शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
3
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
4
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
5
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
6
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
7
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
8
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
9
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
10
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
11
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
12
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
13
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
14
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
15
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
16
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
17
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
18
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
19
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
20
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे

अवनीला ठार केल्याचा एवढा बाऊ कशाला; विजय वडेट्टीवार यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 3:39 PM

एखादा वाघ १३ लोकांचे बळी घेत असेल, अशा परिस्थितीत त्याला गोळी झाडून ठार के ले असेल तर या गोष्टीचा एवढा बाऊ कशाला असा सवाल काँगे्रसचे विधीमंडळ उपनेते आमदार विजय वडेट्टेवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देमारण्याची पद्धत चुकीचीपण त्यापेक्षा शेतकऱ्यांचे बळी महत्वाचे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :अवनी किंवा टी-१ नावाच्या वाघिणीच्या मृत्यूवरून देशभरात वादंग सुरू आहे. आठवडभरापासून या वाघिणीला मारताना नियमांचा अवलंब योग्य प्रकारे केला गेला नसल्याचे आरोप होत आहेत. मारण्याची पद्धत चुकीचीच होती. परंतु मागील तीन वर्षात वाघांच्या हल्ल्यात २३ लोकांचे बळी गेलेत. एखादा वाघ १३ लोकांचे बळी घेत असेल, त्याला पकडण्यात यश येत नसेल अशा परिस्थितीत त्याला गोळी झाडून ठार के ले असेल तर या गोष्टीचा एवढा बाऊ कशाला असा सवाल काँगे्रसचे विधीमंडळ उपनेते आमदार विजय वडेट्टेवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. यावेळी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, किशोर गजभिये आदी उपस्थित होते.गेल्या काही वर्षात २६ वाघांचे बळी गेले आहेत. कधी आपसातील झुंज, विजेचा धक्का लागून तर कधी कालव्यात पडल्याने ते मरण पावले. पर्यावरण संतुलनासाठी वाघ वाचला पाहिजे. परंतु शेतकऱ्यांचे बळी त्याहून महत्वाचे आहेत. वाघाला ठार केले म्हणून ह्ळहळ व्यक्त करण्याची गरज नाही. जंगललगतच्या ४२ गावातील नागरिक दहशतीत जीवन जगतात. जंगल परिसरातील शेतीचे संरक्षण वन विभागाने केले पाहिजे. वन्य प्रान्यांनी गावाकडे येवू नये यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. यासाठी १०० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना सोलर कुंपण उपलब्ध केले पाहिजे. वन्य प्राण्यापासून शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. वाघांना विदर्भातील लोकांनीच पोसायचे का? सिमेंटच्या जंगलातील लोकांना जंगलालगत राहणाऱ्या लोकांच्या समस्या कशा कळतील. एनजीओंना वस्तुस्थिती माहित नाही. आरएसएस आदीवासींना वनवासी म्हणतात. तशातलाच हा प्रकार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.पांढरकवडा भागात दहशत निर्माण करणाऱ्या वाघिणीला काही दिवसापूर्वी वन विभागाच्या पथकाने ठार मारले. या वाघिणीला आधी बेशुद्ध न करता तिला गोळी घालण्यात आली असल्याचा आरोप होत आहे. यावरून राजकीय वातावण तापलेले असतानाच विजय वडेट्टीवार यांनी, आता ही चर्चा खूप झाली, ठार मारण्याचा बाऊ करण्याची गरज नाही अशी भूमिका मांडली.

तुकाराम मुंडे यांना नागपूरला आणाभाजपाचे नेते स्वच्छ कारभाराचा दावा करतात. परंतु नागपूर महापालिकेतील भ्रष्टाचार सर्वश्रृत आहे. कराचा बोजा जनतेवर लादला जात आहे. महापालिकेतील भाजपा नेत्यांत अंतर्गत वाद आहेत. शासन निधी वेतनावर खर्च करावा लागत आहे. महापालिकेचा कारभार खरोखरच पारदर्शी व स्वच्छ करायचा असेल तर आयुक्त म्हणून तुकाराम मुुंडे यांना नागपुरात आणा अशी मागणी विजय वडेट्टीवार व अतुल लोंढे यांनी केली.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारTigerवाघ