शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मराठी ही देशाची संपर्क भाषा का ठरू नये? विदर्भ साहित्य संमेलनाध्यक्षांचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2021 07:20 IST

Nagpur News मराठी ही देशाची संपर्क भाषा का ठरू नये, असा प्रश्न ६७ व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून संमेलनाध्यक्ष डॉ. मधुकर जोशी यांनी उपस्थित केला.

ठळक मुद्देमराठीचे संत साहित्य हे देश्य साहित्यच!

गोपालकृष्ण मांडवकर

हिंगणा (जि. नागपूर) : विवेकसिंधू, लीळाचरित्र आदी ग्रंथ विदर्भातच उदयास आले. मुकुंदराज, लीळाचरित्र आणि ज्ञानेश्वर यांच्या संतपरंपरेत वैदर्भीय रीती रूपांतरित होऊन देश्य साहित्याला तिने नामरूप दिले. कोणतीही मदत न घेता तत्कालीन संतांनी साहित्यातून ५ ते ७ राज्यांत मराठी भाषा पोहोचविली. सातवहन, वाकाटक व विदर्भातील राष्ट्रकूट या तीन राजवंशांचा इ.स. १ ते ८०० या काळातील इतिहास तपासला तर राजवंशाचे प्रकृत भाषेतील शिलालेख आणि साहित्यकृतीतून सादर झालेली महाराष्ट्र भाषा यातून हेच दिसेल. हा विचार केला तर मराठी ही देशाची संपर्क भाषा का ठरू नये, असा प्रश्न ६७ व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून संमेलनाध्यक्ष डॉ. मधुकर जोशी यांनी उपस्थित केला. (Vidarbha Sahitya Sammelan)

हिंगणा येथील संत गाडगे महाराज महाविद्यालयाच्या वतीने शुक्रवारपासून दोन दिवसीय साहित्य संमेलनाला संत साहित्य आणि प्राचीन मराठी साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक-संशोधक डॉ. मधुकर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली प्रारंभ झाला. संमेलनाचे उद्घाटन विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांच्या हस्ते झाले. पूर्वाध्यक्ष डॉ. शिरीष देशपांडे, स्वागताध्यक्ष आमदार विकास ठाकरे आदी उपस्थित होते.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात ते म्हणाले, हा मुद्दा कायदा व संविधानाशी संबंधित आहे. असे असले तरी भारतीय भाषा, भारतातील विविध प्रांत देश व त्यांच्या भाषा आणि भारताला जोडणाऱ्या भाषा हे चित्र नीट तपासले जावे. जे ग्रंथ, ग्रंथकार आणि त्यांच्या रचना या भूमीच्या प्राकृत धर्माशी, सांस्कृतिक जीवनधारेशी आणि मूल्यपरंपरेशी संबंधित आहेत. ते देश्य साहित्य असून, त्याच्या कक्षा केवळ एक प्रदेश वा एक प्रांत नसून संपूर्ण भारतवर्ष आहे. त्या परंपरेशी नाळ जोडणाऱ्या वैदर्भीय रीतीचा उद्घोष करणारे आहे. देश्य साहित्याची ही भूमिका मान्य केली, तर मराठी वाङ्मय क्षेत्रातील अनेक समस्यांची आणि प्रश्नांची उकल आपोआप होईल. विदर्भ साहित्य संघ त्यासाठी आग्रह धरणार आहे का, आपण यात कुठे कमी पडतो याचा विचार करणार आहे का, असा आव्हानात्मक प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

डॉ. रवींद्र शोभणे म्हणाले, ग्रामीण अनुभव घेऊन येणाऱ्या लेखकांचे साहित्य कसदार आणि अनुभव संपन्न असते. यामुळे नवसाहित्यिकांचा सृजनाला आकार देण्यासाठी ग्रामीण भागात साहित्य संमेलने घडण्याची गरज आहे.

टॅग्स :literatureसाहित्यMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन