शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांच्या जीवाला मोल नाय का ... ? वेलट्रिट हॉस्पिटल अग्निकांड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 10:34 IST

Nagpur News नागपूर वाडी येथील वेलट्रिट हॉस्पिटलमधील भीषण अग्निकांडाला आता पावणेदोन महिने होऊनही होरपळलेल्या कुटुंबीयांना कसलीही आर्थिक मदत मिळाली नाही.

ठळक मुद्दे सरकारी यंत्रणेची अनास्था मृतांचे परिवार वाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखलचाैकशीत गुरफटली कारवाई

 

 नरेश डोंगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - वाडी येथील वेलट्रिट हॉस्पिटलमधील भीषण अग्निकांडाला आता पावणेदोन महिने झाले. या अग्निकांडात चाैघांचे बळी गेल्यानंतर त्यावेळी दु:खाने होरपळलेल्या कुटुंबीयांच्या भावनांवर नेते आणि सरकारी अधिकाऱ्यांनी आश्वासनांची कोरडी फुंकर घातली. मात्र, आता पावणेदोन महिने होऊनही त्यांना कसलीही आर्थिक मदत मिळाली नाही. पोलिसांनी हॉस्पिटल प्रशासनाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. मात्र, अटकेसारखी ठोस कारवाईही झाली नाही. त्यामुळे मृतांच्या कुटुंबीयांच्या भावना चिघळल्या आहेत. आम्हा गरिबाचा कुणी वाली नाही का, आमच्या जीवाला मोल नाही का, असे प्रश्न मृतांचे शोकसंतप्त नातेवाईक उपस्थित करीत आहेत.

वाडीतील वेलट्रिट हॉस्पिटलला ९ एप्रिलला रात्री हॉस्पिटलला भीषण आग लागली. आगीत तुळशीराम सापकन पारधी, शिवशक्ती भगवान सोनबरसे, प्रकाश बापूरावजी बोळे आणि रंजना मधुकर कडू या चाैघांचा होरपळून मृत्यू झाला. काहीजण श्वास गुदमरून, तर काही भाजून जखमी झाले. उपचारादरम्यान ते बचावले. मात्र, त्यांच्याही मनावरही या घटनेच्या खोल जखमा झाल्या आहेत. या अग्निकांडानंतर त्यावेळी अनेक नेत्यांनी मृतांच्या नातेवाइकांबाबत कोरडी सहानुभूती व्यक्त केली. त्यांना शासकीय नियमानुसार योग्य ती आर्थिक मदत दिली जाईल, असेही नेते मंडळींनी तसेच अधिकाऱ्यांनी खासगीत पत्रकारांना सांगितले. त्यासाठी तातडीचे प्रयत्न केले जात असल्याचेही त्यावेळी सुतोवाच केले. मात्र, आता पावणेदोन महिने झाले. मृतांच्या नातेवाइकांना सरकारकडून साधी दमडीही सानुग्रह मदत म्हणून मिळाली नाही. भंडारा येथील रुग्णालयात झालेल्या मृत्यू प्रकरणात पहिल्याच दिवशी सरकारकडून आर्थिक मदतीची घोषणा झाली अन् वाटपही झाले. वेलट्रिटच्या अग्निकांडातील मृतांचे नातेवाईक वाऱ्यावर सोडले गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या भावना तीव्र आहेत. या संबंधाने एका मृताचे नातेवाईक प्रवीण महंत आणि पारधी यांचा मुलगा शुभम यांनी आमच्या नातेवाइकांच्या जीवाला काहीच मोल नाही का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

दरम्यान, अग्निकांडाची चाैकशी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा आणि पोलीस त्यावेळी आपापल्या पातळीवर स्वतंत्रपणे सक्रिय झाले होते. वीज विभाग आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनीही आगीचे कारण जाणून घेत तसा अहवाल सरकारी यंत्रणेला दिला. त्यानंतर पोलिसांनी वेलट्रिट हॉस्पिटलचे डॉ. राहुल ठवरे आणि हॉस्पिटल प्रशासनाला जबाबदार धरून डॉ. ठवरे तसेच प्रशासनातील मंडळींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचे कलम ३०४ भा.दं.वि. ३४ नुसार गुन्हा दाखल केला. मात्र, अद्याप कसलीही ठोस कारवाई संबंधित आरोपींवर झालेली नाही. त्यामुळे मृतांच्या भावना जास्तच तीव्र झाल्या आहेत.

जिल्हा प्रशासनाकडून नो रिस्पॉन्स

वारंवार चकरा मारूनही जिल्हा प्रशासनाकडून आम्हाला कवडीची मदत मिळाली नाही, असे प्रवीण महंत म्हणतात. या संबंधाने माहिती घेण्यासाठी

लोकमतने जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याकडे वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा मोबाइल ‘नो रिस्पॉन्स’ होता.

चाैकशी सुरू, दोषींवर कारवाई होणारच - अमितेशकुमार

सदोष मणुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊन ४५ दिवस झाले तरी अटकेची कारवाई का झाली नाही, अशी विचारणा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे केली असता काही तांत्रिक मुद्द्यांची चाैकशी सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर दोषींवर नक्की कारवाई होईल, असे ते म्हणाले.

---

टॅग्स :fireआग