शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

अक्षयकुमार काळे यांना कुणी दगा दिला?

By admin | Updated: January 9, 2017 02:56 IST

डोंबिवली येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अक्षयकुमार काळे हे

साहित्यविश्वात चर्चेला उधाण : औरंगाबादच्या सत्कार समारंभात व्यक्त केली खंत नागपूर : डोंबिवली येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अक्षयकुमार काळे हे बहुमताने निवडून आले. त्यांचा विजय ऐतिहासिक ठरला. महाराष्ट्रात गडचिरोलीपासून पुण्यापर्यंत व बृहृन् महाराष्ट्रात भोपाळपासून हैदराबादपर्यंत त्यांना एकगठ्ठा मते मिळाली. असे असतानाही ‘विदर्भातील ज्या लोकांना मी जवळचे मानत होतो त्यांनीच मला या निवडणुकीत दगा दिला’, अशी खंत स्वत: डॉ. काळेंनीच व्यक्त केली आहे. मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे औरंगाबाद येथे आयोजित सत्कार समारंभात त्यांनी जाहीररीत्या असे विधान केल्याने मराठी साहित्यविश्व स्तब्ध झाले असून काळेंशी दगाफटका करणारी ती व्यक्ती वा संस्था कोण असेल, याबाबत वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. या समारंभाला ज्येष्ठ विचारवंत डॉ. गंगाधर पानतावणे, मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, रंगनाथ काळे, भाष्यकार महेश खरात अशी सर्व दिग्गज मंडळी उपस्थित होती. त्यांच्यासमोर मनातील खंत व्यक्त करताना डॉ. काळे म्हणाले, ‘मला निवडणुकीची भीती वाटते. साहित्य संमेलनाची निवडणूक लढतानाही ती भीती मनात होतीच. कारण, निवडणूक हा माझा पिंड नाही. पण, या निवडणुकीने मला खूप काही शिकवले. किती माणसे आपल्या पाठिशी आहेत हे कळले. ज्या लोकांना मी जवळचे मानत होतो त्यांनीच मला या निवडणुकीत दगा दिला. मराठवाड्यामुळेच मी संमेलनाचा अध्यक्ष होऊ शकलो’ (प्रतिनिधी) सोशल मीडियावर फिरतोय बातमीचा ‘स्रॅप शॉट’ डॉ. काळेंच्या या धक्कादायक विधानाला काही स्थानिक दैनिकांनी ठळक प्रसिद्धी दिली. त्या बातमीचे ‘स्रॅप शॉट’ सोशल मीडियावर व्हायरल होत अनेक साहित्यिकांच्या इनबॉक्समध्ये जाऊन पडले. आता ते अवघ्या महाराष्ट्रात पसरले असून डॉ. काळेंच्या एकूणच साहित्यिक योगदानाबद्दल काही शंकेचे कारण नसताना त्यांना कुणी व का म्हणून दगा दिला असावा, याची जोरदार चर्चा सुरू आहे. नेमका इशारा कुणाकडे? डॉ. काळेंचे नुसते मताधिक्य पाचशेच्यावर आहे. विदर्भातूनही एकगठ्ठा मते त्यांना मिळाली आहेत. इथे कुणी दगाफटका केला असता तर त्याचा परिणाम मतांच्या टक्केवारीवर नक्कीच झाला असता. पण, तसे काही झाले नाही. तरीही डॉ. काळे असे विधान करीत आहेत तर त्या विधानाला अगदीच नजरेआड करता येत नाही. पण, त्यांचा नेमका इशारा कुणाकडे हे मात्र कळायला मार्ग नाही.