शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नागपुरातील  मोकाट जनावरांना आवरणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 23:23 IST

उपराजधानीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असतानाच शहरातील नागरिकांना स्मार्ट दर्जाच्या नागरी सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे. परंतु शहरात तब्बल ५६९ जनावरांचे अवैध गोठे आहेत. अशा गोठ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने शहरात मोकाट जनावरांची समस्या गंभीर बनली आहे.

ठळक मुद्देशहरात ५६९ अवैध गोठे : अपघाताचा धोका वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असतानाच शहरातील नागरिकांना स्मार्ट दर्जाच्या नागरी सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे. परंतु शहरात तब्बल ५६९ जनावरांचे अवैध गोठे आहेत. अशा गोठ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने शहरात मोकाट जनावरांची समस्या गंभीर बनली आहे.गाई व म्हशींचे गोठे उभारण्यासाठी दुग्धविकास विभागाकडून परवानगी घ्यावी लागते. परंतु शहरात परवानगी न घेताच गोठे उभारले जातात. औपचारिकता म्हणून संबंधित गोपालकावर कारवाई केली जाते. कठोर कारवाई होत नसल्याने शहरातील मोकाट जनावरांची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. मोकाट जनावरांना आळा घालण्यासाठी कोंडवाडा शुल्कात दुपटीने वाढ करण्यात आली. परंतु मोकाट जनावरांना पकडण्यासाठी महापालिकेच्या कोंडवाडा विभागाकडे सक्षम यंत्रणा नसल्याने याला आळा बसलेला नाही.अपघाताचा धोकापावसाळ्यात शहराच्या सर्वच भागातील पशुपालक जनावरे मोकळी सोडतात. त्यामुळे शहरात गेल्या काही दिवसात मोकाट जनावरांची संख्या वाढली आहे. रात्रीच्यावेळी वर्दळीच्या रस्त्यावर कोरड्या जागेत जनावरे ठिय्या मांडतात. त्यामुळे अपघात होतात. अनेकदा दुचाकी वाहनचालकांना अपघातामुळे जीव गमवावा लागतो. तसेच जनावरे रस्त्यावरील हिरवळ नष्ट करतात. लावण्यात आलेल्या झाडांनाही यामुळे धोका निर्माण झाला आहे. याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.मनुष्यबळाचा अभावकोंडवाडा विभागातर्फे मोकाट जनावरे पकडून कोंडवाड्यात ठेवली जातात. जनावरे सोडण्याठी पशुपालकांना दंड आकारला जातो. परंतु जनावरे पकडण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ व वाहने नसल्याने या कारवाईला मर्यादा आहेत. त्यामुळे जनावरे मोकाट सोडण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे.पोलीस कारवाई करीत नाहीजनावरे मोकाट सोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कोंडवाडा विभागाने पोलीस विभागाकडे शहरातील शंभराहून अधिक पशुपालकांची यादी पाठविली आहे. परंतु पोलीस विभागाकडून कठोर कारवाई केली जात नाही. त्यामुळे पशुपालकांना कायद्याचाही धाक राहिलेला नाही.कशी होणार स्मार्ट सिटीशहरातील रस्ते सिमेंट क्राँक्रिटचे होत आहेत. शहराच्या सौंदर्यात भर पडावी म्हणून रस्त्यांच्या दुभाजकावर व चौकाचौकात झाडे लावून हिरवळ निर्माण केली जात आहे. परंतु वर्दळीचे रस्ते व चौकाचौकात मोकाट जनावरे दिवसभर ठिय्या मांडतात. हिरवळ नष्ट करतात, अशा परिस्थितीत स्मार्ट सिटी कशी होणार असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcivic issueनागरी समस्या