शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कामगारांचे प्रश्न सोडविणार

By admin | Updated: February 29, 2016 02:51 IST

एस टी महामंडळ ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. खासगी वाहतुकीप्रमाणे नफ्याचा विचार न करता कमी नफा असलेल्या मार्गावर एसटीची बस धावते.

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या अधिवेशनाचे उद्घाटननागपूर : एस टी महामंडळ ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. खासगी वाहतुकीप्रमाणे नफ्याचा विचार न करता कमी नफा असलेल्या मार्गावर एसटीची बस धावते. एसटीचे कामगार वंचितांना सेवा देतात. त्यामुळे एसटी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. उमरेड मार्गावर बहादुरा टोल नाक्याजवळ आयोजित अधिवेशनात हजारो एसटी कामगारांना मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुधाकर कोहळे, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, एसटीचे कामगार हे सामान्य जनतेला सेवा देणारे आहेत. लोकशाही प्रक्रियेत संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार सामान्य जनतेच्या सेवेसाठी शासनाच्या माध्यमातून जे विविध उपक्रम राबविण्यात येतात त्यात या लोकशाहीच्या बसची दोन चाके शासनाची आहेत तर दोन चाके एस टी महामंडळाची आहेत. त्यामुळे कामगारांच्या अपेक्षा रास्त आहेत. कामगारांनी त्यांच्या मागण्या मांडतानाच आपले कर्तव्य चोख बजावणे गरजेचे आहे. कामगारांनी २१ व्या शतकातील मूल्य समजून घेऊन आपली कार्यक्षमता तसेच पारदर्शकपणा वाढविण्याचा प्रयत्न करावा. नोकर भरतीत कामगारांच्या मुलांना पाच टक्के आरक्षण, वैद्यकीय अपात्र कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना नोकरी, वैद्यकीय कॅशलेस योजना, मोफत पास सर्व गाड्यांना लागू करणे आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना पती-पत्नीस वर्षभर मोफत पास देण्यावर सकारात्मक विचार करण्यात येईल. कनिष्ठ वेतनश्रेणीचा प्रश्न लवकरच निकाली काढण्याची घोषणा त्यांनी केली. सातव्या वेतन आयोगासंदर्भात केंद्र शासनाकडून कोणतीही माहिती मिळाली नसल्यामुळे हा आयोग राज्यात लागू झाला नाही. हा आयोग राज्यात लागू झाल्यानंतर एसटी कामगारांसाठी तो लागू करण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांशिवाय महाराष्ट्र चालूच शकत नसून ही बाब प्रतिकुल परिस्थितीत सेवा देणाऱ्या कामगारांमुळे शक्य झाली आहे. सुरुवातीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि दीपप्रज्वलन करून अधिवेशनाचे उद्घाटन झाले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एसटी कामगारांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार, अधिवेशनाच्या आयोजनासाठी स्वागताध्यक्ष सुभाष वंजारी यांचा सत्कार आणि स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. (प्रतिनिधी)संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी आपल्या भाषणात कामगारांच्या विविध मागण्या मांडल्या. प्रास्ताविक स्वागताध्यक्ष सुभाष वंजारी यांनी केले. संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले. अधिवेशनाला संघटनेचे ५० हजार कामगार उपस्थित होते.