शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
2
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
3
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
4
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
5
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
6
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
7
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
8
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
10
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
11
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
12
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
13
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
14
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
15
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
16
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
17
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
18
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
19
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
20
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम

विदर्भात उद्योग का उभे राहू नयेत?

By admin | Updated: February 2, 2015 01:10 IST

कोकण-कोल्हापूरनंतर सर्वाधिक खनिज संपत्ती विदर्भात आहे. महाराष्ट्रात कुठेही इतकी खनिज संपत्ती नाही. टाटांनी स्टील प्लान्ट उभा करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांची नजर सर्वप्रथम

केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर : ‘खनिज एक अनमोल संपत्ती’ विषयावर मार्गदर्शन नागपूर : कोकण-कोल्हापूरनंतर सर्वाधिक खनिज संपत्ती विदर्भात आहे. महाराष्ट्रात कुठेही इतकी खनिज संपत्ती नाही. टाटांनी स्टील प्लान्ट उभा करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांची नजर सर्वप्रथम गडचिरोलीवर पडली. कारण येथे मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती आहे. उद्योग उभारणीसाठी त्यांनी हत्तीवर बसून या परिसराची पाहणी केली आणि त्यांना हा प्रदेश खनिज संपत्तीच्या उपलब्धतेने आवडला. उद्योग उभारण्यात त्यांना वाहतूक व्यवस्थेची समस्या निर्माण झाली, अन्यथा टाटा स्टील प्लान्ट जमशेदपूरऐवजी गडचिरोलीत राहिला असता, हा इतिहास आहे. आज गडचिरोलीत वाहतूक, रस्ते सारेच झाले; पण विदर्भात खनिज संपत्तीवर आधारित उद्योग उभा झाला नाही, याची खंत केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी व्यक्त केली. ‘खनिज एक अनमोल संपत्ती’ विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. खनिज देशाची आणि समाजाची गरज आहे. आपल्या देशाची भूमी संपन्न आहे. पण गेल्या अनेक वर्षांत खनिजांच्या विविधतेचा आपण उपयोगच घेऊ शकलो नाही. खनिजांवर आधारित प्रोसेसिंग आणि फिनिशिंग प्लान्ट केले असते तर देशात आणि विदर्भातही बेरोजगारी राहिलीच नसती. मोदींच्या अजेंड्याप्रमाणे ‘मेक इन इंडिया’चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वच मंत्रालयांवर दबाव आहे. सारेच मंत्रालय अतिशय गंभीरपणे यावर काम करीत आहे. खनिज संपत्तीवर आधारित उद्योग उभारणी झाली नाही आणि जे उद्योग स्थापन झाले ते बंद पडले. येत्या काळात नव्या उद्योगांसह बंद पडलेल्या उद्योगांनाही चालू करण्याचे आव्हान आम्ही स्वीकारले आहे. कोळसा ही मोठी संपदा देशात असताना एक लाख कोटींचा कोळसा आयात करावा लागतो, हे दुर्दैवी आहे. ही स्थिती आम्ही बदलत आहोत. आपल्या देशात खनिजांचा उपयोग प्रामाणिकपणे केवळ सिमेंट निर्मितीसाठी झाला. नागपुरात आयबीएमसारखी संस्था आहे; पण त्यांचे काम चांगले नाही, हे खेदाने म्हणावे लागते. विदर्भातील खनिज बाहेर जाऊ देणार नाही, अशी भूमिका घ्या. येथील खनिज उपयोगात आणायचे असेल तर येथेच उद्योग उभारण्याची नीती स्वीकारा, विदर्भात उद्योग, रोजगार वाढतील, असे ते म्हणाले. याप्रसंगी आ. अनिल सोले, नवनीतसिंग तुली प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी अभ्यासक मनोज तिवारी यांनीही अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)