शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
8
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
9
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
10
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
11
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
12
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
13
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
14
‘सीएसएमटी’वरील १८ नंबरचा प्लॅटफॉर्म ३ महिने बंद राहणार; १ ऑक्टोबरपासून पायाभूत कामे
15
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
16
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
17
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
18
सत्ता येते-जाते, साहित्यिक संस्थांवर ‘कब्जा’ हवा! मोक्याच्या जागेसाठी लागल्या राजकीय नजरा
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

येचुरींच्या विमानाचे तिकीट कुणी काढले?

By admin | Updated: March 21, 2017 01:41 IST

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस व खासदार सीताराम येचुरी यांचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील कार्यक्रम रद्द करण्यावरून बरेच राजकारण झाले.

कुलगुरूंचा सवाल : प्रशासकीय मान्यता नसल्याचा पुनरुच्चारनागपूर : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस व खासदार सीताराम येचुरी यांचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील कार्यक्रम रद्द करण्यावरून बरेच राजकारण झाले. विद्यापीठाने एक महिना अगोदर विमानाचे तिकीटदेखील पाठविले होते, असा दावा खुद्द येचुरी यांनी केला होता. मात्र जर कार्यक्रमाला प्रशासकीय मान्यताच नव्हती आणि विमान तिकिटाबाबत माझी परवानगीच घेण्यात आली नव्हती, तर मग हे तिकीट नेमके काढले तरी कुणी, असा प्रश्न कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी उपस्थित केला आहे.विद्यापीठाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासनातर्फे १८ व १९ मार्च रोजी दीक्षांत सभागृहात ‘भारतीय लोकशाहीचा ऱ्हास : आव्हाने आणि उपाय’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सीताराम येचुरी यांना मुख्य वक्ते म्हणून बोलावण्यात आले होते. मात्र प्रशासकीय परवानगीच घेतली नसल्याच्या कारणावरून संबंधित कार्यक्रम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचे पत्र जारी करण्यात आले. यावरून विद्यापीठासोबतच आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर होता. सीताराम येचुरी यांनी नागपुरात आल्यानंतर यासंदर्भात टीका केली व विद्यापीठाने मला एक महिनाअगोदर तिकीट का पाठविले, असा प्रश्न उपस्थित केला.याबाबत कुलगुरूंना विचारणा केली असता, ज्या कार्यक्रमाची प्रशासकीय मान्यताच घेण्यात आली नव्हती, त्या कार्यक्रमातील वक्त्यासाठी विमानाची तिकिटे काढण्याचा प्रश्नच येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. कुठल्याही पाहुण्याला बोलविताना साधारणत: रेल्वेगाडीचे तिकीट देण्यात येते. जर विमानाचे तिकीट पाठवायचे असेल तर अगोदर कुलगुरूंची लेखी परवानगी घ्यावी लागते. माझी तर कार्यक्रमासाठीच परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे पाहुण्यांच्या तिकिटाचा तर प्रश्नच येत नाही, असे डॉ.काणे यांनी सांगितले. जर विद्यापीठाने तिकीट काढले नाही, तर येचुरी यांना तिकीट कुणी पाठविले हा मोठा प्रश्नच आहे, असे ते म्हणाले.संबंधित कार्यक्रम हा केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अनुदानातून आयोजित करण्यात आला होता. मात्र नियमानुसार संबंधित निधी विद्यापीठाच्या विकास विभागाच्या माध्यमातून संबंधित शैक्षणिक विभागात जातो. कार्यक्रमाचा नेमका खर्च कसा झाला याचे अंतर्गत ‘आॅडिट’देखील करण्यात येते, अशी माहिती त्यांनी दिली.(प्रतिनिधी)आगलावेंकडून अद्याप खुलासा नाहीदरम्यान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ.प्रदीप आगलावे यांच्याकडून कुलगुरूंनी लेखी खुलासा मागविला होता. अद्यापपर्यंत आपल्याला कुठलाही लेखी खुलासा प्राप्त झालेला नाही, असे कुलगुरूंनी सांगितले. २० फेब्रुवारी रोजी कुलगुरूंना पत्र दिले होते, असा डॉ.आगलावे यांनी दावा केला होता. मात्र अशाप्रकारच्या कुठल्याही पत्राची कार्यालयात नोंदच नाही, असे कुलगुरूंनी सांगितले.