शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
4
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
5
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
6
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
7
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
8
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
9
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
10
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
11
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
12
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
13
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
14
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
15
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
16
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
17
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
18
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
19
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
20
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...

नागपुरातच बस्तान कशासाठी?

By admin | Updated: June 19, 2015 02:36 IST

कारागृहात बसूनच खतरनाक गुन्हेगार बाहेर असलेल्या आपल्या साथीदारांमार्फत खंडणी वसूल करू लागले.

निलंबित कांबळेंचे कारागृह परिसरातच ‘वैभव’!नागपूर : कारागृहात बसूनच खतरनाक गुन्हेगार बाहेर असलेल्या आपल्या साथीदारांमार्फत खंडणी वसूल करू लागले. ऐषोआरामाच्या साऱ्याच सुविधा मिळत असल्याने गुन्हेगारांसाठी कारागृहाच्या आत-बाहेरचा फरकच उरला नाही. परिणामी नागपुरातील गुन्हेगारी प्रचंड वाढली. दुसरीकडे कारागृहातील गुन्हेगार कमालीचे निर्ढावले. त्यांनी काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून ‘जेल ब्रेक’ घडवून आणले. ३१ मार्चच्या पहाटे पाच खतरनाक गुन्हेगार कारागृहातून पळून गेले. या घटनेमुळे कारागृह प्रशासनाची लक्तरे अक्षरश: वेशीवर टांगली गेली. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत सर्वप्रथम कारागृह अधीक्षक वैभव कांबळेंना निलंबित केले. त्यानंतर पाच कर्मचारी आणि चार अधिकारी आणखी निलंबित झाले. एका कर्मचाऱ्याला सेवेतूनच बडतर्फ करण्यात आले. सरकारने या घटनेची चौकशी करण्यासाठी एसीबीचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या नेतृत्वात एक उच्चस्तरीय समिती नियुक्त केली.या समितीने सरकारला काय अहवाल दिला ते कळायला मार्ग नाही. मात्र, निलंबित कांबळेची उर्मटगिरी अद्याप सुरूच असल्याचे पुन्हा एका उदाहरणावरून स्पष्ट झाले आहे. कांबळे यांना सरकारने निलंबित करून आज ७९ दिवसांचा कालावधी झाला. मात्र, कांबळेचे बस्तान हलले नाही. वरिष्ठ पातळीवरून झालेल्या चौकशीत काही गंभीर गैरप्रकार अधोरेखित झाल्यामुळे कांबळेचे मुख्यालय स्थानांतरित करण्याची तयारी झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, कारागृह प्रशासन आणि गृह खात्यातील वरिष्ठांनी घेतलेल्या निर्णयानुसार कांबळेंना कोल्हापूर मुख्यालय देण्यात आले. या निर्णयाच्या आदेशाला आता १० ते १५ दिवस झाले आहे. मात्र, कांबळेंनी हा आदेश मानण्यास नकार दिल्याचे समजते. त्यांनी कोल्हापूरला जाण्याऐवजी आपले बस्तान नागपुरातच ठेवले आहे. (प्रतिनिधी)