शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

हेरिटेज कस्तुरचंद पार्कची दुरवस्था का होऊ दिली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 23:28 IST

शहराच्या हृदयस्थळी असलेल्या हेरिटेज कस्तुरचंद पार्कचे अतिक्रमण व अनधिकृत वापरापासून संरक्षण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. असे असताना कस्तुरचंद पार्कची दुरवस्था का झाली, या ठिकाणी अतिक्रमण कसे करण्यात आले, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी महानगरपालिका व पोलीस प्रशासनाला फटकारले.

ठळक मुद्देहायकोर्टाने मनपाला फटकारले : २३ जूनपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहराच्या हृदयस्थळी असलेल्या हेरिटेज कस्तुरचंद पार्कचे अतिक्रमण व अनधिकृत वापरापासून संरक्षण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. असे असताना कस्तुरचंद पार्कची दुरवस्था का झाली, या ठिकाणी अतिक्रमण कसे करण्यात आले, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी महानगरपालिका व पोलीस प्रशासनाला फटकारले. तसेच, संबंधित निर्देशांची अवमानना व कस्तुरचंद पार्कच्या दुरवस्थेवर २३ जूनपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्यास सांगितले.प्रकरणावर न्यायमूर्तिद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. २७ एप्रिल २०१७ रोजी उच्च न्यायालयाने कस्तुरचंद पार्कवरील व आजूबाजूचे अतिक्रमण तात्काळ हटविण्याचा आदेश महानगरपालिकेला दिला होता. या कारवाईसाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था पुरविण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांना देण्यात आले होते. तसेच, कस्तुरचंद पार्कवर परत अतिक्रमण होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले होते. असे असताना महानगरपालिका व पोलीस प्रशासनाने जबाबदारीला न्याय दिला नाही. त्यांच्या दुर्लक्षामुळे कस्तुरचंद पार्कची दुरवस्था झाली. मैदान ठिकठिकाणी खोदून ठेवण्यात आले आहे. मैदानावर झाडेझुडपे वाढली आहेत. मैदानावरील स्मारकामध्ये अतिक्रमण करण्यात आले आहे. काही व्यक्ती या स्मारकाचा रहिवासी उपयोग करीत आहेत. न्यायालयाने या परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली. न्यायालय हे कायदे व जनहिताचे संरक्षक असते. ते अशा परिस्थितीकडे मूकदर्शक होऊन बघत राहू शकत नाही. या परिस्थितीवरून स्थानिक प्रशासनाने न्यायालयाच्या निर्देशांचे गंभीरतेने पालन केले नसल्याचे स्पष्ट होते. त्यावर स्थानिक प्रशासनाने उत्तर देणे आवश्यक आहे, असे परखड निरीक्षण न्यायालयाने आदेशात नोंदवले. तसेच, पुढील तारखेपर्यंत कस्तुरचंद पार्कवरील अतिक्रमण हटविण्याची प्रशासनाला मुभा दिली. न्यायालय मित्र अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी याचिकेचे, अ‍ॅड. जेमिनी कासट यांनी महापालिकेतर्फे तर, अ‍ॅड. दीपक ठाकरे यांनी सरकारतर्फे कामकाज पाहिले.प्रकरणावर अकस्मात सुनावणी केलीयासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. कस्तुरचंद पार्कचा अनधिकृत उपयोग होत असल्याची बाब लक्षात घेता २०१७ मध्ये न्यायालयाने स्वत:च ही याचिका दाखल करून घेतली. न्यायालयाच्या शुक्रवारच्या निर्धारित कामकाजात या प्रकरणाचा समावेश नव्हता. वर्तमानपत्रांमध्ये कस्तुरचंद पार्कच्या सध्याच्या दुरवस्थेची बातमी वाचल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणावर अकस्मात सुनावणी केली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयKasturchand Parkकस्तूरचंद पार्क