शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
2
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
3
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
4
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
6
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
7
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
8
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
9
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
10
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
11
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
13
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
14
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
15
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
16
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
17
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
18
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
19
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
20
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार

डस्टबिनचा आग्रह कशासाठी?

By admin | Updated: May 12, 2017 02:52 IST

नागपूर शहराची लोकसंख्या ३० लाखांवर गेली आहे. लोकसंख्येचा विचार करता सहा ते सात हजार सफाई कर्मचाऱ्यांची गरज आहे.

कचराच तर उचलला जात नाही : सफाई कर्मचाऱ्यांचाही तुटवडा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहराची लोकसंख्या ३० लाखांवर गेली आहे. लोकसंख्येचा विचार करता सहा ते सात हजार सफाई कर्मचाऱ्यांची गरज आहे. परंतु प्रत्यक्षात चार हजार कर्मचारी कार्यरत आहेत. सफाई कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने शहरातील सर्व भागातील कचरा दररोज उचलला जात नाही. काही भागात दिवसाआड घंटागाडी येते. त्यामुळे कचरा पडून असतो. यावर प्रभावी उपाययोजना करण्याचे सोडून १४ कोटींच्या डस्टबिन मोफत वाटपाचा निर्णय घेण्यात आला आहे. मोफत डस्टबिनचा आग्रह कशासाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागात जवळपास चार हजार सफाई कर्मचारी आहेत. परंतु यातील हजाराहून अधिक कर्मचारी महापालिका मुख्यालय वा झोन कार्यालयात कामकाज करतात. म्हणजेच रेकॉर्डला चार हजार सफाई कर्मचारी कार्यरत असले तरी प्रत्यक्षात तीन हजार कर्मचारी स्वच्छतेच्या कामात आहेत. अशीच परिस्थिती कनक रिसोर्सेस कंपनीकडे काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची आहे. कंपनीकडे १५०० कर्मचारी कार्यरत आहे. परंतु प्रत्यक्षात याहून अधिक कर्मचारी कार्यरत असल्याचे दर्शविण्यात येते. कर्मचाऱ्यांना ५.५० कोटी कधी मिळणार शहरातील कचरा उचलण्याची जबाबदारी असलेल्या कनक रिसोर्सेस यांच्याकडे दीड हजार सफाई कर्मचारी आहे. परंतु या कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन मिळत नव्हते. कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली. कामगार आयुक्तांनी निर्देश दिल्यानंतर शासन निर्णयानुसार वेतन देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाला घ्यावा लागला. परंतु गेल्या ९ महिन्यातील वाढीव भत्ता व वेतनातील फरक अशी ५ कोटी ५० लाखांची रक्कम सफाई कर्मचाऱ्यांना अद्याप मिळालेली नाही. आयुक्तांनी वेळोवेळी आश्वासने व तारखा दिल्या. मात्र अजूनही हा प्रश्न प्रलंबित आहे. डस्टबिनचा निर्णय रद्द करण्याची मागणी ओला व कोरडा कचरा वेगवेगळा ठेवण्यात यावा, यासाठी शहरातील ५ लाख ५० हजार घरमालक व दुकानदारांना ११ लाख डस्टबिन मोफत वाटप करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यावर तब्बल १३.६४ कोटींचा खर्च केला जाणार आहे. हा जनतेच्या पैशाचा दुरुपयोग आहे. हा चुकीचा निर्णय रद्द करण्यात यावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दुनेश्वर पेठे शुक्रवारी आयुक्तांना निवेदन देणार आहेत. काँग्रेस पक्षानेही डस्टबिनचा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी भूमिका घेतली आहे.