शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

कुणाची पाठ कुणाकडे ?

By admin | Updated: August 23, 2014 03:13 IST

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार झंझावातात संघभूमी नागपूरला टाळून इतरत्र सभा घेणाऱ्या मोदी यांनी पंतप्रधान झाल्यावर नागपूरमध्ये ...

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचार झंझावातात संघभूमी नागपूरला टाळून इतरत्र सभा घेणाऱ्या मोदी यांनी पंतप्रधान झाल्यावर नागपूरमध्ये शासकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने सभा घेतली खरी पण त्यात ना उल्हास होता ना उत्साह. भाषणावरही ‘लाल किल्ल्या’ची छाप होती. विशेष म्हणजे वाजपेयी आणि अडवाणींच्या जाहीर सभेला दिसणारी संघ विचाराची मंडळी या सभेला नव्हती. त्यामुळे त्यांच्यासाठी राखून ठेवलेल्या खुर्च्याही रिकाम्याच राहिल्या. एकीकडे ग्रामीण भागातील (मौदा) सभेला गर्दी होते व शहरात लोकं पाठ फिरवितात हा प्रकार तसा अनाकलनीय आहे. यातून काही प्रश्न निर्माण झाले आहेत. पावसामुळे गर्दी कमी झाली की मोदी संघ मुख्यालयी न गेल्याने नाराज स्वयंसेवकांनीच त्याकडे पाठ फिरविली, पक्षातील अंतर्गत धूसफूस यासाठी कारणीभूत ठरली की मोदींची क्रेझ कमी झाली या सर्व प्रश्नांवर आता दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नाव निश्चित झाल्यापासून तर थेट पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारण्यापर्यंत कायम प्रसिद्धीच्या झोतात राहणाऱ्या मोदी यांचा नागपूरमधील दौरा हा आगळा वेगळा संदेश देणारा तसेच गर्दीचे उच्चांक मोडणारा असेल असा अंदाज होता. काँग्रेसच्या काळात अंतिम टप्प्यापर्यंत गेलेल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे घाईगडबडीत भूमिपूजन करण्याचा घाट हा आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवूनच रचण्यात आला होता. त्यामुळेच भूमिपूजनाचा कार्यक्रम ‘राजकीय’व्हावा यासाठी भाजपची संपूर्ण यंत्रणा दोन आठवड्यापासून कामाला लागली होती. संघाचा गड, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस यांच्या कर्मभूमीत ही सभा होणार होती. मात्र, तरीही सभेला अपेक्षित गर्दी झाली नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांनी याच मैदानावर घेतलेल्या कार्यक्रमाच्या तुलनेत मोदींच्या कार्यक्रमाला झालेली गर्दी निम्मीही नव्हती. त्यामुळेच कदाचित मोदींचे भाषण रंगले नसावे. मात्र तरीही मोदींनी कल्पकतेने सभा जिंकण्याचा प्रयत्न केला.मोदींविषयी जनतेत विशेषत: तरुणांमध्ये आकर्षण होते. मोदी काय बोलतील, याची उत्सुकता होती. मात्र, मोदी नेहमीच्या शैलीत बोलले नाही. सभा जिंकण्याचा सूर त्यांना गवसलाच नाही. कदाचित शासकीय कार्यक्रम असल्यामुळे त्यांनी स्वत:ला सावरले असेल. पण श्रोत्यांना हवे असलेले मोदी या सभेत दिसले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी सभेवर घातलेला बहिष्काराचाही मुद्दाही या सभेच्या निमित्ताने देशभर गाजला. नागपूर सुधार प्रन्यास, महापालिका आणि राज्य शासनाचा मेट्रो रेल्वे प्रकल्पात सहभाग असतानाही राज्याच्या मुख्यमंत्र्यानाच विश्वासात न घेता कार्यक्रम घेणे संकेताला धरून नसल्यानेच त्यावर टीका झाली. त्यामुळेच केंद्रीय नगर विकास मंत्र्यांना नागपूरमध्येच पुण्याच्या मेट्रोला मंजुरी देण्याचे आश्वासन द्यावे लागले. मोदींचे वेगळे रूप या सभेच्या निमित्ताने दिसले. त्यांनी त्यांच्या भाषणात महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाचा आदराने उल्लेख केला. गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त स्वच्छतेची मोहीम राबविण्याचा मानसही त्यांनी संघाच्या भूमीतच व्यक्त केला. यातून मोदी यांनी त्यांची कट्टरवादी प्रतिमा बदलण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न दिसून येतात.(प्रतिनिधी)