शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

बियाण्यांसाठी कुणाची लागणार ‘लॉटरी’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:09 IST

अभय लांजेवार उमरेड : सोयाबीन, कापूस, तूर, भात आदी पिकांच्या उत्पादनात कमालीची घट झाली. बियाणे, खते, औषधी, मजुरी आणि ...

अभय लांजेवार

उमरेड : सोयाबीन, कापूस, तूर, भात आदी पिकांच्या उत्पादनात कमालीची घट झाली. बियाणे, खते, औषधी, मजुरी आणि इतर भरमसाठ खर्च वजा होता खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांचा खिसा खाली झाला. अशातच यंदाच्या हंगामात शासनाने महाडीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’अंतर्गत बियाण्यांच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावयास लावले. आता दाखल अर्जाची लॉटरी पद्धतीने सोडत काढली जाणार आहे. कसेबसे केवळ ८ हजारांच्या आसपास शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केले. लवकरच हंगाम सुरू होणार आहे. बियाणे हातात नाही. अशावेळी बियाण्यासाठी कुणाची लॉटरी लागणार हेसुद्धा माहिती नाही. त्यातही लॉटरी लागली तर लागली, नाही तर पावली. लॉटरीचा हा जुगार सरकार आमच्याशी का खेळत आहे, असा मार्मिक प्रश्न शेतकऱ्यांचा आहे. तालुका स्तरावर अद्याप बियाण्यांच्या लाभाबाबत कोणत्याही प्रकारची सूचना नाही. अधिकाऱ्यांनाही लॉटरी निघणार एवढेच माहीत आहे. अन्य माहितीबाबत कृषी विभागसुद्धा अनभिज्ञ आहे. शेतकरी नंबर कधी लागणार, अशी विचारणा करीत कृषी विभागाला घिरट्या घालत आहेत. राज्य स्तरावर लॉटरी काढली जाणार असल्याचे समजते. अद्याप लॉटरीच निघाली नाही. सर्वप्रथम १५ मे व त्यानंतर २४ मेपर्यंत ऑनलाइन अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. गावखेड्यात शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहोचविण्यात कृषी विभागाला अपयश आले. अनेकांपर्यंत योजनाच पोहोचली नाही. यामुळे गरज असतानाही हजारो शेतकऱ्यांना अर्ज सादर करता आले नाहीत. शिवाय योजनेचा मुहूर्तच उशिराने काढल्या गेला. कोरोनाच्या महामारीमुळे नागपूर जिल्ह्यातून केवळ ७,७९२ शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केला. मोजक्याच शेतकऱ्यांनी अर्ज सादर केल्यानंतरही लॉटरी पद्धतीने सोडत काढणार असल्याचे निर्देश आहेत. लॉटरी निघाल्यानंतरही असंख्य शेतकरी या योजनेच्या बियाण्यांपासून वंचित राहतील. यामुळे शेतकऱ्यांच्या बाबतीत ‘राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला’ ही म्हण तंतोतंत खरी ठरणार आहे. लॉटरी पद्धतीने सोडत निघाल्यावर किती शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल, हेसुद्धा कळणार आहे. दुसरीकडे अर्ज करणाऱ्या सर्वांनाच बियाणे देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

खात्यात नको, कपात करा

महाडीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या सदराखाली यांत्रिकीकरण, सिंचन साधने व सुविधा, फलोत्पादन, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठी शेतकऱ्यांसाठी विशेष योजना आदी मोठ्या निधीच्या योजना आहेत. या योजनांमध्ये मोठे अनुदान असल्याने लॉटरी पद्धत आणि अनुदानाची रक्कम खात्यात वळती करणे, ही बाब योग्य आहे. अशातच बियाण्यांच्या बाबतीतही खात्यात अनुदान वळती होणार आहे. अल्प अनुदानाकरिता बँकेच्या चकरा कशाला, असा सवाल केला जात असून बियाण्यांचे हे अनुदान खात्यात वळती करू नका, ते थेट कपात करूनच रक्कम घ्या, अशी मागणी जोर धरत आहे.

--

लॉटरीत नंबर लागला तर ठीक, नाहीतर कृषी केंद्राकडे शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी धाव घ्यावी लागणार आहे. कागदपत्रे सादर केल्यानंतर, बिल अपलोड झाल्यानंतर मगच या तुटपुंजा अनुदानाची रक्कम खात्यात वळती होईल. केवळ एक-दीड क्विंटलच्या बियाण्यांसाठी एवढी धावपळ शक्य तरी आहे काय?

-नागसेन निकोसे, शेतकरी चांपा, ता. उमरेड