शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
4
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
5
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
6
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
7
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
8
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
9
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
10
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
11
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
12
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
13
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
14
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
15
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
16
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
17
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
18
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
19
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
20
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?

नागझिऱ्यात का थांबत नाही वाघ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:07 IST

नागपूर : महाराष्ट्रात वाघांची संख्या ३१२ आहे; पण त्यातले जवळपास ३०० वाघ एकट्या विदर्भात आहेत. त्यामुळे विदर्भाचे क्षेत्र वाघांसाठी ...

नागपूर : महाराष्ट्रात वाघांची संख्या ३१२ आहे; पण त्यातले जवळपास ३०० वाघ एकट्या विदर्भात आहेत. त्यामुळे विदर्भाचे क्षेत्र वाघांसाठी नंदनवनच ठरले आहे. मात्र विदर्भातील एक अभयारण्य वाघाला फारसे भावले नाही. ताडाेबा, पेंच वनक्षेत्रात क्षमतेपेक्षा अधिक वाघ असताना नवेगाव-नागझिरा अभयारण्यात वाघ थांबायला तयार नाहीत. घनदाट जंगल असूनही केवळ ८ वाघांचा अधिवास येथे आहे. त्यामुळे वाघ का थांबत नाहीत, हा अभ्यासाचा विषय झाला आहे.

वन्यजीव अभ्यासकांच्या मते ताडोबा अभयारण्य हे एकत्रित (कॉम्पॅक्ट) आहे आणि बफर झोनमध्ये मानवी वस्त्या तुटक असल्याने वाघांना अधिवासाचा मोठा एरिया मिळतो. याउलट नवेगाव-नागझिरा एकत्रित व समुचित नाही. २५० चौ. किमीचा नवेगाव ब्लॉक वेगळा तर ४०० चौ.किमी.चा नागझिरा ब्लॉक वेगळा पडतो. या दोन्ही ब्लॉकच्या मध्ये असलेल्या बफर झाेनमध्ये तब्बल १८५ गावे आहे. मोठ्या प्रमाणात असलेली मानवी वस्त्या हा वाघांच्या अधिवासाचा मोठा अडथळा आहे. याशिवाय अधिवासात विविध विकासकामे तसेच रेल्वे व रस्त्यांचे जाळे मोठे असल्यानेही वाघांसाठी अडचणीचे हात असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. हे अभयारण्य लहान-मोठ्या टेकड्यांनी व्यापले आहे. जंगलात तृणभक्षी प्राण्यांची संख्या चांगली आहे पण कदाचित अधिवास कमी पडत असल्यानेच वाघांची संख्या कमी असल्याची शक्यता आहे. मात्र नेमके कोणते कारण कमतरतेसाठी कारणीभूत आहे, याबाबत अभ्यास सुरू आहे. इतर भागातील वाघ या अभयारण्यात स्थानांतरित करण्याचा प्रस्ताव आला होता; पण पुढे ताे रखडला.

काेराेनामुळे रखडला अभ्यास

नवेगाव-नागझिरा अभयारण्यात रानकुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या रानकुत्र्यांच्या हल्ल्यामुळे वाघ येथे थांबत नसल्याचे बोलले जाते. याबाबत वन्यजीव वैज्ञानिक डाॅ. बिलाल हबीब यांच्या मार्गदर्शनात अभ्यास सुरू आहे. मात्र काेराेना महामारीमुळे मागील दीड वर्षापासून हे अभ्यासकार्य रखडले असल्याची माहिती त्यांनी दिली. आता पुन्हा ताे सुरू हाेणार असल्याचे त्यांनी सांगितले.