शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

हेरिटेज कस्तुरचंद पार्कची दुरवस्था का होऊ दिली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 23:28 IST

शहराच्या हृदयस्थळी असलेल्या हेरिटेज कस्तुरचंद पार्कचे अतिक्रमण व अनधिकृत वापरापासून संरक्षण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. असे असताना कस्तुरचंद पार्कची दुरवस्था का झाली, या ठिकाणी अतिक्रमण कसे करण्यात आले, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी महानगरपालिका व पोलीस प्रशासनाला फटकारले.

ठळक मुद्देहायकोर्टाने मनपाला फटकारले : २३ जूनपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहराच्या हृदयस्थळी असलेल्या हेरिटेज कस्तुरचंद पार्कचे अतिक्रमण व अनधिकृत वापरापासून संरक्षण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. असे असताना कस्तुरचंद पार्कची दुरवस्था का झाली, या ठिकाणी अतिक्रमण कसे करण्यात आले, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी महानगरपालिका व पोलीस प्रशासनाला फटकारले. तसेच, संबंधित निर्देशांची अवमानना व कस्तुरचंद पार्कच्या दुरवस्थेवर २३ जूनपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्यास सांगितले.प्रकरणावर न्यायमूर्तिद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. २७ एप्रिल २०१७ रोजी उच्च न्यायालयाने कस्तुरचंद पार्कवरील व आजूबाजूचे अतिक्रमण तात्काळ हटविण्याचा आदेश महानगरपालिकेला दिला होता. या कारवाईसाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था पुरविण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांना देण्यात आले होते. तसेच, कस्तुरचंद पार्कवर परत अतिक्रमण होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले होते. असे असताना महानगरपालिका व पोलीस प्रशासनाने जबाबदारीला न्याय दिला नाही. त्यांच्या दुर्लक्षामुळे कस्तुरचंद पार्कची दुरवस्था झाली. मैदान ठिकठिकाणी खोदून ठेवण्यात आले आहे. मैदानावर झाडेझुडपे वाढली आहेत. मैदानावरील स्मारकामध्ये अतिक्रमण करण्यात आले आहे. काही व्यक्ती या स्मारकाचा रहिवासी उपयोग करीत आहेत. न्यायालयाने या परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली. न्यायालय हे कायदे व जनहिताचे संरक्षक असते. ते अशा परिस्थितीकडे मूकदर्शक होऊन बघत राहू शकत नाही. या परिस्थितीवरून स्थानिक प्रशासनाने न्यायालयाच्या निर्देशांचे गंभीरतेने पालन केले नसल्याचे स्पष्ट होते. त्यावर स्थानिक प्रशासनाने उत्तर देणे आवश्यक आहे, असे परखड निरीक्षण न्यायालयाने आदेशात नोंदवले. तसेच, पुढील तारखेपर्यंत कस्तुरचंद पार्कवरील अतिक्रमण हटविण्याची प्रशासनाला मुभा दिली. न्यायालय मित्र अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी याचिकेचे, अ‍ॅड. जेमिनी कासट यांनी महापालिकेतर्फे तर, अ‍ॅड. दीपक ठाकरे यांनी सरकारतर्फे कामकाज पाहिले.प्रकरणावर अकस्मात सुनावणी केलीयासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. कस्तुरचंद पार्कचा अनधिकृत उपयोग होत असल्याची बाब लक्षात घेता २०१७ मध्ये न्यायालयाने स्वत:च ही याचिका दाखल करून घेतली. न्यायालयाच्या शुक्रवारच्या निर्धारित कामकाजात या प्रकरणाचा समावेश नव्हता. वर्तमानपत्रांमध्ये कस्तुरचंद पार्कच्या सध्याच्या दुरवस्थेची बातमी वाचल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणावर अकस्मात सुनावणी केली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयKasturchand Parkकस्तूरचंद पार्क