शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी आणि प्रियकरानेच जाळले!

By admin | Updated: May 20, 2014 01:05 IST

सर्वत्र खळबळ उडवून देणार्‍या कवलेवाडा येथील दलित व्यक्तीला ज्वलनशील पदार्थ टाकून जिवंत पेटविल्याच्या प्रकरणाने नवीन वळण घेतले. हा प्रकार दलितावरील

 प्रकरणाला वळण : गावकर्‍यांनी जाळल्याचा केवळ होता संशय

गोंदिया : सर्वत्र खळबळ उडवून देणार्‍या कवलेवाडा येथील दलित व्यक्तीला ज्वलनशील पदार्थ टाकून जिवंत पेटविल्याच्या प्रकरणाने नवीन वळण घेतले. हा प्रकार दलितावरील अत्याचाराचा प्रकार नसून जखमी इसमाची पत्नी आणि तिच्या प्रियकरानेच हे कृत्य केल्याचे सोमवारी सायंकाळी पोलिसांनी स्पष्ट केले. जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी सायंकाळी ७.३० वाजता याबाबतचा खुलासा करताना जळाल्याने गंभीर असलेल्या संजय खोब्रागडे (५२) यांची पत्नी देवकाबाई (४५) आणि तिचा प्रियकर राजू गडपायले (४१) यांनीच हे कृत्य केल्याचे सांगितले. संशयावरून रविवारी राजू गडपायले याला ताब्यात घेण्यात आले होते. त्याने चौकशीदरम्यान या कृत्याची कबुली दिली. त्यानंतर सोमवारी देवकाबाईला नागपूर येथून सायंकाळी गोंदियात आणण्यात आले. दोघांनाही अटक करण्यात आली.विशेष म्हणजे गावातील ज्या सहा आरोपींची नावे जखमी संजय खोब्रागडेने घेतली होती, ती केवळ संशयातून घेतली होती. प्रत्यक्ष त्यापैकी कोणालाही त्यांनी पाहिले नव्हते. पोलिसांनी याबाबतची पडताळणी केली असता त्यापैकी काही लोक त्या दिवशी गावातच नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी दुसर्‍या दिशेने तपास सुरू केला आणि हा प्रकार समोर आला. पोलीस अधीक्षक झळके यांच्या मार्गदर्शनाखाली एसडीपीओ गिºहे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक जयेश भांडारकर व त्यांच्या चमूने अहोरात्र परिश्रम घेतल्याने या संवेदनशील प्रकरणाचा छडा लावण्यात यश आले.दरम्यान, राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष सी.एल. थूल आणि माजी मंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी कवलेवाड्यात येऊन घटनास्थळ असलेल्या खोब्रागडे यांच्या घरी आणि ज्या जागेवरून वाद उद्भवला होता त्या जागेची पाहणी केली. त्यानंतर बाह्याबाबा मठाच्या प्रांगणात गावकर्‍यांशी चर्चा केली. यावेळी गावकर्‍यांनी आपली बाजू मांडताना गावातील वातावरण या प्रकरणामुळे कसे कलुषित होत आहे, हे सांगून या प्रकरणाला जातीयवादी रंग देऊ नये आणि खर्‍या आरोपींना हुडकून काढावे, अशी विनंती केली. यानंतर थूल व राऊत यांनी गोंदियातील सुभाष उद्यानात जमलेल्या कवलेवाडा आणि परिसरातील नागरिक तसेच दलित संघटनांच्या पदाधिकार्‍यांशी भेट घेतली. परंतु वेळेअभावी त्या सर्वांचे म्हणणे ऐकून घेणे शक्य नसल्याचे सांगत त्यांनी तेथून काढता पाय घेतल्यामुळे दलित संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी नाराजी व्यक्त केली. (जिल्हा प्रतिनिधी)