शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

अपघात झाल्यास जबाबदार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:11 IST

कळमेश्वर : साहुली (माहुली) बायपासचे काम करताना सार्वजनिक बांधकाम विभागाने मार्गाच्या मधोमध येणारे विजेचे खांब हटविण्यासंबंधी कसलीही कार्यवाही न ...

कळमेश्वर : साहुली (माहुली) बायपासचे काम करताना सार्वजनिक बांधकाम विभागाने मार्गाच्या मधोमध येणारे विजेचे खांब हटविण्यासंबंधी कसलीही कार्यवाही न केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विजेचे खांब न हटवता विनापरवानगी काम केल्याचा आरोप वीज वितरण कंपनीने केला आहे. मात्र या मार्गावरून वाहन चालविताना अपघात होऊन मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे अपघात झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

कळमेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अंतर्गत रस्त्यांचा दर्जा वाढवून रस्तारुंदीकरणासोबतच नव्याने रस्त्याचे बांधकाम करण्यात येत आहे. यात धापेवाडा-घोराड-उपरवाही-लोणारा -गुमथळा-सेलू-कळंबी-साहुली (माहुली) मार्गाचे नव्याने रुंदीकरणाचे काम करण्यात आले. हे काम करीत असताना साहुली गावाला बायपास देण्यात आला. बायपासचे बांधकाम करीत असताना या रुंदीकरणात येणारे विजेचे खांब न हटवीताच मजबुतीकरणाचे काम करण्यात आल्याने रस्त्याच्यामध्ये आलेल्या खांबामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच रस्ता उंच झाल्याने जमिनीपासून वीज तारांचे अंतर कमी झालेले आहे. सदर रस्ता वाहतुकीकरिता सुरू झाला असून, भविष्यात जड वाहनांना तारांचा स्पर्श होऊन अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गावरून गेलेली महावितरणची हायटेन्शन लाइन हटविणे अतिशय गरजेचे आहे.

---

रस्ता रुंदीकरणाचे काम करण्याअगोदरच सार्वजनिक बांधकाम विभागाला महावितरणकडून २५ ऑगस्ट २०२० रोजी वीजखांब हटविण्यासंबंधी पत्रव्यवहार केला आहे. तसेच सदर रस्त्यावरील खांब हटविण्यासंबंधी अंदाजपत्रक बनवून वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यात आलेले आहे.

पंकज होनाडे

उपकार्यकारी अभियंता,

वीज वितरण कंपनी, उपविभाग, कळमेश्वर

---

या मार्गावरील वीज खांब हटविण्यासाठी महावितरण कंपनीने दोन कोटी रुपयांचा खर्च सांगितलेला आहे. परंतु वरिष्ठांनी त्याला अद्याप मंजुरी दिली नाही. वीज वितरण कंपनीने सांगितलेला खर्च फार जास्त आहे. आता नव्याने तीन वीज खांब हटविण्यासंबंधी प्रयत्न सुरू आहे.

- ऋषीकेश राऊत

अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कळमेश्वर

----

साहुली (माहुली) बायपासच्या मधोमध असलेले विजेचे खांब.