शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी हयात, पतीने केलेले दुसरे लग्न निरर्थक

By admin | Updated: August 2, 2015 03:01 IST

पहिल्या लग्नाची पत्नी हयात असताना एका पतीने केलेले दुसरे लग्न कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश सुभाष काफरे यांच्या न्यायालयाने व्यर्थ व निरर्थक ठरवले.

कौटुंबिक न्यायालयाचा निकालराहुल अवसरे नागपूरपहिल्या लग्नाची पत्नी हयात असताना एका पतीने केलेले दुसरे लग्न कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश सुभाष काफरे यांच्या न्यायालयाने व्यर्थ व निरर्थक ठरवले. याचिकाकर्ती महिला वकीलपेठ भागातील रहिवासी असून ती मेयो इस्पितळात परिचारिका आहे. तिने याचिकेत भानखेडा भागात राहणाऱ्या आपल्या पतीला, संगीता नावाच्या एका महिलेला आणि उंटखाना भागात राहणाऱ्या देवानंद नावाच्या इसमाला प्रतिवादी केले होते. कौटुंबिक न्यायालय कायद्याच्या कलम ७ (ए)(बी) अंतर्गत तिने दुसरे लग्न व्यर्थ व निरर्थक जाहीर करण्यात यावे, १७ फेब्रुवारी २०१० रोजीचे विवाह प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे, अशी मागणी याचिकेत केली होती. याचिकाकर्त्या महिलेनुसार तिचे लग्न प्रतिवादी एकसोबत हिंदू रीतीरिवाजाने २८ मे १९९९ रोजी हनुमाननगर येथे झाले होते. तिला जुळ्या मुली आहेत. ३ जुलै २०१२ रोजी संगीता नावाच्या महिलेने तिला मेयो इस्पितळातील तिच्या कार्यालयात एक पत्र पाठविले होते. तुझ्या पतीसोबत माझे १७ फेब्रुवारी २०१० रोजी बुद्धनगर येथील चंद्रमणी पाली बुद्धविहार संस्थेत लग्न झाले आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले होते. पतीने आपणास घटस्फोट न देता केलेले हे लग्न बेकायदेशीर आणि बोगस आहे, चंद्रमणी पाली बुद्धविहार संस्थेने दिलेल्या विवाह प्रमाणपत्राला कायद्यात किंमत नाही, ते निरर्थक आहे. त्यामुळे प्रतिवादी क्रमांक दोन संगीता हिला हे बेकायदेशीर प्रमाणपत्र वापरण्यावर तसेच प्रतिवादी क्रमांक एकच्या नावाचा पती म्हणून वापर करण्यावर कायमचा मनाईहुकूम देण्यात यावा, असे याचिकाकर्तीने याचिकेत नमूद केले होते. याचिकाकर्त्या महिलेच्या पतीने न्यायालयात लेखी उत्तर दाखल केले. लग्न केल्याचा दावा करणारी संगीता ही न्यायालयात हजर झाली. मात्र तिने उत्तरच दाखल केले नाही. देवानंद नावाचा इसमही न्यायालयात हजर झाला नाही. प्रतिवादी पतीने आपला संगीतासोबत कधीही विवाह झाला नाही. विवाह प्रमाणपत्र बनावट व बोगस आहे. याचिकाकर्तीसोबतच आपला विवाह झालेला आहे आणि आपणास दोन मुली आहेत, असेही त्याने उत्तरात स्पष्ट केले. न्यायालयाने सर्व बाजूंचा विचार करीत याचिका मंजूर केली आणि प्रतिवादी क्रमांक एक आणि संगीतामधील विवाह व्यर्थ व निरर्थक आहे, असे जाहीर केले. विवाह प्रमाणपत्रही बेकायदेशीर ठरवले.