शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
4
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
5
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
6
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
7
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
8
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
9
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
10
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
11
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
12
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
13
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
14
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
15
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
16
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
17
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
18
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
20
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा

मराठी ही देशाची संपर्क भाषा का ठरू नये? विदर्भ साहित्य संमेलनाध्यक्षांचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2021 07:20 IST

Nagpur News मराठी ही देशाची संपर्क भाषा का ठरू नये, असा प्रश्न ६७ व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून संमेलनाध्यक्ष डॉ. मधुकर जोशी यांनी उपस्थित केला.

ठळक मुद्देमराठीचे संत साहित्य हे देश्य साहित्यच!

गोपालकृष्ण मांडवकर

हिंगणा (जि. नागपूर) : विवेकसिंधू, लीळाचरित्र आदी ग्रंथ विदर्भातच उदयास आले. मुकुंदराज, लीळाचरित्र आणि ज्ञानेश्वर यांच्या संतपरंपरेत वैदर्भीय रीती रूपांतरित होऊन देश्य साहित्याला तिने नामरूप दिले. कोणतीही मदत न घेता तत्कालीन संतांनी साहित्यातून ५ ते ७ राज्यांत मराठी भाषा पोहोचविली. सातवहन, वाकाटक व विदर्भातील राष्ट्रकूट या तीन राजवंशांचा इ.स. १ ते ८०० या काळातील इतिहास तपासला तर राजवंशाचे प्रकृत भाषेतील शिलालेख आणि साहित्यकृतीतून सादर झालेली महाराष्ट्र भाषा यातून हेच दिसेल. हा विचार केला तर मराठी ही देशाची संपर्क भाषा का ठरू नये, असा प्रश्न ६७ व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून संमेलनाध्यक्ष डॉ. मधुकर जोशी यांनी उपस्थित केला. (Vidarbha Sahitya Sammelan)

हिंगणा येथील संत गाडगे महाराज महाविद्यालयाच्या वतीने शुक्रवारपासून दोन दिवसीय साहित्य संमेलनाला संत साहित्य आणि प्राचीन मराठी साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक-संशोधक डॉ. मधुकर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली प्रारंभ झाला. संमेलनाचे उद्घाटन विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांच्या हस्ते झाले. पूर्वाध्यक्ष डॉ. शिरीष देशपांडे, स्वागताध्यक्ष आमदार विकास ठाकरे आदी उपस्थित होते.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात ते म्हणाले, हा मुद्दा कायदा व संविधानाशी संबंधित आहे. असे असले तरी भारतीय भाषा, भारतातील विविध प्रांत देश व त्यांच्या भाषा आणि भारताला जोडणाऱ्या भाषा हे चित्र नीट तपासले जावे. जे ग्रंथ, ग्रंथकार आणि त्यांच्या रचना या भूमीच्या प्राकृत धर्माशी, सांस्कृतिक जीवनधारेशी आणि मूल्यपरंपरेशी संबंधित आहेत. ते देश्य साहित्य असून, त्याच्या कक्षा केवळ एक प्रदेश वा एक प्रांत नसून संपूर्ण भारतवर्ष आहे. त्या परंपरेशी नाळ जोडणाऱ्या वैदर्भीय रीतीचा उद्घोष करणारे आहे. देश्य साहित्याची ही भूमिका मान्य केली, तर मराठी वाङ्मय क्षेत्रातील अनेक समस्यांची आणि प्रश्नांची उकल आपोआप होईल. विदर्भ साहित्य संघ त्यासाठी आग्रह धरणार आहे का, आपण यात कुठे कमी पडतो याचा विचार करणार आहे का, असा आव्हानात्मक प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

डॉ. रवींद्र शोभणे म्हणाले, ग्रामीण अनुभव घेऊन येणाऱ्या लेखकांचे साहित्य कसदार आणि अनुभव संपन्न असते. यामुळे नवसाहित्यिकांचा सृजनाला आकार देण्यासाठी ग्रामीण भागात साहित्य संमेलने घडण्याची गरज आहे.

टॅग्स :literatureसाहित्यMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन