शहरं
Join us  
Trending Stories
1
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
2
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
3
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
4
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
5
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
6
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
7
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
8
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
9
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
10
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
11
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
12
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
13
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
14
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
15
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
16
भोजपुरी स्टार पवन सिंहची पत्नी ज्योती यांनी भरला नामांकन अर्ज, कुठल्या पक्षाकडून लढणार?
17
EDला सापडले २५० पासपोर्ट, ७ पाकिस्तानी नागरिकांचा शोध सुरू, बंगाल कनेक्शन समोर   
18
"गेल्या १० वर्षात साबणाला हातही लावला नाही"; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं 'बाथरूम सीक्रेट'
19
१५ वर्षांनी लहान पुतण्यावर जडला २ मुलांच्या आईचा जीव; नकार देताच पोलिसांसमोर भयंकर कृत्य
20
दिवाळीच्या फटाक्यांमुळे कार किंवा बाइकला आग लागली तर इन्शुरन्स क्लेम करू शकता का? जाणून घ्या

-तर अधिवेशन घेताच कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 19:49 IST

केवळ सहा दिवसासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्याऐवजी अधिवेशन भरवताच कशाला, असा प्रश्न उपस्थित करीत अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देअधिवेशनाचा कालावधी वाढायलाच हवा : लोकप्रतिनिधींची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : येत्या १६ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. यंदाचे अधिवेशन हे केवळ सहा दिवसाचे आहे. १६ ते २१ डिसेंबर असा एक आठवड्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. या सहा दिवसात विदर्भातील प्रश्नांना किती न्याय मिळणार, हा प्रश्नच आहे. यातही प्रश्नोत्तरे राहणार नाहीत. त्यामुळे ‘लोकमत’ने या विषयाकडे नागरिकांचे लक्ष वेधण्यासाठी विशेष वृत्त प्रकाशित करीत केवळ सहा दिवसासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्याऐवजी अधिवेशन भरवताच कशाला, असा प्रश्न उपस्थित करीत अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. शहरातील विविध पक्षातील आमदार व लोकप्रतिनिधींनी या वृत्ताची गंभीर दखल घेतली. यावेळी ‘लोकमत’शी बोलताना अधिवेशनाचा कालावधी हा वाढायलाच हवा, असा बहुतांश आमदार व लोकप्रतिनिधींचा आग्रह होता.विदर्भाच्या प्रश्नांबाबत सरकार गंभीर नाहीमहाविकास आघाडीच्या सरकारने पूर्ण तयारी न करता घाईगर्दीने अधिवेशन भरवले आहे. एका आठवड्याचे अधिवेशन हे केवळ विदर्भाच्या तोंडाल पाने पुसण्याचा प्रयत्न आहे. ही केवळ औपचारिकता असून विदर्भाच्या प्रश्नांबाबत सरकार गंभीर नाही, असे दिसून येते. विदर्भाच्या प्रश्नांना न्याय द्यायचा असेल तर अधिवेशनाचा कालावधी वाढायलाच हवा.आ. अनिल सोले, भाजपगरज भासली तर कालावधी वाढेलनागपूर कराराप्रमाणे अधिवेशन व्हायला पाहिजे. पण निवडणुकीनंतर भाजपच्या भूमिकेमुळे सरकार स्थापनेला विलंब झाला. त्यामुळे नव्या सरकारला अधिवेशनाच्या तयारीसाठी मिळालेला वेळ अपुरा आहे. आमदारांचे प्रश्नही पुरेसे आलेले नाहीत. विदर्भाचे प्रश्न सोडविण्यासाठी अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याचे काम पडले तर निश्चितच अधिवेशनाचा कालावधी वाढविला जाईल. सामान्य, नागरिक व शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नाला सरकार न्याय देईल, याची खात्री आहे.दुनेश्वर पेठे, गटनेते, राष्ट्रवादी काँग्रेसनागपूर कराराचे पालन व्हावेमुंबई पुण्याचे पुढारी विदर्भाच्या विकासाबाबत नेहमीच उदासीन असतात. सहा दिवसाचे अधिवेशन हे ऐकायलाच बरे वाटत नाही. सहा दिवसात करणार तरी काय? येथील प्रश्नांना कसा न्याय मिळणार? नागपूर कराराचे पालन होणे गरजचे आहे. त्यानुसार खास विदर्भाच्या प्रश्नांसाठीच अधिवेशन घेण्याची आवश्यकता आहे. सहा दिवसाचा हा कालावधी वाढावा, अन्यथा अधिवेशन भरवताच कशाला?बाळू घरडे, शहराध्यक्ष, रिपाइं (आ)

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनnagpurनागपूर