शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

कोण खरे, तावडे की विद्यापीठ प्रशासन ?

By admin | Updated: April 23, 2017 02:50 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती वादात सापडण्याची चिन्हे आहेत.

पदभरतीसंदर्भात संभ्रम : तीन महिन्यांत कशी होणार १०० टक्के पदांची भरती? नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती वादात सापडण्याची चिन्हे आहेत. राज्य शासनाच्या निर्देशांचा हवाला देत प्रशासनाने २३ जागांसाठी जाहिरात काढली. मात्र एकूण पदांच्या ५० टक्के भरतीचा नियम शिक्षण क्षेत्रासाठी लागू नाही, असा दावा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला. अशास्थितीत आता नेमके कोण खरे, असा प्रश्न विद्यापीठ वर्तुळात उत्पन्न होत आहे. विद्यापीठांत सत्रप्रणाली लागू झाल्यामुळे कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला आहे; शिवाय येत्या तीन महिन्यांत मोठ्या प्रमाणावर कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कमीतकमी ५० टक्के रिक्त पदांवर भरती होईल, अशी अपेक्षा होती. मात्र शासनाच्या निर्देशांवर बोट ठेवत केवळ २३ शिक्षकेतर पदांची भरती करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला. राज्य शासनाने पदभरतीसंदर्भात ५० टक्के रिक्त पदांच्या भरतीसंदर्भात जारी केलेल्या दिशानिर्देशांचा हवाला यात अधिकाऱ्यांनी दिला. मात्र वित्त विभागाने वेळोवेळी जारी केलेले पदभरतीचे निर्देश हे शिक्षण व पोलीस विभागाला लागू नव्हतेच, असे विनोद तावडे यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. वित्त विभागाने काही विभागांना अगोदर ७५ टक्के पदभरतीची सूट दिली होती; मात्र नंतर सुधारणा करून ही मर्यादा ५० टक्क्यांवर आणली होती. शिक्षकेतर प्रवर्गात सरळसेवेतील रिक्त पदांच्या ५० टक्के किंवा एकूण मंजूर पदांच्या ४ टक्के यापैकी जे कमी असतील ते भरा, असे शासननिर्देशात नमूद होते. त्यानुसारच प्रक्रिया राबवत असल्याचा दावा विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी केला आहे. तावडे यांनी नागपुरात पदभरतीची मर्यादा कोण खरे, तावडे की विद्यापीठ प्रशासन ? शिक्षण विभागासाठी नाही, असे सांगितले. मंत्र्यांनीच स्पष्टोक्ती केल्यामुळे नागपूर विद्यापीठातील भरतीबाबत विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, याबाबत लेखी निर्देश नेमके कधी देण्यात आले होते, याबाबत तावडे यांनी कुठलीही स्पष्टोक्ती केली नाही. पूर्ण पदभरतीबाबत निर्देश केव्हा? विद्यापीठांची गरज व मागणी लक्षात घेता पुढील तीन महिन्यांत सर्व विद्यापीठांतील रिक्त पदे भरण्यात येतील, अशी घोषणा तावडे यांनी नागपुरात केली. मात्र पदभरतीची प्रक्रिया लक्षात घेता खरोखरच तीन महिन्यांत पदांची भरती शक्य नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यासंदर्भात शासकीय निर्देश जारी करणे आवश्यक आहे. विद्यापीठांना पुढील चार महिन्यांत प्राधिकरणांच्या निवडणुकादेखील घ्यायच्या आहेत. या पार्श्वभूमीवर तावडे यांची घोषणा किती प्रत्यक्षात उतरेल, हा देखील एक मोठा प्रश्न असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले.