शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात उद्योग का उभे राहू नयेत?

By admin | Updated: February 2, 2015 01:10 IST

कोकण-कोल्हापूरनंतर सर्वाधिक खनिज संपत्ती विदर्भात आहे. महाराष्ट्रात कुठेही इतकी खनिज संपत्ती नाही. टाटांनी स्टील प्लान्ट उभा करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांची नजर सर्वप्रथम

केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर : ‘खनिज एक अनमोल संपत्ती’ विषयावर मार्गदर्शन नागपूर : कोकण-कोल्हापूरनंतर सर्वाधिक खनिज संपत्ती विदर्भात आहे. महाराष्ट्रात कुठेही इतकी खनिज संपत्ती नाही. टाटांनी स्टील प्लान्ट उभा करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांची नजर सर्वप्रथम गडचिरोलीवर पडली. कारण येथे मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती आहे. उद्योग उभारणीसाठी त्यांनी हत्तीवर बसून या परिसराची पाहणी केली आणि त्यांना हा प्रदेश खनिज संपत्तीच्या उपलब्धतेने आवडला. उद्योग उभारण्यात त्यांना वाहतूक व्यवस्थेची समस्या निर्माण झाली, अन्यथा टाटा स्टील प्लान्ट जमशेदपूरऐवजी गडचिरोलीत राहिला असता, हा इतिहास आहे. आज गडचिरोलीत वाहतूक, रस्ते सारेच झाले; पण विदर्भात खनिज संपत्तीवर आधारित उद्योग उभा झाला नाही, याची खंत केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी व्यक्त केली. ‘खनिज एक अनमोल संपत्ती’ विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. खनिज देशाची आणि समाजाची गरज आहे. आपल्या देशाची भूमी संपन्न आहे. पण गेल्या अनेक वर्षांत खनिजांच्या विविधतेचा आपण उपयोगच घेऊ शकलो नाही. खनिजांवर आधारित प्रोसेसिंग आणि फिनिशिंग प्लान्ट केले असते तर देशात आणि विदर्भातही बेरोजगारी राहिलीच नसती. मोदींच्या अजेंड्याप्रमाणे ‘मेक इन इंडिया’चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वच मंत्रालयांवर दबाव आहे. सारेच मंत्रालय अतिशय गंभीरपणे यावर काम करीत आहे. खनिज संपत्तीवर आधारित उद्योग उभारणी झाली नाही आणि जे उद्योग स्थापन झाले ते बंद पडले. येत्या काळात नव्या उद्योगांसह बंद पडलेल्या उद्योगांनाही चालू करण्याचे आव्हान आम्ही स्वीकारले आहे. कोळसा ही मोठी संपदा देशात असताना एक लाख कोटींचा कोळसा आयात करावा लागतो, हे दुर्दैवी आहे. ही स्थिती आम्ही बदलत आहोत. आपल्या देशात खनिजांचा उपयोग प्रामाणिकपणे केवळ सिमेंट निर्मितीसाठी झाला. नागपुरात आयबीएमसारखी संस्था आहे; पण त्यांचे काम चांगले नाही, हे खेदाने म्हणावे लागते. विदर्भातील खनिज बाहेर जाऊ देणार नाही, अशी भूमिका घ्या. येथील खनिज उपयोगात आणायचे असेल तर येथेच उद्योग उभारण्याची नीती स्वीकारा, विदर्भात उद्योग, रोजगार वाढतील, असे ते म्हणाले. याप्रसंगी आ. अनिल सोले, नवनीतसिंग तुली प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी अभ्यासक मनोज तिवारी यांनीही अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)