शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाचकांची हमी कोण देणार? कोट्यवधींच्या पुस्तक विक्रीचा बागुलबुवा केवळ संमेलनापुरता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2023 08:00 IST

Nagpur News अ.भा. मराठी साहित्य संमेलनात दरवर्षी उत्सवपूर्ण मेळावा जमतो. दिसायला आणि सांगायला या संमेलनांमधून पुस्तक विक्रीचा कोट्यवधींचा व्यवहार होतो. मात्र, या विक्रीतून अनमोल असा वाचकांची तात्त्विक खरेदी होताना दिसत नाही.

प्रवीण खापरे 

नागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने आयोजित अ.भा. मराठी साहित्य संमेलनात दरवर्षी उत्सवपूर्ण मेळावा जमतो. दिसायला आणि सांगायला या संमेलनांमधून पुस्तक विक्रीचा कोट्यवधींचा व्यवहार होतो. मात्र, या विक्रीतून अनमोल असा वाचकांची तात्त्विक खरेदी होताना दिसत नाही. यंदा ‘विदर्भविषय: सारस्वतीजन्मभू:’ असे घोषवाक्य असलेल्या विदर्भ साहित्य संघाच्या संयोजनात ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान वर्धा येथे ९६वे साहित्य संमेलन होत आहे. तेव्हा या संमेलनातून तरी हा प्रश्न मार्गी लागेल का किंवा त्यासाठी बांधणीपूर्वक प्रयत्न केले जातील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पुस्तकांचा उद्योग ओसरीला

- पुस्तक विक्रीत सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे हा प्रकाशकांचा हा उद्योग ओसरीला लागलेला आहे. लेखक, प्रकाशक, डीटीपी ऑपरेटर, प्रूफरीडर, संपादक, चित्रकार, डिझायनर, बायंडर, विक्रेते अशी साखळी असलेला हा उद्योग आहे. मात्र, डबघाईला जात असलेल्या या उद्योगामुळे या व्यवसायासाठी बँकांकडून कर्जही उपलब्ध होत नसल्याचे ओरड प्रकाशक करत आहेत.

 

शासनाकडूनच विशेष व्यवस्थेची अपेक्षा

- साहित्य संमेलनापुरते पुस्तक विक्रीचा खप वाढतो आणि त्यानंतर विक्री ठप्प पडते. त्यामुळे, आता प्रिंट ऑन डिमांड या पद्धतीने पुस्तकांच्या प्रति आम्हा प्रकाशकांकडून छापल्या जातात. संमेलनातून विदर्भात पुस्तकांची दुकाने वाढल्याचे की पुस्तक विक्री वाढल्याचे आढळत नाही. आता शासनाने जिल्हाधिकारी कार्यालय, सीईओ ऑफिस, एसटी स्टॅण्ड आदी ठिकाणी किमान ५०० चौ. फूट जागा पुस्तक विक्रेत्यांसाठी निश्चित करणे अपेक्षित आहे. शिवाय, पुस्तके खेड्यापाड्यातील वाचकांपर्यंत कशी पोहोचतील, याचा धांडोळा सरकारकडून घेणे गरजेचे आहे.

- अरविंद पाटकर, मनोविकास प्रकाशन, पुणे

प्रकाशक-विक्रेतांना ना परिसंवाद, ना ठरावात जागा!

- संमेलनात पुस्तकांची विक्री होते. मात्र, त्यानंतर सगळेच शांत असते. साहित्य संमेलनात प्रकाशक, लेखक व विक्रेत्यांच्या समस्यांवर परिसंवादही होत नाहीत. प्रकाशकांच्या प्रश्नांना साहित्य संमेलनाच्या ठरावातही जागा मिळत नाही, ही शोकांतिका आहे. मागे ग्रंथालयाबाबत ठराव झाला होता तेव्हा शासनाने सार्वजनिक ग्रंथालयांना पुस्तक खरेदीसाठी अनुदान ७ टक्के केले आहे. मात्र, हे खूप उशिराने आलेले शहाणपण म्हणूयात. ग्रंथालयांसाठी शासनाने जास्तीत जास्त पुस्तके खरेदी केली तर प्रकाशक जगतील.

- चंद्रकांत लाखे, लाखे प्रकाशन, नागपूर

...............

टॅग्स :literatureसाहित्य