शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
3
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
4
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
5
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
6
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
7
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
8
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
9
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
10
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
11
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
12
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
13
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
14
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
15
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
16
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
17
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
18
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
19
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
20
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान

अधिवेशनात ‘विदर्भ’ मांडणार कोण?

By admin | Updated: December 4, 2014 00:45 IST

राज्यात सत्ताबदल झाल्याने अनेक समीकरणे बदलली आहेत. त्याचे प्रतिबिंब विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही उमटण्याची शक्यता आहे. एरवी विदर्भाच्या मुद्यांवर सरकारला भांडावून सोडणारे

धडधडणाऱ्या तोफा सत्तापक्षात : विरोधकांकडे आक्रमकतेचा अभावनागपूर : राज्यात सत्ताबदल झाल्याने अनेक समीकरणे बदलली आहेत. त्याचे प्रतिबिंब विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही उमटण्याची शक्यता आहे. एरवी विदर्भाच्या मुद्यांवर सरकारला भांडावून सोडणारे विदर्भातील नेते सत्ताधारी झाल्याने व विरोधी बाकांवर बसणाऱ्या विदर्भातील नेत्यांमध्ये आक्रमकतेचा अभाव असल्याने विदर्भात होणाऱ्या अधिवेशनात विदर्भाचे प्रश्न मांडण्यासाठी आवाज बुलंद करणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.नागपूर करारानुसार विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन घेतले जाते. गत १५ वर्षाचा कालखंड पाहिला तर या काळात विरोधी बाकावर असलेले भाजप आणि शिवसेनेचे विदर्भातील सदस्य विदर्भाच्या प्रश्नांवर सरकारला भंडावून सोडत होते तर सत्ताधारी असल्याने विदर्भातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांना आक्रमक होताना मर्यादा येत होत्या. त्यामुळे विधिमंडळातील विदर्भाचा आवाज हा विरोधकच बुलंद करीत असल्याचे चित्र निर्माण होत होते. त्यात विधानसभेत प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश होता. विधान परिषदेत दिवाकर रावते, डॉ. दीपक सावंत, नीलम गोऱ्हे हे विदर्भाबाहेरील सदस्य विदर्भाचे प्रश्न मांडत होते.सत्ता बदल झाल्याने सभागृहातील चित्रही बदलणार आहे. विदर्भाच्या धडधडणाऱ्या तोफा सत्ताधारी बाकांवर बसणार असल्याने त्या शांत होतील पण दुसरीकडे विरोधी बाकांवर बसणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीकडे आक्रमक नेत्यांचा अभाव आहे. विधानसभेत विदर्भातील विदर्भातून काँग्रेस-राष्ट्रवादीचे ११ सदस्य आहेत. त्यापैकी दोन निलंबित आहेत. ९ सदस्यांमध्ये विजय वड्डेट्टीवार, आणि गोपाल अग्रवाल यांचा अपवाद सोडला तर कुणाचीही आक्रमकतेची पार्श्वभूमी नाही. सलग १५ वर्ष सत्तेत गेल्याने त्याचाही परिणाम सध्याच्या विरोधकांवर झाला आहे. यशोमती ठाकूर या काँग्रेसच्या विदर्भातील एकमेव सदस्या आहेत त्या किती तग धरणार याकडेही लक्ष लागले आहे. एकूणच विदर्भाच्या भूमीत होणाऱ्या अधिवेशनात विदर्भातील समस्या आक्रमक मांडणारी फळीच विरोधी बाकांवर नसल्याने सत्ताधाऱ्यांचे फावले आहे. (प्रतिनिधी)