शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

नागपुरातील  मोकाट जनावरांना आवरणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 23:23 IST

उपराजधानीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असतानाच शहरातील नागरिकांना स्मार्ट दर्जाच्या नागरी सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे. परंतु शहरात तब्बल ५६९ जनावरांचे अवैध गोठे आहेत. अशा गोठ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने शहरात मोकाट जनावरांची समस्या गंभीर बनली आहे.

ठळक मुद्देशहरात ५६९ अवैध गोठे : अपघाताचा धोका वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असतानाच शहरातील नागरिकांना स्मार्ट दर्जाच्या नागरी सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे. परंतु शहरात तब्बल ५६९ जनावरांचे अवैध गोठे आहेत. अशा गोठ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने शहरात मोकाट जनावरांची समस्या गंभीर बनली आहे.गाई व म्हशींचे गोठे उभारण्यासाठी दुग्धविकास विभागाकडून परवानगी घ्यावी लागते. परंतु शहरात परवानगी न घेताच गोठे उभारले जातात. औपचारिकता म्हणून संबंधित गोपालकावर कारवाई केली जाते. कठोर कारवाई होत नसल्याने शहरातील मोकाट जनावरांची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. मोकाट जनावरांना आळा घालण्यासाठी कोंडवाडा शुल्कात दुपटीने वाढ करण्यात आली. परंतु मोकाट जनावरांना पकडण्यासाठी महापालिकेच्या कोंडवाडा विभागाकडे सक्षम यंत्रणा नसल्याने याला आळा बसलेला नाही.अपघाताचा धोकापावसाळ्यात शहराच्या सर्वच भागातील पशुपालक जनावरे मोकळी सोडतात. त्यामुळे शहरात गेल्या काही दिवसात मोकाट जनावरांची संख्या वाढली आहे. रात्रीच्यावेळी वर्दळीच्या रस्त्यावर कोरड्या जागेत जनावरे ठिय्या मांडतात. त्यामुळे अपघात होतात. अनेकदा दुचाकी वाहनचालकांना अपघातामुळे जीव गमवावा लागतो. तसेच जनावरे रस्त्यावरील हिरवळ नष्ट करतात. लावण्यात आलेल्या झाडांनाही यामुळे धोका निर्माण झाला आहे. याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.मनुष्यबळाचा अभावकोंडवाडा विभागातर्फे मोकाट जनावरे पकडून कोंडवाड्यात ठेवली जातात. जनावरे सोडण्याठी पशुपालकांना दंड आकारला जातो. परंतु जनावरे पकडण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ व वाहने नसल्याने या कारवाईला मर्यादा आहेत. त्यामुळे जनावरे मोकाट सोडण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे.पोलीस कारवाई करीत नाहीजनावरे मोकाट सोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कोंडवाडा विभागाने पोलीस विभागाकडे शहरातील शंभराहून अधिक पशुपालकांची यादी पाठविली आहे. परंतु पोलीस विभागाकडून कठोर कारवाई केली जात नाही. त्यामुळे पशुपालकांना कायद्याचाही धाक राहिलेला नाही.कशी होणार स्मार्ट सिटीशहरातील रस्ते सिमेंट क्राँक्रिटचे होत आहेत. शहराच्या सौंदर्यात भर पडावी म्हणून रस्त्यांच्या दुभाजकावर व चौकाचौकात झाडे लावून हिरवळ निर्माण केली जात आहे. परंतु वर्दळीचे रस्ते व चौकाचौकात मोकाट जनावरे दिवसभर ठिय्या मांडतात. हिरवळ नष्ट करतात, अशा परिस्थितीत स्मार्ट सिटी कशी होणार असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcivic issueनागरी समस्या