शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

राज व उद्धव ठाकरे यांना विदर्भाचा मुद्दा पटवून देऊ

By admin | Updated: April 30, 2016 06:18 IST

स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा हा शेवटी चर्चेनेच सुटणार आहे. मनसे व शिवसेनेचा याला विरोध आहे.

श्रीहरी अणे : बोलावल्यास चर्चा करण्यास तयारनागपूर : स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा हा शेवटी चर्चेनेच सुटणार आहे. मनसे व शिवसेनेचा याला विरोध आहे. परंतु राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी आपणास बोलावले तर आपण त्यांच्याशी या विषयावर कधीही चर्चा करायला तयार आहोत. विदर्भाचा मुद्दा आपण त्यांना पटवून देऊ, असे राज्याचे माजी महाधिवक्ता व विदर्भवादी नेते अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. विदर्भवादी संघटनांच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांनी त्यांना मनसे व शिवसेनेच्या विरोधाबाबत विचारले असता त्यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. तसेच नीतेश राणे यांनी मुंबईत अणे यांच्याविरोधात लावलेल्या होर्डिंगबाबत विचारणा केली असता त्यांच्याशीही आपण चर्चा करायला तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विदर्भाच्या आंदोलनात हिंसा होऊ नये, असे आमचे म्हणणे आहे. तसा आमचा प्रयत्नसुद्धा राहणार आहे. परंतु कुणी आमच्यावर हल्ला केलाच तर त्याचा प्रतिकार करण्यास आम्ही मागे पुढे पाहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दिल्ली आणि अकोला येथील घटनेने ते स्पष्ट झाले असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्र दिनी संयुक्त महाराष्ट्रवादींचे कार्यक्रम आणि विदर्भवाद्यांचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होणार आहे. त्यात काही अप्रिय घटना घडण्याच्या शक्यतेबाबत विचारले असता अणे यांनी ही बाब स्पष्टपणे नाकारली. आपापले कार्यक्रम करण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. त्यामुळे यात स्पर्धेचा प्रश्नच येत नसल्याचे त्यांनी सांगितले. भाजप केंद्रामध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर बहुमतात आहे. त्यामुळे विदर्भ राज्य निर्माण करण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यासाठी विश्वसनीय पर्यायी दबाव गट निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) मी केवळ लोकांच्या हिताचे प्रश्न मांडत राहणार अ‍ॅड. श्रीहरी अणे यांना नेहमीप्रमाणे ते निवडणूक लढणार का आणि मुख्यमंत्री होणार का? असे प्रश्न विचारण्यात आले. त्याचे उत्तर त्यांनी याही वेळेस नाही असेच दिले. ते म्हणाले, हे प्रश्न मला नेहमीच विचारले जातात. विदर्भाच्या प्रश्नावर निवडणूक लढण्याची वेळ आली तर ती भूमिकाही पार पाडू. परंतु मी व्यक्तिगत निवडणूक लढणार नाही. माझी भूमिका ही राजकीय राहणार नसून ती लोकांच्या हिताचे प्रश्न विचारणारीच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.