शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उपराजधानीत काँग्रेसकडून कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 06:00 IST

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उपराजधानीत लढणार तरी कोण, असा प्रश्न चर्चेचा विषय ठरला आहे.

ठळक मुद्देबाहेरचा उमेदवार ‘लॅण्ड’ करण्यास विरोधमतदारसंघातच घेरण्यात अपयश

कमलेश वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यभरातील काँग्रेस- राष्ट्रवादीचे नेते आपल्या गळाला लावणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात घेरण्यासाठी काँग्रेस - राष्ट्रवादीकडून काहीच हालचाली होताना दिसत नाही. गेल्यावेळी लढलेले उमेदवार यावेळी लढायला इच्छुक नाही. बाहेरचा उमेदवार लादला जाऊ नये, अशी भूमिका स्थानिक कार्यकर्त्यांनी घेतली आहे. अशात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उपराजधानीत लढणार तरी कोण, असा प्रश्न चर्चेचा विषय ठरला आहे.२०१४ मध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी १,१३,९१८ मते घेत काँग्रेसचे नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांचा ५८,९४२ मतांनी पराभव केला होता. गुडधे यावेळी येथून लढण्यास इच्छुक नाहीत. त्यांनी पश्चिम नागपूरसाठी अर्ज केला आहे. बहुजन विचार मंचचे संयोजक नरेंद्र जिचकार, जय जवान जय किसान संघटनेने संयोजक प्रशांत पवार यांच्याही नावाची प्रदेश काँग्रेसकडे चर्चा आहे. पण जिचकार यांनीही पश्चिम नागपूरसाठी दावा केला आहे.नागपूर लोकसभा लढलेले माजी खासदार व काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख नाना पटोले व भाजप सोडून काँग्रेसवासी झालेले माजी आमदार आशिष देशमुख यांच्याही नावाची चर्चा आहे. मात्र, हे दोन्ही नेते दुसऱ्याच मतदारसंघांसाठी इच्छुक आहेत.शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांचे समर्थक असलेल्या माजी नगरसेविका रेखा बाराहाते, शहर काँग्रेसचे सचिव किशोर उमाठे यांनी अर्ज केले आहेत. या दोन्ही इच्छुकांनी स्थानिक कार्यकर्त्यालाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी पक्षाकडे केली आहे. पक्षाने बाहेरचा उमेदवार येथे ‘लॅण्ड’ करू नये, तसे झाले तर स्थानिक कार्यकर्त्यांवर अन्याय होईल, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे ऐनवेळी श्रेष्ठींनी वरून उमेदवार दिला तर त्याला स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याचा धोका आहे. शहर अध्यक्ष विकास ठाकरे पश्चिम नागपूरच्या तयारीत व्यस्त आहेत.पक्षाने दोन वर्षांपूर्वी सांगितले असते तर विचार केला असता, अशी भूमिका ठाकरे यांनी घेतली आहे. नागपुरात काँग्रेसमध्ये गटबाजी जोरात आहे. दक्षिण-पश्चिममध्येही ती लपून राहिलेली नाही. त्यामुळे सर्व गटांना चालेल अशा नावाच्या शोधात काँग्रेस आहे.मुख्यमंत्री राज्यभरातील कामात व्यस्त असतानाही लोकसभेच्या निवडणुकीत त्यांच्या मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ५५,११६ मतांची आघाडी मिळाली. मुख्यमंत्र्यांचे पाच वर्षे मतदारसंघाच्या विकासाकडे बारकाईने लक्ष होते. ते न चुकता मतदारसंघातील विकास कामांचा आढावा घेत होते.

टॅग्स :Electionनिवडणूक