शहरं
Join us  
Trending Stories
1
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
2
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
3
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
4
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
5
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
6
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
7
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
8
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
9
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
10
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
11
Operation Sindoor Live Updates: 'आता फक्त पीओके परत करण्यावरच चर्चा होणार'; भारताने प्रस्ताव फेटाळला
12
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
13
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
14
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
15
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
16
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
17
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
18
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
19
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
20
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार

वन्यप्राणी मस्त, वन विभाग सुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:12 IST

चंद्रशेखर दंढारे लाेकमत न्यूज नेटवर्क मेंढला : नरखेड तालुक्यातील मेंढला परिसरात चालू खरीप हंगामात १,१४७ हेक्टरमध्ये खरीप पिकांची पेरणी ...

चंद्रशेखर दंढारे

लाेकमत न्यूज नेटवर्क

मेंढला : नरखेड तालुक्यातील मेंढला परिसरात चालू खरीप हंगामात १,१४७ हेक्टरमध्ये खरीप पिकांची पेरणी व लागवड करण्यात आली आहे. ही पिके माेठी हाेताच वन्यप्राण्यांनी त्यांचा माेर्चा शेतांकडे वळविल्याने, या भागातील ३१८ हेक्टरमधील कपाशी, साेयाबीन व अन्य पिकांची नासाडी केली आहे. शेतकऱ्यांना स्वत:चा जीव धाेक्यात घालून रात्री-बेरात्री अंधारात पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतात जावे लागत असल्याने ते त्रासले आहेत. मात्र, वन विभागाला वन्यप्राण्यांचा बंदाेबस्त करण्याची जाग येत नाही.

या भागातील उमठा, वडविहिरा, मेंढला, वाढोणा, रामठी, हिवरमठ, रामपुरी, उदापूर, बानोरचंद्र, पिंपळदरा, दावसा, थडीपवनी, अंबाडा, सायवाडा या गावातील काही शेती जंगलालगत आहे. यावर्षी या भागात साेयाबीनचा पेरा अधिक तर कपाशीची लागवड तुलनेत कमी आहे. शेतकऱ्यांनी तुरीसह इतर पिकांची पेरणी केली असून, काही शेतकऱ्यांकडे संत्रा व माेसंबीच्या बागाही आहेत.

या शिवारात दरवर्षी राेही व रानडुकरांचा वावर असताे. यावर्षी या वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यांना जंगलात पुरेसे खाद्य मिळत नसल्याने, त्यांनी त्यांचा माेर्चा जंगलालगतच्या शेतातील पिकांकडे वळविला आहे. या प्राण्यांनी शेतातील कपाशी व साेयाबीनसाेबतच संत्रा व माेसंबीच्या झाडांचे नुकसान करायला सुरुवात केली आहे. रबी हंगामात हेच वन्यप्राणी खाद्य व पाण्याच्या शाेधात गावालगतच्या शेतात येतात व संत्रा, माेसंबीच्या बागांसाेबतच रबी पिकांचे नुकसान करतात.

वन्यप्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी अंधारात शेतात जावे लागते. काही शेतकरी शेतातील मचाणावरून पिकाची पाहणी करीत वन्यप्राण्यांवर लक्ष ठेवतात, तर काही शेतकरी रात्रभर जागे राहून शेतात चहुबाजूंनी फिरून लक्ष ठेवतात. अंधारात त्यांना विषारी सापांसह अन्य घातक कीटकांचा दंश हाेण्याची व त्यातून जीव गमावण्याचीही भीती असते. हा संपूर्ण प्रकार लाेकप्रतिनिधींसह वन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती आहे. परंतु, कुणीही वन्यप्राण्यांचा बंदाेबस्त करण्यासाठी पुढाकार घेत नाही, असा आराेप शेतकऱ्यांनी केला आहे.

...

३१८ हेक्टरमधील पिकांचे नुकसान

उमठा परिसरात ८० हेक्टर, वडविहिरा ९० हेक्टर, मेंढला ७५ हेक्टर, वाढोणा ८० हेक्टर, रामठी ५०० हेक्टर, हिवरमठ ८५ हेक्टर, रामपुरी ७० हेक्टर, उदापूर ९० हेक्टर, बानोरचंद्र ७० हेक्टर, पिंपळदरा ७५ हेक्टर अशी एकूण १,१४७ हेक्टर शेती जंगलालगत आहे. या भागात वन्यप्राण्यांचा वावर प्रचंड वाढल्याने, या शिवारातीतील ३१८ हेक्टरमधील साेयाबीन, कपाशी, तूर, उडीद, मूग, बरबटी व अन्य पिकांचे नुकसान केले आहे.

...

तुटपुंजी नुकसान भरपाई

वन विभागाद्वारे या भागातील पिकांच्या नुकसानीची फारशी नुकसान भरपाई दिली जात नाही. वन्यप्राणी पिकांचे किमान एक ते दीड लाख रुपयाचे नुकसान करते. वन कर्मचारी त्यांच्या फुरसतीने पंचनामा करतात आणि सहा ते आठ महिन्यांनी दीड ते दाेन हजार रुपये नुकसान भरपाई देऊन बाेळवण करते, असा आराेपही शेतकऱ्यांनी केला आहे.

...

शिकारीची परवानगी द्या

जंगल व वन्यप्राण्यांच्या रक्षणाची जबाबदारी वन विभागावर साेपविण्यात आली आहे. या विभागाने काेणताही वन्यप्राणी जंगलाच्या बाहेर येणार नाही तसेच ताे पिकाची नासाडी करणार नाही, यादृष्टीने काळजी घेऊन उपाययाेजना करायला पाहिजे. शेतकऱ्याने सापाला मारल्यास वन अधिकारी शेतकऱ्यावर गुन्हे दाखल करतात. त्यामुळे त्यांच्या प्राण्यांचा बंदाेबस्त करावा. ताे करणे शक्य नसल्यास शिकार करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.