शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

नागझिऱ्यात का थांबत नाही वाघ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:07 IST

नागपूर : महाराष्ट्रात वाघांची संख्या ३१२ आहे; पण त्यातले जवळपास ३०० वाघ एकट्या विदर्भात आहेत. त्यामुळे विदर्भाचे क्षेत्र वाघांसाठी ...

नागपूर : महाराष्ट्रात वाघांची संख्या ३१२ आहे; पण त्यातले जवळपास ३०० वाघ एकट्या विदर्भात आहेत. त्यामुळे विदर्भाचे क्षेत्र वाघांसाठी नंदनवनच ठरले आहे. मात्र विदर्भातील एक अभयारण्य वाघाला फारसे भावले नाही. ताडाेबा, पेंच वनक्षेत्रात क्षमतेपेक्षा अधिक वाघ असताना नवेगाव-नागझिरा अभयारण्यात वाघ थांबायला तयार नाहीत. घनदाट जंगल असूनही केवळ ८ वाघांचा अधिवास येथे आहे. त्यामुळे वाघ का थांबत नाहीत, हा अभ्यासाचा विषय झाला आहे.

वन्यजीव अभ्यासकांच्या मते ताडोबा अभयारण्य हे एकत्रित (कॉम्पॅक्ट) आहे आणि बफर झोनमध्ये मानवी वस्त्या तुटक असल्याने वाघांना अधिवासाचा मोठा एरिया मिळतो. याउलट नवेगाव-नागझिरा एकत्रित व समुचित नाही. २५० चौ. किमीचा नवेगाव ब्लॉक वेगळा तर ४०० चौ.किमी.चा नागझिरा ब्लॉक वेगळा पडतो. या दोन्ही ब्लॉकच्या मध्ये असलेल्या बफर झाेनमध्ये तब्बल १८५ गावे आहे. मोठ्या प्रमाणात असलेली मानवी वस्त्या हा वाघांच्या अधिवासाचा मोठा अडथळा आहे. याशिवाय अधिवासात विविध विकासकामे तसेच रेल्वे व रस्त्यांचे जाळे मोठे असल्यानेही वाघांसाठी अडचणीचे हात असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. हे अभयारण्य लहान-मोठ्या टेकड्यांनी व्यापले आहे. जंगलात तृणभक्षी प्राण्यांची संख्या चांगली आहे पण कदाचित अधिवास कमी पडत असल्यानेच वाघांची संख्या कमी असल्याची शक्यता आहे. मात्र नेमके कोणते कारण कमतरतेसाठी कारणीभूत आहे, याबाबत अभ्यास सुरू आहे. इतर भागातील वाघ या अभयारण्यात स्थानांतरित करण्याचा प्रस्ताव आला होता; पण पुढे ताे रखडला.

काेराेनामुळे रखडला अभ्यास

नवेगाव-नागझिरा अभयारण्यात रानकुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या रानकुत्र्यांच्या हल्ल्यामुळे वाघ येथे थांबत नसल्याचे बोलले जाते. याबाबत वन्यजीव वैज्ञानिक डाॅ. बिलाल हबीब यांच्या मार्गदर्शनात अभ्यास सुरू आहे. मात्र काेराेना महामारीमुळे मागील दीड वर्षापासून हे अभ्यासकार्य रखडले असल्याची माहिती त्यांनी दिली. आता पुन्हा ताे सुरू हाेणार असल्याचे त्यांनी सांगितले.