शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

एसटी कामगारांचे प्रश्न सोडविणार

By admin | Updated: February 29, 2016 02:51 IST

एस टी महामंडळ ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. खासगी वाहतुकीप्रमाणे नफ्याचा विचार न करता कमी नफा असलेल्या मार्गावर एसटीची बस धावते.

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या अधिवेशनाचे उद्घाटननागपूर : एस टी महामंडळ ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. खासगी वाहतुकीप्रमाणे नफ्याचा विचार न करता कमी नफा असलेल्या मार्गावर एसटीची बस धावते. एसटीचे कामगार वंचितांना सेवा देतात. त्यामुळे एसटी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. उमरेड मार्गावर बहादुरा टोल नाक्याजवळ आयोजित अधिवेशनात हजारो एसटी कामगारांना मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुधाकर कोहळे, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, एसटीचे कामगार हे सामान्य जनतेला सेवा देणारे आहेत. लोकशाही प्रक्रियेत संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार सामान्य जनतेच्या सेवेसाठी शासनाच्या माध्यमातून जे विविध उपक्रम राबविण्यात येतात त्यात या लोकशाहीच्या बसची दोन चाके शासनाची आहेत तर दोन चाके एस टी महामंडळाची आहेत. त्यामुळे कामगारांच्या अपेक्षा रास्त आहेत. कामगारांनी त्यांच्या मागण्या मांडतानाच आपले कर्तव्य चोख बजावणे गरजेचे आहे. कामगारांनी २१ व्या शतकातील मूल्य समजून घेऊन आपली कार्यक्षमता तसेच पारदर्शकपणा वाढविण्याचा प्रयत्न करावा. नोकर भरतीत कामगारांच्या मुलांना पाच टक्के आरक्षण, वैद्यकीय अपात्र कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना नोकरी, वैद्यकीय कॅशलेस योजना, मोफत पास सर्व गाड्यांना लागू करणे आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना पती-पत्नीस वर्षभर मोफत पास देण्यावर सकारात्मक विचार करण्यात येईल. कनिष्ठ वेतनश्रेणीचा प्रश्न लवकरच निकाली काढण्याची घोषणा त्यांनी केली. सातव्या वेतन आयोगासंदर्भात केंद्र शासनाकडून कोणतीही माहिती मिळाली नसल्यामुळे हा आयोग राज्यात लागू झाला नाही. हा आयोग राज्यात लागू झाल्यानंतर एसटी कामगारांसाठी तो लागू करण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांशिवाय महाराष्ट्र चालूच शकत नसून ही बाब प्रतिकुल परिस्थितीत सेवा देणाऱ्या कामगारांमुळे शक्य झाली आहे. सुरुवातीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि दीपप्रज्वलन करून अधिवेशनाचे उद्घाटन झाले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एसटी कामगारांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार, अधिवेशनाच्या आयोजनासाठी स्वागताध्यक्ष सुभाष वंजारी यांचा सत्कार आणि स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. (प्रतिनिधी)संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी आपल्या भाषणात कामगारांच्या विविध मागण्या मांडल्या. प्रास्ताविक स्वागताध्यक्ष सुभाष वंजारी यांनी केले. संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले. अधिवेशनाला संघटनेचे ५० हजार कामगार उपस्थित होते.