शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

लहानग्यांच्या जीवाशी का खेळता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:08 IST

नागपूर : देशपातळीवरील प्रमुख परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलल्या. विद्यापीठाच्या परीक्षाही ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या ...

नागपूर : देशपातळीवरील प्रमुख परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलल्या. विद्यापीठाच्या परीक्षाही ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. मग पाचवी आणि आठव्या वर्गासाठी शिष्यवृत्तीच्या ऑफलाईन परीक्षा घेऊन परीक्षा परिषद काय साध्य करणार आहे. परीक्षेच्या नावावर लहानग्यांच्या जीवाशी का खेळले जात आहे, असा सवाल शिक्षक संघटनांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला केला आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे २३ मे रोजी होणारी पाचवी व आठवीची शिष्यवृत्तीची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने शासनाला तीन पत्रे देऊन विनंती केली. मात्र शासनाकडून अजूनही कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. उलट गुरुवारी परीक्षा परिषदेने ५ मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी पर्यवेक्षण व अन्य बाबींचे नियोजन करण्याविषयीचे पत्र पाठवून संभ्रम वाढवला आहे. राज्यभरात एकूण सहा लाखाहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. एका परीक्षा केंद्रावर २०० ते ५०० परीक्षार्थी असतात. तेवढ्याच प्रमाणात पर्यवेक्षक व इतर कर्मचारी यांची नियुक्ती करावी लागते. एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑफलाईन परीक्षा कोरोनाच्या काळात घेणे, खरंच आवश्यक आहे का? असा सवाल संघटनेने केला आहे. शिष्यवृत्तीची परीक्षा स्थगित करण्यात यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष धनराज बोडे यांनी केली आहे.

- परीक्षा पुढे न ढकलल्यास किंवा मे महिन्यात शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा अट्टाहास कायम ठेवल्यास विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर, पालक यांच्या आरोग्यासाठी शिक्षक परिषद परीक्षेवर बहिष्कार घालणार.

योगेश बन, कार्यवाह, महाराष्ट राज्य शिक्षक परिषद