शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

लॉकडाऊनमध्ये सभागृहाचा आग्रह कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:08 IST

मनपात संक्रमणाचा धोका : ऑनलाइन सभा असली तरी मुख्यालयात गर्दी होणारच लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहरात कोरोना ...

मनपात संक्रमणाचा धोका : ऑनलाइन सभा असली तरी मुख्यालयात गर्दी होणारच

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता वाढली आहे. शनिवारी तब्बल २२६१ पॉझिटिव्ह आलेत. संक्रमणाला आळा घालण्यासाठी १५ ते २१ मार्चदरम्यान लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. पुढील काही दिवस बाधितांचा आकडा कमी होण्याची शक्यता नाही. मनपाची यंत्रणा कोविड नियंत्रणाच्या कामात व्यस्त आहे. दुसरीकडे १९ मार्चला मनपाची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. सभा ऑनलाइन असली तरी मुख्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची गर्दी होणारच. यातून संक्रमणाचा धोका आहे. असे असतानाही लॉकडाऊन कालावधीत सभागृहाचा आग्रह कशासाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मागील वर्षी कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लॉकडाऊन कालावधीत तीन ते चार महिने सभेला परवानगी दिली नव्हती. सध्या अशीच गंभीर परिस्थिती आहे.

कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर महिना-दोन महिन्यांनी सभा घेतली तर विकासाला फार मोठा फटका बसेल अशी परिस्थिती नाही. सभा ऑनलाइन असली तरी नेटवर्कमुळे अनेक पदाधिकारी मनपा मुख्यालयात आपल्या कक्षात बसून सभेच्या कामकाजात सहभाग घेतात. तसेही ऑनलाइन सभेत नगरसेवकांना आपल्या प्रभागातील समस्या मांडता येत नाही. नगरसेवक बोलायला लागले की त्यांना म्युट केले जाते. अशा स्वरूपाच्या तक्रारी आहेत. ऑनलाइन सभेत समस्या मांडता येत नसल्याने ऑफलाइन सभागृह घेण्याला राज्य सरकारने अनुमती द्यावी, यासाठी पक्षनेते अविनाश ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे.

ऑनलाइन सभेमुळे मागील काही महिन्यांत सभागृहात नगरसेवकांच्या प्रश्नावर चर्चा झालेली नाही. अनेकदा नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केला की नेटवर्कची समस्या येते. चर्चेत सहभागी होता येत नाही. चुकीच्या निर्णयावर आक्षेप घेता येत नाही. कोविड संक्रमणाचा विस्फोट विचारात घेता सभा पुढे ढकलण्यात यावी. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर सभा घेण्यात यावी, अशी काही नगरसेवकांनी मागणी आहे.

....

काेविड नियंत्रणाऐवजी सभागृहात यंत्रणा व्यस्त

महापालिकेची प्रशासकीय यंत्रणा कोविड नियंत्रणात व्यस्त आहे. संक्रमणामुळे प्रशासनावरील ताण वाढला आहे. त्यात सभागृहामुळे यंत्रणा याकामात व्यस्त राहील. अशा परिस्थितीत बाधितांची संख्या आणखी वाढली तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.