शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

स्तन कर्करोगाची भीती बाळगता कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 01:36 IST

भारतात स्तन कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे आणि नागपूरही याला अपवाद नाही. स्तन कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) म्हटले की कुणाच्याही पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहात नाही.

ठळक मुद्देपाच मिनिटाच्या बीएसई, मेमोग्राफी टेस्टने व्हा भीतीमुक्त : रोहिणी पाटील यांचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतात स्तन कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे आणि नागपूरही याला अपवाद नाही. स्तन कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) म्हटले की कुणाच्याही पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहात नाही. जनजागृतीचा अभाव असल्याने ही भीती निर्माण होते. या भीतीमुळे आवश्यक असलेल्या तपासण्या करण्यास कुणी तयार होत नाही आणि ही भीतीच तुमच्या विनाशाचे कारण ठरू शकते. या आजाराने मृत्यूचे प्रमाण वाढले हे खरे आहे, मात्र याचे कारण आजारामुळे नाही तर आजाराचे उशिरा निदान होत असल्याने मृत्यूची शक्यता वाढत असल्याची माहिती प्रसिद्ध स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञ डॉ. रोहिणी पाटील यांनी दिली.जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनेवरून संपूर्ण आॅक्टोबर महिना स्तन कर्करोगाबाबत जनजागृती म्हणून पाळला जात आहे. या आजाराशी झुंजणाºया महिलांसाठी गुलाबी रंग प्रतीक म्हणून संबोधला जात असून या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. डॉ. रोहिणी पाटील यांनीही स्तन कर्करोगाबाबत जनजागृतीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी स्वत: या आजाराचा विळखा सहन केला आहे. त्या सांगतात की डॉक्टर असूनही त्यावेळी भीती वाटली होती. मात्र जागृतीमुळे व लवकर निदान झाल्याने यातून सहज बाहेर पडणे शक्य आहे, ही जाणीव मला होती. लवकर निदान आणि योग्य उपचाराने त्यांनी आजारावर मात केली. बदलत्या जीवनशैलीमुळे भारतातही स्तन कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. दर आठमधून एका महिलेला स्तन कॅन्सर असतो. २०१६ च्या आकडेवारीनुसार भारतात यावर्षी स्तन कर्करोगाने ७६००० महिला रुग्णांचा मृत्यू झाला असून दीड लाख नवीन रुग्णांची नोंदही करण्यात आली आहे.बदलत्या जीवनशैलीमुळे ग्रामीण भागापेक्षा शहरांमध्ये स्तन कर्करोगाचे प्रमाण अधिक असल्याचे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले. नागपूर शहराचा विचार केल्यास सर्व प्रकारच्या कॅन्सरमध्ये स्तन कर्करोगाचे प्रमाण हे ४० टक्के आहे. ही परिस्थिती भयावह आहे, मात्र त्याहीपेक्षा जनजागृतीचा अभाव हे अधिक चिंतेचं कारण आहे. कारण मृत्यूच्या कारणाकडे लक्ष दिल्यास यापैकी ८० टक्के महिलांचे मृत्यू कर्करोगाचे निदान उशिरा लागल्याने झाले आहेत. निदान उशिरा लागल्यास उपचाराला प्रतिसाद मिळणे कमी होते. त्यामुळेच या आजाराला ‘किलर डिसीज’ म्हटले जाते.स्तन कर्करोगाचा धोका टाळणे शक्यआपल्याकडे भीतीपोटी आणि जागृतीच्या अभावामुळे आजाराक डे दुर्लक्ष करण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र भीती बाळगण्याचे कुठलेही कारण नाही. डॉ. पाटील यांनी सांगितले, आय ब्रेस्ट एक्झामिनेशन (आयबीई) ही पाच मिनिटात केली जाणारी तपासणी आहे. ही टेस्ट २० वर्षे वयोगटानंतरच्या प्रत्येक महिलेने करून घेणे अत्यावश्यक आहे. काही वर्षाअगोदर आजाराचा धोका ४० वर्षे वयोगटानंतर होता, मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे कमी वयातही धोका वाढल्याचे त्या म्हणाल्या. बीएसई टेस्टमध्ये आजाराची लक्षणे आढळल्यास मेमोग्रॉफी टेस्ट केली जात असून यानंतर औषधोपचार सुरू केला जाऊ शकतो. याशिवाय ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन (बीएसई) ही तपासणी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने प्रत्येक महिला स्वत:च करू शकत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या साध्या तपासण्या प्रत्येक वर्षी वेळ काढून केल्यास धोका सहज टाळता येऊ शकतो असा विश्वास डॉ. पाटील यांनी व्यक्त केला.शासनाने पुढाकार घेणे आवश्यकदेशात स्तन कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. ही स्थिती लक्षात घेता जनजागृती आणि उपाययोजनांबाबत शासनाने पुढाकार घेणे आवश्यक आहेत. अगदी ग्राम स्तरावर प्राथमिक आरोग्य केंद्रात मेमोग्रॉफी टेस्टची साधने उपलब्ध करून तज्ज्ञांमार्फत महिलांची तपासणी करणे आवश्यक आहे. यामुळे निदान लवकर लागून उपचार करणे सोपे होईल, असे मत डॉ. रोहिणी पाटील यांनी व्यक्त केले.