शहरं
Join us  
Trending Stories
1
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
2
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
3
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
4
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
5
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
6
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
7
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
8
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
9
पतीशी भांडण करून दुसऱ्या खोलीत झोपली पत्नी; मध्यरात्री पतीला आली जाग, खोलीत डोकावून पाहताच... 
10
आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना भोजन मोफत 
11
'मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी', विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांचा दिवसभरासाठी बहिष्कार
12
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय? फक्त परतावा नका पाहू, 'या' १० गोष्टी तपासाच! अन्यथा पैसे जातील पाण्यात
13
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!
14
'त्या' रात्री काय झालं? पतीला कसं मारलं? बॉयफ्रेंडसोबत पकडल्या गेलेल्या ९ मुलांच्या आईने 'असा' केला गुन्हा कबूल! 
15
कॉलर पकडली, फरफटत नेलं, बेदम मारलं; भाजपा नेत्याच्या समर्थकांची आयुक्तांना मारहाण
16
'आभाळमाया'तील चिंगीला असा मिळाला 'बाजीराव मस्तानी', सेटवर संजय भन्साळी चिडले तेव्हा...
17
फक्त एक फोन लीक झाला अन् 'या' देशाच्या पंतप्रधानांना पदावरून हटवलं; नेमकं काय घडलं?
18
कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग! 'डीके शिवकुमार यांच्यासोबत १०० आमदार'; नेत्याच्या दाव्यामुळे हायकमांड बंगळुरुमध्ये पोहोचले
19
Shefali Jariwala : "परागला चौकशीला जावं लागेल", शेफालीच्या मैत्रिणीनं पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केले खुलासे, म्हणाली - "काहीतरी गडबड.."
20
"केंद्रात सत्ता येताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणार’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत 

-तर अधिवेशन घेताच कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 19:49 IST

केवळ सहा दिवसासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्याऐवजी अधिवेशन भरवताच कशाला, असा प्रश्न उपस्थित करीत अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देअधिवेशनाचा कालावधी वाढायलाच हवा : लोकप्रतिनिधींची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : येत्या १६ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. यंदाचे अधिवेशन हे केवळ सहा दिवसाचे आहे. १६ ते २१ डिसेंबर असा एक आठवड्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. या सहा दिवसात विदर्भातील प्रश्नांना किती न्याय मिळणार, हा प्रश्नच आहे. यातही प्रश्नोत्तरे राहणार नाहीत. त्यामुळे ‘लोकमत’ने या विषयाकडे नागरिकांचे लक्ष वेधण्यासाठी विशेष वृत्त प्रकाशित करीत केवळ सहा दिवसासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्याऐवजी अधिवेशन भरवताच कशाला, असा प्रश्न उपस्थित करीत अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. शहरातील विविध पक्षातील आमदार व लोकप्रतिनिधींनी या वृत्ताची गंभीर दखल घेतली. यावेळी ‘लोकमत’शी बोलताना अधिवेशनाचा कालावधी हा वाढायलाच हवा, असा बहुतांश आमदार व लोकप्रतिनिधींचा आग्रह होता.विदर्भाच्या प्रश्नांबाबत सरकार गंभीर नाहीमहाविकास आघाडीच्या सरकारने पूर्ण तयारी न करता घाईगर्दीने अधिवेशन भरवले आहे. एका आठवड्याचे अधिवेशन हे केवळ विदर्भाच्या तोंडाल पाने पुसण्याचा प्रयत्न आहे. ही केवळ औपचारिकता असून विदर्भाच्या प्रश्नांबाबत सरकार गंभीर नाही, असे दिसून येते. विदर्भाच्या प्रश्नांना न्याय द्यायचा असेल तर अधिवेशनाचा कालावधी वाढायलाच हवा.आ. अनिल सोले, भाजपगरज भासली तर कालावधी वाढेलनागपूर कराराप्रमाणे अधिवेशन व्हायला पाहिजे. पण निवडणुकीनंतर भाजपच्या भूमिकेमुळे सरकार स्थापनेला विलंब झाला. त्यामुळे नव्या सरकारला अधिवेशनाच्या तयारीसाठी मिळालेला वेळ अपुरा आहे. आमदारांचे प्रश्नही पुरेसे आलेले नाहीत. विदर्भाचे प्रश्न सोडविण्यासाठी अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याचे काम पडले तर निश्चितच अधिवेशनाचा कालावधी वाढविला जाईल. सामान्य, नागरिक व शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नाला सरकार न्याय देईल, याची खात्री आहे.दुनेश्वर पेठे, गटनेते, राष्ट्रवादी काँग्रेसनागपूर कराराचे पालन व्हावेमुंबई पुण्याचे पुढारी विदर्भाच्या विकासाबाबत नेहमीच उदासीन असतात. सहा दिवसाचे अधिवेशन हे ऐकायलाच बरे वाटत नाही. सहा दिवसात करणार तरी काय? येथील प्रश्नांना कसा न्याय मिळणार? नागपूर कराराचे पालन होणे गरजचे आहे. त्यानुसार खास विदर्भाच्या प्रश्नांसाठीच अधिवेशन घेण्याची आवश्यकता आहे. सहा दिवसाचा हा कालावधी वाढावा, अन्यथा अधिवेशन भरवताच कशाला?बाळू घरडे, शहराध्यक्ष, रिपाइं (आ)

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनnagpurनागपूर