शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
3
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ पण मित्रांंसाठी खर्च कराल...
4
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
5
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
6
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
7
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
8
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
9
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
10
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
11
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
12
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
13
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
14
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
15
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
16
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
17
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
18
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
19
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
20
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून

राज व उद्धव ठाकरे यांना विदर्भाचा मुद्दा पटवून देऊ

By admin | Updated: April 30, 2016 06:18 IST

स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा हा शेवटी चर्चेनेच सुटणार आहे. मनसे व शिवसेनेचा याला विरोध आहे.

श्रीहरी अणे : बोलावल्यास चर्चा करण्यास तयारनागपूर : स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा हा शेवटी चर्चेनेच सुटणार आहे. मनसे व शिवसेनेचा याला विरोध आहे. परंतु राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी आपणास बोलावले तर आपण त्यांच्याशी या विषयावर कधीही चर्चा करायला तयार आहोत. विदर्भाचा मुद्दा आपण त्यांना पटवून देऊ, असे राज्याचे माजी महाधिवक्ता व विदर्भवादी नेते अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. विदर्भवादी संघटनांच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांनी त्यांना मनसे व शिवसेनेच्या विरोधाबाबत विचारले असता त्यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. तसेच नीतेश राणे यांनी मुंबईत अणे यांच्याविरोधात लावलेल्या होर्डिंगबाबत विचारणा केली असता त्यांच्याशीही आपण चर्चा करायला तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विदर्भाच्या आंदोलनात हिंसा होऊ नये, असे आमचे म्हणणे आहे. तसा आमचा प्रयत्नसुद्धा राहणार आहे. परंतु कुणी आमच्यावर हल्ला केलाच तर त्याचा प्रतिकार करण्यास आम्ही मागे पुढे पाहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दिल्ली आणि अकोला येथील घटनेने ते स्पष्ट झाले असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्र दिनी संयुक्त महाराष्ट्रवादींचे कार्यक्रम आणि विदर्भवाद्यांचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होणार आहे. त्यात काही अप्रिय घटना घडण्याच्या शक्यतेबाबत विचारले असता अणे यांनी ही बाब स्पष्टपणे नाकारली. आपापले कार्यक्रम करण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. त्यामुळे यात स्पर्धेचा प्रश्नच येत नसल्याचे त्यांनी सांगितले. भाजप केंद्रामध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर बहुमतात आहे. त्यामुळे विदर्भ राज्य निर्माण करण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यासाठी विश्वसनीय पर्यायी दबाव गट निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) मी केवळ लोकांच्या हिताचे प्रश्न मांडत राहणार अ‍ॅड. श्रीहरी अणे यांना नेहमीप्रमाणे ते निवडणूक लढणार का आणि मुख्यमंत्री होणार का? असे प्रश्न विचारण्यात आले. त्याचे उत्तर त्यांनी याही वेळेस नाही असेच दिले. ते म्हणाले, हे प्रश्न मला नेहमीच विचारले जातात. विदर्भाच्या प्रश्नावर निवडणूक लढण्याची वेळ आली तर ती भूमिकाही पार पाडू. परंतु मी व्यक्तिगत निवडणूक लढणार नाही. माझी भूमिका ही राजकीय राहणार नसून ती लोकांच्या हिताचे प्रश्न विचारणारीच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.