शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
3
IPO मध्ये १ लाख गुंतवले, आता त्याचे राहिले फक्त ₹३,२००; कसं मोठ्या आयपीओंनी बनवलं गुंतवणुकदारांना कंगाल
4
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
5
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
6
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
7
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
8
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती
9
Video - स्टंटगिरी! हिरो बनण्याच्या नादात मर्सिडीज थेट समुद्रात नेली, दलदलीत अडकली अन्..
10
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
11
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
12
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!
13
"आता हे अचानक 'हशणार, बशणार' हे कुठून आलं?", अभिनेत्रीचा 'पुणे'करांना सवाल
14
Shravan 2025: श्रावणात 'या' राशींवर होणार महादेवाची कृपा; बरसणार सुखाच्या श्रावणसरी!
15
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
16
Deep Amavasya 2025: 'या' सोप्या टिप्स कामी येतील, तेलातुपाचे दिवे लख्ख उजळतील!
17
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
18
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
19
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
20
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी

२५० टन कचरा कोण उचलणार

By admin | Updated: September 10, 2015 03:23 IST

स्मार्ट सिटीसाठी निवड करण्यात आलेल्या नागपूर शहरातील लोकांना महापालिकेकडून चांगल्या दर्जाच्या नागरी सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

महापालिका : शहरातील १२०० पैकी ९५० टन कचऱ्याची उचललोकमत विशेषगणेश हुड  नागपूरस्मार्ट सिटीसाठी निवड करण्यात आलेल्या नागपूर शहरातील लोकांना महापालिकेकडून चांगल्या दर्जाच्या नागरी सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. परंतु दररोज शहरातील २५० टन कचरा उचललाच जात नाही. या पासून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असल्याने हा कचरा उचलणार कोण, असा गंभीर प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे. शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, पथदिवे व स्वच्छता यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी मनपाची आहे. परंतु शहरात दररोज १२०० टन कचऱ्याची निर्मिती होते. यातील ९५० टन कचऱ्याची २५० वाहनाव्दारे उचल केली जाते. शहरातील कचरा उचलण्याची जबाबदारी खासगी कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. यासाठी मनपा तिजोरीतून वर्षाला २८ ते ३० कोटीचा निधी खर्च केला जातो. परंतु शहरातील पूर्ण कचरा उचलला जात नसल्याने लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील रस्त्यांची स्वच्छता व कचरा उलण्यासाठी मनपाचे ७ हजार व कनक कंपनीचे १ हजार सफाई कर्मचारी आहेत. परंतु शहरातील २४ लाख लोकसंख्येचा विचार करता सफाई कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. एक कर्मचारी ९०० मीटर रस्ता स्वच्छ करतो. मोठा रस्ता असल्यास ५०० मीटर रस्ता स्वच्छ करतो. शहरातील रस्त्यांचे जाळे विचारात घेता सफाई कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. भांडेवाडी येथे कचऱ्यापासून गांढूळ खत निर्माण करण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. परंतु मागील काही वर्षापासून हा प्रकल्प बंद आहे. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न होत नसल्याचे चित्र आहे. शहरातून दररोज उचलण्यात आलेला ९५० टन कचरा भांडेवाडी येथील कचरा डेपोत आणला जातो. त्याची विल्हेवाट लावण्याची गरज आहे. परंतु यातील १५० ते २०० टन कचऱ्यावर प्रक्रि या केली जाते. उर्वरित कचरा कचरा डेपोत साठवला जातो. प्रक्रिया केल्यानंतर त्यापासून वीटा तयार केल्या जातात. परंतु गोळा केलेल्या सर्व कचऱ्यावर प्रक्रिया होत नाही.भांडेवाडी प्रकल्पाची क्षमता संपलीभांडेवाडी प्रकल्पाची कचरा साठवण्याची क्षमता संपत आली आहे. पर्यायी जागा उपलब्ध न केल्यास पुढील काही वर्षात शहरातून उचल करण्यात आलेल्या कचऱ्याची साठवणूक करण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. या दृष्टीने प्रशासनाने तातडीने प्रयत्न करण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)