शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

बोर्ड ऑफ डायरेक्टरवर कारवाई का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : समता प्रतिष्ठान हे कंपनी कायद्यानुसार नोंदणीकृत आहे. याचे सर्व निर्णय हे बोर्ड ऑफ डायरेक्टर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : समता प्रतिष्ठान हे कंपनी कायद्यानुसार नोंदणीकृत आहे. याचे सर्व निर्णय हे बोर्ड ऑफ डायरेक्टर यांनी घेतले आहेत. त्यामुळे या कार्यालयातील सर्व व्यवहारांसाठी निर्णय घेणारेच खरे दोषी आहेत. तेव्हा त्यांच्यावर कारवाई का नाही? असा सवाल विविध संघटनांनी उपस्थित केला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानअंतर्गत मागच्या सरकारच्या काळात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणाची प्रतिष्ठानातील १३ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. परंतु राज्य सरकारच्या या कारवाईवर विविध सामाजिक संघटनांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. सामाजिक कार्यकर्ते अतुल खोब्रागडे यांचे म्हणणे आहे की, सरकारने ज्यांच्यावर कारवाई केली ते अधिकारी-कर्मचारी कंत्राटी आहेत. मुळात प्रतिष्ठान ही एक कंपनी आहे. त्याचे निर्णय घेण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे. तेच निर्णय घेतात. तेव्हा यात झालेल्या चुकीसाठी सर्वस्वी तेच जबाबदार ठरतील. परंतु सरकारने त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी कंत्राटी तत्त्वावर नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे शासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होतो.

रिपाइंचे संजय पाटील यांनीसुद्धा जी कारवाई झाली त्याची चौकशी कधी झाली असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, समता प्रतिष्ठानमधील विविध कामात गैरव्यवहार झाल्यासंदर्भात मी स्वत: तक्रार करून चौकशीची मागणी केली. परंतु त्या चौकशीचे काय झाले हे अद्याप समजले नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

बॉक्स

ते निलंबित कर्मचारी कार्यमुक्त

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी समता प्रतिष्ठानच्या १३ अधिकारी-कर्मचाऱ्यांना बुधवारी निलंबित करण्याची घोषणा केली. त्यातील १२ अधिकारी-कर्मचाऱ्यांना गुरुवारी कार्यमुक्त करण्यात येत असल्याचे आदेश मिळाले आहेत. हे सर्व कंत्राटी होते. उर्वरित एका अधिकाऱ्याच्या कार्यमुक्ततेचे आदेश लवकरच येणार असल्याचे सांगितले जाते.