शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

स्तन कर्करोगाची भीती बाळगता कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 01:36 IST

भारतात स्तन कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे आणि नागपूरही याला अपवाद नाही. स्तन कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) म्हटले की कुणाच्याही पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहात नाही.

ठळक मुद्देपाच मिनिटाच्या बीएसई, मेमोग्राफी टेस्टने व्हा भीतीमुक्त : रोहिणी पाटील यांचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतात स्तन कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे आणि नागपूरही याला अपवाद नाही. स्तन कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) म्हटले की कुणाच्याही पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहात नाही. जनजागृतीचा अभाव असल्याने ही भीती निर्माण होते. या भीतीमुळे आवश्यक असलेल्या तपासण्या करण्यास कुणी तयार होत नाही आणि ही भीतीच तुमच्या विनाशाचे कारण ठरू शकते. या आजाराने मृत्यूचे प्रमाण वाढले हे खरे आहे, मात्र याचे कारण आजारामुळे नाही तर आजाराचे उशिरा निदान होत असल्याने मृत्यूची शक्यता वाढत असल्याची माहिती प्रसिद्ध स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञ डॉ. रोहिणी पाटील यांनी दिली.जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनेवरून संपूर्ण आॅक्टोबर महिना स्तन कर्करोगाबाबत जनजागृती म्हणून पाळला जात आहे. या आजाराशी झुंजणाºया महिलांसाठी गुलाबी रंग प्रतीक म्हणून संबोधला जात असून या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. डॉ. रोहिणी पाटील यांनीही स्तन कर्करोगाबाबत जनजागृतीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी स्वत: या आजाराचा विळखा सहन केला आहे. त्या सांगतात की डॉक्टर असूनही त्यावेळी भीती वाटली होती. मात्र जागृतीमुळे व लवकर निदान झाल्याने यातून सहज बाहेर पडणे शक्य आहे, ही जाणीव मला होती. लवकर निदान आणि योग्य उपचाराने त्यांनी आजारावर मात केली. बदलत्या जीवनशैलीमुळे भारतातही स्तन कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. दर आठमधून एका महिलेला स्तन कॅन्सर असतो. २०१६ च्या आकडेवारीनुसार भारतात यावर्षी स्तन कर्करोगाने ७६००० महिला रुग्णांचा मृत्यू झाला असून दीड लाख नवीन रुग्णांची नोंदही करण्यात आली आहे.बदलत्या जीवनशैलीमुळे ग्रामीण भागापेक्षा शहरांमध्ये स्तन कर्करोगाचे प्रमाण अधिक असल्याचे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले. नागपूर शहराचा विचार केल्यास सर्व प्रकारच्या कॅन्सरमध्ये स्तन कर्करोगाचे प्रमाण हे ४० टक्के आहे. ही परिस्थिती भयावह आहे, मात्र त्याहीपेक्षा जनजागृतीचा अभाव हे अधिक चिंतेचं कारण आहे. कारण मृत्यूच्या कारणाकडे लक्ष दिल्यास यापैकी ८० टक्के महिलांचे मृत्यू कर्करोगाचे निदान उशिरा लागल्याने झाले आहेत. निदान उशिरा लागल्यास उपचाराला प्रतिसाद मिळणे कमी होते. त्यामुळेच या आजाराला ‘किलर डिसीज’ म्हटले जाते.स्तन कर्करोगाचा धोका टाळणे शक्यआपल्याकडे भीतीपोटी आणि जागृतीच्या अभावामुळे आजाराक डे दुर्लक्ष करण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र भीती बाळगण्याचे कुठलेही कारण नाही. डॉ. पाटील यांनी सांगितले, आय ब्रेस्ट एक्झामिनेशन (आयबीई) ही पाच मिनिटात केली जाणारी तपासणी आहे. ही टेस्ट २० वर्षे वयोगटानंतरच्या प्रत्येक महिलेने करून घेणे अत्यावश्यक आहे. काही वर्षाअगोदर आजाराचा धोका ४० वर्षे वयोगटानंतर होता, मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे कमी वयातही धोका वाढल्याचे त्या म्हणाल्या. बीएसई टेस्टमध्ये आजाराची लक्षणे आढळल्यास मेमोग्रॉफी टेस्ट केली जात असून यानंतर औषधोपचार सुरू केला जाऊ शकतो. याशिवाय ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन (बीएसई) ही तपासणी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने प्रत्येक महिला स्वत:च करू शकत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या साध्या तपासण्या प्रत्येक वर्षी वेळ काढून केल्यास धोका सहज टाळता येऊ शकतो असा विश्वास डॉ. पाटील यांनी व्यक्त केला.शासनाने पुढाकार घेणे आवश्यकदेशात स्तन कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. ही स्थिती लक्षात घेता जनजागृती आणि उपाययोजनांबाबत शासनाने पुढाकार घेणे आवश्यक आहेत. अगदी ग्राम स्तरावर प्राथमिक आरोग्य केंद्रात मेमोग्रॉफी टेस्टची साधने उपलब्ध करून तज्ज्ञांमार्फत महिलांची तपासणी करणे आवश्यक आहे. यामुळे निदान लवकर लागून उपचार करणे सोपे होईल, असे मत डॉ. रोहिणी पाटील यांनी व्यक्त केले.