शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

२५० टन कचरा कोण उचलणार

By admin | Updated: September 10, 2015 03:23 IST

स्मार्ट सिटीसाठी निवड करण्यात आलेल्या नागपूर शहरातील लोकांना महापालिकेकडून चांगल्या दर्जाच्या नागरी सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

महापालिका : शहरातील १२०० पैकी ९५० टन कचऱ्याची उचललोकमत विशेषगणेश हुड  नागपूरस्मार्ट सिटीसाठी निवड करण्यात आलेल्या नागपूर शहरातील लोकांना महापालिकेकडून चांगल्या दर्जाच्या नागरी सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. परंतु दररोज शहरातील २५० टन कचरा उचललाच जात नाही. या पासून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असल्याने हा कचरा उचलणार कोण, असा गंभीर प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे. शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, पथदिवे व स्वच्छता यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी मनपाची आहे. परंतु शहरात दररोज १२०० टन कचऱ्याची निर्मिती होते. यातील ९५० टन कचऱ्याची २५० वाहनाव्दारे उचल केली जाते. शहरातील कचरा उचलण्याची जबाबदारी खासगी कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. यासाठी मनपा तिजोरीतून वर्षाला २८ ते ३० कोटीचा निधी खर्च केला जातो. परंतु शहरातील पूर्ण कचरा उचलला जात नसल्याने लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील रस्त्यांची स्वच्छता व कचरा उलण्यासाठी मनपाचे ७ हजार व कनक कंपनीचे १ हजार सफाई कर्मचारी आहेत. परंतु शहरातील २४ लाख लोकसंख्येचा विचार करता सफाई कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. एक कर्मचारी ९०० मीटर रस्ता स्वच्छ करतो. मोठा रस्ता असल्यास ५०० मीटर रस्ता स्वच्छ करतो. शहरातील रस्त्यांचे जाळे विचारात घेता सफाई कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. भांडेवाडी येथे कचऱ्यापासून गांढूळ खत निर्माण करण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. परंतु मागील काही वर्षापासून हा प्रकल्प बंद आहे. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न होत नसल्याचे चित्र आहे. शहरातून दररोज उचलण्यात आलेला ९५० टन कचरा भांडेवाडी येथील कचरा डेपोत आणला जातो. त्याची विल्हेवाट लावण्याची गरज आहे. परंतु यातील १५० ते २०० टन कचऱ्यावर प्रक्रि या केली जाते. उर्वरित कचरा कचरा डेपोत साठवला जातो. प्रक्रिया केल्यानंतर त्यापासून वीटा तयार केल्या जातात. परंतु गोळा केलेल्या सर्व कचऱ्यावर प्रक्रिया होत नाही.भांडेवाडी प्रकल्पाची क्षमता संपलीभांडेवाडी प्रकल्पाची कचरा साठवण्याची क्षमता संपत आली आहे. पर्यायी जागा उपलब्ध न केल्यास पुढील काही वर्षात शहरातून उचल करण्यात आलेल्या कचऱ्याची साठवणूक करण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. या दृष्टीने प्रशासनाने तातडीने प्रयत्न करण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)