शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

नागझिऱ्यात का थांबत नाही वाघ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:07 IST

नागपूर : महाराष्ट्रात वाघांची संख्या ३१२ आहे; पण त्यातले जवळपास ३०० वाघ एकट्या विदर्भात आहेत. त्यामुळे विदर्भाचे क्षेत्र वाघांसाठी ...

नागपूर : महाराष्ट्रात वाघांची संख्या ३१२ आहे; पण त्यातले जवळपास ३०० वाघ एकट्या विदर्भात आहेत. त्यामुळे विदर्भाचे क्षेत्र वाघांसाठी नंदनवनच ठरले आहे. मात्र विदर्भातील एक अभयारण्य वाघाला फारसे भावले नाही. ताडाेबा, पेंच वनक्षेत्रात क्षमतेपेक्षा अधिक वाघ असताना नवेगाव-नागझिरा अभयारण्यात वाघ थांबायला तयार नाहीत. घनदाट जंगल असूनही केवळ ८ वाघांचा अधिवास येथे आहे. त्यामुळे वाघ का थांबत नाहीत, हा अभ्यासाचा विषय झाला आहे.

वन्यजीव अभ्यासकांच्या मते ताडोबा अभयारण्य हे एकत्रित (कॉम्पॅक्ट) आहे आणि बफर झोनमध्ये मानवी वस्त्या तुटक असल्याने वाघांना अधिवासाचा मोठा एरिया मिळतो. याउलट नवेगाव-नागझिरा एकत्रित व समुचित नाही. २५० चौ. किमीचा नवेगाव ब्लॉक वेगळा तर ४०० चौ.किमी.चा नागझिरा ब्लॉक वेगळा पडतो. या दोन्ही ब्लॉकच्या मध्ये असलेल्या बफर झाेनमध्ये तब्बल १८५ गावे आहे. मोठ्या प्रमाणात असलेली मानवी वस्त्या हा वाघांच्या अधिवासाचा मोठा अडथळा आहे. याशिवाय अधिवासात विविध विकासकामे तसेच रेल्वे व रस्त्यांचे जाळे मोठे असल्यानेही वाघांसाठी अडचणीचे हात असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. हे अभयारण्य लहान-मोठ्या टेकड्यांनी व्यापले आहे. जंगलात तृणभक्षी प्राण्यांची संख्या चांगली आहे पण कदाचित अधिवास कमी पडत असल्यानेच वाघांची संख्या कमी असल्याची शक्यता आहे. मात्र नेमके कोणते कारण कमतरतेसाठी कारणीभूत आहे, याबाबत अभ्यास सुरू आहे. इतर भागातील वाघ या अभयारण्यात स्थानांतरित करण्याचा प्रस्ताव आला होता; पण पुढे ताे रखडला.

काेराेनामुळे रखडला अभ्यास

नवेगाव-नागझिरा अभयारण्यात रानकुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या रानकुत्र्यांच्या हल्ल्यामुळे वाघ येथे थांबत नसल्याचे बोलले जाते. याबाबत वन्यजीव वैज्ञानिक डाॅ. बिलाल हबीब यांच्या मार्गदर्शनात अभ्यास सुरू आहे. मात्र काेराेना महामारीमुळे मागील दीड वर्षापासून हे अभ्यासकार्य रखडले असल्याची माहिती त्यांनी दिली. आता पुन्हा ताे सुरू हाेणार असल्याचे त्यांनी सांगितले.