शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये सभागृहाचा आग्रह कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:08 IST

मनपात संक्रमणाचा धोका : ऑनलाइन सभा असली तरी मुख्यालयात गर्दी होणारच लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहरात कोरोना ...

मनपात संक्रमणाचा धोका : ऑनलाइन सभा असली तरी मुख्यालयात गर्दी होणारच

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता वाढली आहे. शनिवारी तब्बल २२६१ पॉझिटिव्ह आलेत. संक्रमणाला आळा घालण्यासाठी १५ ते २१ मार्चदरम्यान लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. पुढील काही दिवस बाधितांचा आकडा कमी होण्याची शक्यता नाही. मनपाची यंत्रणा कोविड नियंत्रणाच्या कामात व्यस्त आहे. दुसरीकडे १९ मार्चला मनपाची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. सभा ऑनलाइन असली तरी मुख्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची गर्दी होणारच. यातून संक्रमणाचा धोका आहे. असे असतानाही लॉकडाऊन कालावधीत सभागृहाचा आग्रह कशासाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मागील वर्षी कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लॉकडाऊन कालावधीत तीन ते चार महिने सभेला परवानगी दिली नव्हती. सध्या अशीच गंभीर परिस्थिती आहे.

कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर महिना-दोन महिन्यांनी सभा घेतली तर विकासाला फार मोठा फटका बसेल अशी परिस्थिती नाही. सभा ऑनलाइन असली तरी नेटवर्कमुळे अनेक पदाधिकारी मनपा मुख्यालयात आपल्या कक्षात बसून सभेच्या कामकाजात सहभाग घेतात. तसेही ऑनलाइन सभेत नगरसेवकांना आपल्या प्रभागातील समस्या मांडता येत नाही. नगरसेवक बोलायला लागले की त्यांना म्युट केले जाते. अशा स्वरूपाच्या तक्रारी आहेत. ऑनलाइन सभेत समस्या मांडता येत नसल्याने ऑफलाइन सभागृह घेण्याला राज्य सरकारने अनुमती द्यावी, यासाठी पक्षनेते अविनाश ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे.

ऑनलाइन सभेमुळे मागील काही महिन्यांत सभागृहात नगरसेवकांच्या प्रश्नावर चर्चा झालेली नाही. अनेकदा नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केला की नेटवर्कची समस्या येते. चर्चेत सहभागी होता येत नाही. चुकीच्या निर्णयावर आक्षेप घेता येत नाही. कोविड संक्रमणाचा विस्फोट विचारात घेता सभा पुढे ढकलण्यात यावी. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर सभा घेण्यात यावी, अशी काही नगरसेवकांनी मागणी आहे.

....

काेविड नियंत्रणाऐवजी सभागृहात यंत्रणा व्यस्त

महापालिकेची प्रशासकीय यंत्रणा कोविड नियंत्रणात व्यस्त आहे. संक्रमणामुळे प्रशासनावरील ताण वाढला आहे. त्यात सभागृहामुळे यंत्रणा याकामात व्यस्त राहील. अशा परिस्थितीत बाधितांची संख्या आणखी वाढली तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.