शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
4
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
5
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
6
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
7
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
8
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
9
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
10
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
11
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
12
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
13
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
14
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
15
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
16
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
17
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
18
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
19
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
20
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले

चौकशीचे नुसते सोपस्कार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:36 IST

नागपूर : सलग चार दिवसांपासून लोकमतने नारायणा ई-टेक्नो स्कूलच्या बोगसगिरीचे पुरावे समाजापुढे ठेवले. शेकडो पालकांची या शाळेने कोट्यावधी ...

नागपूर : सलग चार दिवसांपासून लोकमतने नारायणा ई-टेक्नो स्कूलच्या बोगसगिरीचे पुरावे समाजापुढे ठेवले. शेकडो पालकांची या शाळेने कोट्यावधी रुपयांची लूट करून, विद्यार्थ्यांचे भवितव्यही अंधारात घातले. शाळेच्या या वृत्तमालिकेतून अख्ख्या शिक्षण विभागाला त्यांच्या नाकार्तेपणाची जाणीव करून दिली. पण शिक्षण विभागाने सोपस्कार म्हणून चौकशी समिती गठित करून हात वर केले.

शिक्षण विभागच नाही, तर गेल्या चार दिवसांपासून लोकमतने ठळकपणे वृत्त प्रकाशित केल्यानंतरही शिक्षक, विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधीही गप्प बसले. दोन दिवस मुंबईत हिवाळी अधिवेशन पार पडले. यात जिल्ह्यातील एकाही आमदारांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रश्न उपस्थित केला नाही. शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नागपूर बोर्डातून स्कूल इंडेक्ससाठी १० हजार रुपयांची लाच घेत असल्याच्या वृत्ताची दखल घेऊन बोर्डाला चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्यांनीही ९०० विद्यार्थ्यांच्या या प्रकरणात कुठलीही भूमिका घेतली नाही. स्थानिक शिक्षक आमदार गेल्या दोन दिवसांपासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काढलेला शासन निर्णय रद्द करावा यासाठी शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी कार्यालयापुढे जीआर जाळून आंदोलन करीत आहे. त्यांना शाळेने विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलल्याची जाणीव झाली नाही. ज्या पूर्व नागपूर विधानसभा मतदार संघात ही शाळा आहे. बहुतांश पालक त्यांच्यात मतदार संघातील आहे. त्या आमदारांनीही पालकांच्या झालेल्या फसवणुकीचा जाब सरकारला मागितला नाही. एरवी लहानसहान प्रकरणात जातीने लक्ष घालणाऱ्या शिक्षण मंत्र्यांनी या प्रकरणाचा साधा आढावाही घेतला नाही.

लोकप्रतिनिधीकडून दखलच घेण्यात आली नसल्याने, या प्रकरणी अधिकाऱ्यांवरही दबाव निर्माण झाला नाही. त्यामुळे या प्रकरणाची तीव्रता कमी करण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी उपशिक्षणाधिकाऱ्यांची समिती गठित करून चौकशीचे सोपस्कार पार पाडले. लोकमतने फसवणुकीचे सर्व पुरावे समाजापुढे मांडले असताना, क्विक अ‍ॅक्शन घेण्यास शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकाऱ्यांनी, विदर्भातील राज्यमंत्र्यांनी का माघार घेतली, असा सवाल संतप्त पालक करीत आहे.

- पुन्हा चौकशीचा अर्थ काय?

नारायणा ई-टेक्नो शाळेला मान्यताच नसल्यासंदर्भात आरटीई फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिन काळबांडे यांनी शिक्षण मंत्रालयात तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीवर शिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशी समिती गठित करून शाळेची चौकशीही केली होती. या चौकशी अहवालावर काहीही कारवाई झाली नाही. महापालिका व शिक्षण विभागात हा चौकशी अहवाल पडून आहे. अशात पुन्हा चौकशी करण्याचे औचित्य काय, असा सवाल फाऊंडेशनचे काळबांडे यांनी केला आहे. शिक्षणाधिकाऱ्यांकडून हे प्रकरण दाबण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.