शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

मराठी ही देशाची संपर्क भाषा का ठरू नये? विदर्भ साहित्य संमेलनाध्यक्षांचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2021 07:20 IST

Nagpur News मराठी ही देशाची संपर्क भाषा का ठरू नये, असा प्रश्न ६७ व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून संमेलनाध्यक्ष डॉ. मधुकर जोशी यांनी उपस्थित केला.

ठळक मुद्देमराठीचे संत साहित्य हे देश्य साहित्यच!

गोपालकृष्ण मांडवकर

हिंगणा (जि. नागपूर) : विवेकसिंधू, लीळाचरित्र आदी ग्रंथ विदर्भातच उदयास आले. मुकुंदराज, लीळाचरित्र आणि ज्ञानेश्वर यांच्या संतपरंपरेत वैदर्भीय रीती रूपांतरित होऊन देश्य साहित्याला तिने नामरूप दिले. कोणतीही मदत न घेता तत्कालीन संतांनी साहित्यातून ५ ते ७ राज्यांत मराठी भाषा पोहोचविली. सातवहन, वाकाटक व विदर्भातील राष्ट्रकूट या तीन राजवंशांचा इ.स. १ ते ८०० या काळातील इतिहास तपासला तर राजवंशाचे प्रकृत भाषेतील शिलालेख आणि साहित्यकृतीतून सादर झालेली महाराष्ट्र भाषा यातून हेच दिसेल. हा विचार केला तर मराठी ही देशाची संपर्क भाषा का ठरू नये, असा प्रश्न ६७ व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून संमेलनाध्यक्ष डॉ. मधुकर जोशी यांनी उपस्थित केला. (Vidarbha Sahitya Sammelan)

हिंगणा येथील संत गाडगे महाराज महाविद्यालयाच्या वतीने शुक्रवारपासून दोन दिवसीय साहित्य संमेलनाला संत साहित्य आणि प्राचीन मराठी साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक-संशोधक डॉ. मधुकर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली प्रारंभ झाला. संमेलनाचे उद्घाटन विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांच्या हस्ते झाले. पूर्वाध्यक्ष डॉ. शिरीष देशपांडे, स्वागताध्यक्ष आमदार विकास ठाकरे आदी उपस्थित होते.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात ते म्हणाले, हा मुद्दा कायदा व संविधानाशी संबंधित आहे. असे असले तरी भारतीय भाषा, भारतातील विविध प्रांत देश व त्यांच्या भाषा आणि भारताला जोडणाऱ्या भाषा हे चित्र नीट तपासले जावे. जे ग्रंथ, ग्रंथकार आणि त्यांच्या रचना या भूमीच्या प्राकृत धर्माशी, सांस्कृतिक जीवनधारेशी आणि मूल्यपरंपरेशी संबंधित आहेत. ते देश्य साहित्य असून, त्याच्या कक्षा केवळ एक प्रदेश वा एक प्रांत नसून संपूर्ण भारतवर्ष आहे. त्या परंपरेशी नाळ जोडणाऱ्या वैदर्भीय रीतीचा उद्घोष करणारे आहे. देश्य साहित्याची ही भूमिका मान्य केली, तर मराठी वाङ्मय क्षेत्रातील अनेक समस्यांची आणि प्रश्नांची उकल आपोआप होईल. विदर्भ साहित्य संघ त्यासाठी आग्रह धरणार आहे का, आपण यात कुठे कमी पडतो याचा विचार करणार आहे का, असा आव्हानात्मक प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

डॉ. रवींद्र शोभणे म्हणाले, ग्रामीण अनुभव घेऊन येणाऱ्या लेखकांचे साहित्य कसदार आणि अनुभव संपन्न असते. यामुळे नवसाहित्यिकांचा सृजनाला आकार देण्यासाठी ग्रामीण भागात साहित्य संमेलने घडण्याची गरज आहे.

टॅग्स :literatureसाहित्यMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन