शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

वाचकांची हमी कोण देणार? कोट्यवधींच्या पुस्तक विक्रीचा बागुलबुवा केवळ संमेलनापुरता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2023 08:00 IST

Nagpur News अ.भा. मराठी साहित्य संमेलनात दरवर्षी उत्सवपूर्ण मेळावा जमतो. दिसायला आणि सांगायला या संमेलनांमधून पुस्तक विक्रीचा कोट्यवधींचा व्यवहार होतो. मात्र, या विक्रीतून अनमोल असा वाचकांची तात्त्विक खरेदी होताना दिसत नाही.

प्रवीण खापरे 

नागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने आयोजित अ.भा. मराठी साहित्य संमेलनात दरवर्षी उत्सवपूर्ण मेळावा जमतो. दिसायला आणि सांगायला या संमेलनांमधून पुस्तक विक्रीचा कोट्यवधींचा व्यवहार होतो. मात्र, या विक्रीतून अनमोल असा वाचकांची तात्त्विक खरेदी होताना दिसत नाही. यंदा ‘विदर्भविषय: सारस्वतीजन्मभू:’ असे घोषवाक्य असलेल्या विदर्भ साहित्य संघाच्या संयोजनात ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान वर्धा येथे ९६वे साहित्य संमेलन होत आहे. तेव्हा या संमेलनातून तरी हा प्रश्न मार्गी लागेल का किंवा त्यासाठी बांधणीपूर्वक प्रयत्न केले जातील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पुस्तकांचा उद्योग ओसरीला

- पुस्तक विक्रीत सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे हा प्रकाशकांचा हा उद्योग ओसरीला लागलेला आहे. लेखक, प्रकाशक, डीटीपी ऑपरेटर, प्रूफरीडर, संपादक, चित्रकार, डिझायनर, बायंडर, विक्रेते अशी साखळी असलेला हा उद्योग आहे. मात्र, डबघाईला जात असलेल्या या उद्योगामुळे या व्यवसायासाठी बँकांकडून कर्जही उपलब्ध होत नसल्याचे ओरड प्रकाशक करत आहेत.

 

शासनाकडूनच विशेष व्यवस्थेची अपेक्षा

- साहित्य संमेलनापुरते पुस्तक विक्रीचा खप वाढतो आणि त्यानंतर विक्री ठप्प पडते. त्यामुळे, आता प्रिंट ऑन डिमांड या पद्धतीने पुस्तकांच्या प्रति आम्हा प्रकाशकांकडून छापल्या जातात. संमेलनातून विदर्भात पुस्तकांची दुकाने वाढल्याचे की पुस्तक विक्री वाढल्याचे आढळत नाही. आता शासनाने जिल्हाधिकारी कार्यालय, सीईओ ऑफिस, एसटी स्टॅण्ड आदी ठिकाणी किमान ५०० चौ. फूट जागा पुस्तक विक्रेत्यांसाठी निश्चित करणे अपेक्षित आहे. शिवाय, पुस्तके खेड्यापाड्यातील वाचकांपर्यंत कशी पोहोचतील, याचा धांडोळा सरकारकडून घेणे गरजेचे आहे.

- अरविंद पाटकर, मनोविकास प्रकाशन, पुणे

प्रकाशक-विक्रेतांना ना परिसंवाद, ना ठरावात जागा!

- संमेलनात पुस्तकांची विक्री होते. मात्र, त्यानंतर सगळेच शांत असते. साहित्य संमेलनात प्रकाशक, लेखक व विक्रेत्यांच्या समस्यांवर परिसंवादही होत नाहीत. प्रकाशकांच्या प्रश्नांना साहित्य संमेलनाच्या ठरावातही जागा मिळत नाही, ही शोकांतिका आहे. मागे ग्रंथालयाबाबत ठराव झाला होता तेव्हा शासनाने सार्वजनिक ग्रंथालयांना पुस्तक खरेदीसाठी अनुदान ७ टक्के केले आहे. मात्र, हे खूप उशिराने आलेले शहाणपण म्हणूयात. ग्रंथालयांसाठी शासनाने जास्तीत जास्त पुस्तके खरेदी केली तर प्रकाशक जगतील.

- चंद्रकांत लाखे, लाखे प्रकाशन, नागपूर

...............

टॅग्स :literatureसाहित्य