शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

नागपुरातच बस्तान कशासाठी?

By admin | Updated: June 19, 2015 02:36 IST

कारागृहात बसूनच खतरनाक गुन्हेगार बाहेर असलेल्या आपल्या साथीदारांमार्फत खंडणी वसूल करू लागले.

निलंबित कांबळेंचे कारागृह परिसरातच ‘वैभव’!नागपूर : कारागृहात बसूनच खतरनाक गुन्हेगार बाहेर असलेल्या आपल्या साथीदारांमार्फत खंडणी वसूल करू लागले. ऐषोआरामाच्या साऱ्याच सुविधा मिळत असल्याने गुन्हेगारांसाठी कारागृहाच्या आत-बाहेरचा फरकच उरला नाही. परिणामी नागपुरातील गुन्हेगारी प्रचंड वाढली. दुसरीकडे कारागृहातील गुन्हेगार कमालीचे निर्ढावले. त्यांनी काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून ‘जेल ब्रेक’ घडवून आणले. ३१ मार्चच्या पहाटे पाच खतरनाक गुन्हेगार कारागृहातून पळून गेले. या घटनेमुळे कारागृह प्रशासनाची लक्तरे अक्षरश: वेशीवर टांगली गेली. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत सर्वप्रथम कारागृह अधीक्षक वैभव कांबळेंना निलंबित केले. त्यानंतर पाच कर्मचारी आणि चार अधिकारी आणखी निलंबित झाले. एका कर्मचाऱ्याला सेवेतूनच बडतर्फ करण्यात आले. सरकारने या घटनेची चौकशी करण्यासाठी एसीबीचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या नेतृत्वात एक उच्चस्तरीय समिती नियुक्त केली.या समितीने सरकारला काय अहवाल दिला ते कळायला मार्ग नाही. मात्र, निलंबित कांबळेची उर्मटगिरी अद्याप सुरूच असल्याचे पुन्हा एका उदाहरणावरून स्पष्ट झाले आहे. कांबळे यांना सरकारने निलंबित करून आज ७९ दिवसांचा कालावधी झाला. मात्र, कांबळेचे बस्तान हलले नाही. वरिष्ठ पातळीवरून झालेल्या चौकशीत काही गंभीर गैरप्रकार अधोरेखित झाल्यामुळे कांबळेचे मुख्यालय स्थानांतरित करण्याची तयारी झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, कारागृह प्रशासन आणि गृह खात्यातील वरिष्ठांनी घेतलेल्या निर्णयानुसार कांबळेंना कोल्हापूर मुख्यालय देण्यात आले. या निर्णयाच्या आदेशाला आता १० ते १५ दिवस झाले आहे. मात्र, कांबळेंनी हा आदेश मानण्यास नकार दिल्याचे समजते. त्यांनी कोल्हापूरला जाण्याऐवजी आपले बस्तान नागपुरातच ठेवले आहे. (प्रतिनिधी)