शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

पतंजलीचे उत्पादन डिसेंबरपर्यंत खरंच सुरू होणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:09 IST

नागपूर : बाबा रामदेव यांच्या मिहान-सेझमधील पतंजली फूड अँड हर्बल पार्क लि.चे भूमिपूजन १० सप्टेंबर २०१६ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री ...

नागपूर : बाबा रामदेव यांच्या मिहान-सेझमधील पतंजली फूड अँड हर्बल पार्क लि.चे भूमिपूजन १० सप्टेंबर २०१६ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झाले होते. त्यावेळी एक हजार ते १२०० कोटींच्या गुंतवणुकीतून विदर्भातील १० हजार युवकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार देण्याची घोषणा बाबा रामदेव यांनी केली होती; पण पाच वर्षांनंतरही प्रकल्पात मशिनरींची उभारणी झालेली नाही. डिसेंबर अखेरीस प्रत्यक्ष उत्पादन सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत असली, तरीही उत्पादन खरंच सुरू होणार का आणि विदर्भातील युवकांना रोजगार मिळेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मिहान-सेझमध्ये सर्वाधिक रोजगार देणारा प्रकल्प म्हणून पतंजलीची ओळख निर्माण झाली होती; पण ओळख हळूहळू पुसट झाली. रोजगारासाठी आतापर्यंत जवळपास पाच हजार युवकांचे अर्ज प्रलंबित असल्याची माहिती आहे. एक महिन्यापूर्वी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी ३० डिसेंबरपर्यंत पतंजलीचा प्रकल्प सुरू होईल आणि याकरिता दररोज पतंजलीच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात असल्याचे म्हटले आहे. एक महिन्यापासून पतंजलीमध्ये मोठ्या मशिनरी येत आहेत. कुलिंग प्लांटसुद्धा आला आहे. प्रकल्पाचे शेड पूर्वीपासूनच तयार आहेत. या शेडमध्ये मशीन उभारणीचे काम सुरू झाल्याची माहिती आहे. आर्थिक समस्येमुळे थांबलेले काम आता पूर्वपदावर येत आहे. आता प्रकल्प सुरू होण्यात कोणताही अडथळा नसल्याचे मत दीपक कपूर यांनी एक महिन्यापूर्वी मिहानच्या दौऱ्यादरम्यान व्यक्त केले होते.

१० सप्टेंबर २०१६ रोजी भूमिपूजन करण्यात आले तेव्हा नऊ महिन्यांतच प्रकल्पाची उभारणी आणि उत्पादन सुरू होईल, असे सांगण्यात आले होते; पण वित्तीय समस्यांमुळे प्रकल्प पाच वर्षे लांबणीवर गेला. पतंजलीला २३२ एकर जमीन सेझमध्ये आणि ३२ एकर जमीन सेझबाहेर देण्यात आली आहे. पायाभूत बांधकाम पूर्वीच झाले आहे, केवळ मशिनरीची प्रतीक्षा होती. तीसुद्धा आली आहे. ३० डिसेंबरपर्यंत उत्पादन सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे विदर्भातील युवक आणि शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. शेतकऱ्यांचा कच्चा माल पतंजली विकत घेणार आहे. त्यामुळे विदर्भात पतंजलीला हव्या असलेल्या कच्च्या मालाचे उत्पादन शेतकरी घेतील, असे सूत्रांनी सांगितले.

मिहानमधील पतंजली प्रकल्पाचे प्रमुख कुलदीप सिंग यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता होऊ शकला नाही. त्यामुळे प्रकल्पाच्या प्रगतीची माहिती मिळू शकली नाही. यापूर्वीही एमएडीसीने उत्पादन सुरू करण्यासंदर्भात आणि भूखंडावरील मालकी हक्क सोडण्यास नोटीस बजावण्यात आली असल्याची बाब माहितीच्या अधिकारात पुढे आली होती.

युवकांना प्रशिक्षण देणार

कपूर म्हणाले, प्रकल्पासाठी ऑक्टोबरपासून जवळपास २०० युवकांना प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. याकरिता कंपनीची चर्चा करण्यात येईल. यावर कंपनीनेही सहमती दर्शविली आहे. सर्व युवक विदर्भातील असतील. प्रशिक्षणानंतर त्यांना प्रकल्पात काम करण्याची संधी मिळेल.