीच धोका असतो व त्यामुळे मालमत्तेलादेखील धोका निर्माण होतो. दशकभरात चक्रीवादळांची संख्या वाढली असून, भविष्यात हा त्रास वाढू शकतो. त्या तुलनेत विदर्भ हवामानाच्या आघाड्यांवर अधिक सुरक्षित आहे. विदर्भ आणि मध्य भारत रत्नागिरी हवामान परिस्थितीच्या अगदी विरुद्ध आहे. वर्षभर हवेतील किमान आर्द्रता कमी असते व वातावरण बहुतेक कोरडे असते. विदर्भात कमी दाबाचे क्षेत्र किंवा इतर चक्रीवादळांचा धोकादेखील नसतो. त्यामुळे येथे गुंतवणूक सुरक्षित ठरेल. राजकीय कारणांसाठी रत्नागिरीचा आग्रह योग्य नाही, असे मत ‘वेद’चे उपाध्यक्ष प्रदीप माहेश्वरी यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Petrolपेट्रोल