शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

उपराजधानीत लोकसंख्येनुसार १७० वॉर्ड का नाहीत? निवडणुकीसाठी इच्छुकांना पडला प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 08:30 IST

Nagpur News वर्ष २०१७ ची निवडणूकही २०११ च्या जनगणनेनुसार झाली होती. वास्तविक मागील दहा वर्षांत नागपूर शहरातील लोकसंख्या ५ लाखांनी वाढली आहे. याचा विचार करता २०२२ मध्ये १७० वॉर्ड असायला हवेत.

ठळक मुद्दे दहा वर्षांत ५ लाख लोकसंख्या वाढली

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : २०२२ मध्ये होणारी महापालिका निवडणूक वॉर्ड पद्धतीने होणार आहे. २०११ च्या जनगणनेनुसार प्रारूप वॉर्डरचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यास सांगण्यात आले आहे. वर्ष २०१७ ची निवडणूकही २०११ च्या जनगणनेनुसार झाली होती. वास्तविक मागील दहा वर्षांत नागपूर शहरातील लोकसंख्या ५ लाखांनी वाढली आहे. याचा विचार करता २०२२ मध्ये १७० वॉर्ड असायला हवेत. (Why aren't there 170 wards in the capital according to the population?)

२०११ च्या जनगणनेनुसार नागपूर शहराची लोकसंख्या २२ लाख आहे, तर २०१७ च्या निवडणुकीत शहराची लोकसंख्या २४ लाख, ४७ हजार, ४९४ गृहीत धरून ६५ ते ७० हजार लोकसंख्येचा चार सदस्यीय प्रभागात निर्माण करण्यात आला होता. त्यावेळी प्रथमच हुडकेश्वर, नरसाळा भागाचा समावेश महापालिकेत करण्यात आला.

चारसदस्यीय प्रभागातील लोकसंख्या गृहीत धरता एका वॉर्डाची लोकसंख्या १६ ते १८ होते; परंतु गेल्या पाच वर्षांत लोकसंख्या पुन्हा वाढली. ती आता २७ लाखांवर गेली आहे. त्यानुसार २० वॉर्ड वाढावयास पाहिजेत; अन्यथा वॉर्डाची संख्या १५१ कायम ठेवल्यास प्रत्येक वॉर्ड हा २० ते २२ हजार लोकसंख्येचा राहण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाने एकसदस्यीय वॉर्डरचनेनुसार प्रारूप वॉर्डरचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. सर्वेक्षणानंतर समिती वॉर्डरचनेचा आराखडा तयार करणार आहे. मात्र, महापालिकेतील नगरसेवकांच्या संख्येनुसार १५१ वॉर्डांतील लोकसंख्या निश्चित करणार की, लोकसंख्या वाढल्याने वॉर्डांची संख्या वाढणार याबाबत बोलण्यात मनपातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नकार दिला. नवीन वॉर्ड रचनेसोबतच आरक्षण सोडत काढली जाईल. मनपात १५१ सदस्य कायम राहिल्यास महिलांसाठी ७६ जागा राखीव राहतील.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका