शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

हा कचरा कुणी साफ करायचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 01:22 IST

जेव्हा फटाक्यांचा आनंद आपण लुटतो, तेव्हा त्यापासून निर्माण होणारा कचराही साफ करण्याची आपलीच जबाबदारी आहे ना? मग तो कचरा साफ करताना आपण कुणाची वाट बघतो.

ठळक मुद्देजनजागृतीनंतरही आम्ही उदासीन : जबाबदारी मनपाचीच का?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जेव्हा फटाक्यांचा आनंद आपण लुटतो, तेव्हा त्यापासून निर्माण होणारा कचराही साफ करण्याची आपलीच जबाबदारी आहे ना? मग तो कचरा साफ करताना आपण कुणाची वाट बघतो. शुक्रवारी नागपुरातील अनेक रस्त्यांवर फुटलेल्या फटाक्यांचा कचरा पडून दिसला. लोकांनी आपल्या घरातील परिसर साफ केला. मात्र फोडलेल्या फटाक्यांमुळे झालेला कचरा लोकांनी तसाच सोडून दिला.हे दृश्य शहरातील स्लम, सर्वसामान्य वस्त्यांच्या तुलनेत प्रतिष्ठितांच्या वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून आले. रामदासपेठ, बजाजनगर, वर्धमाननगर, धरमपेठ या भागांमध्ये लोकांनी रात्री फोडलेल्या फटाक्यांचा कचरा रस्त्यावर पडलेला आढळला. काही इमारतींमध्ये परिसर स्वच्छ केलेला आढळला परंतु फटाक्यांचा कचरा रस्त्याच्या कडेला लोटून ठेवला होता. तुलनेत झोपडपट्ट्या व सर्वसामान्य वस्त्यांमध्ये हे दृश्य फारच क्वचित होते. कारण उच्चभ्रू लोकांना फक्त स्वच्छता अभियानातच रस्ते झाडण्याची सवय आहे. मात्र आपल्या घरासमोरच्या रस्त्यावर आपणच केलेला कचरा, साफ करण्याची जबाबदारी मनपाची समजून दुर्लक्ष केल्याचे दिसते. गुरुवारी लक्ष्मीपूजनाला घरोघरी वस्त्यावस्त्यांमध्ये फटाके फुटले. फ्लॅटस्किममध्ये फटाके फोडण्यास जागा नसल्याने, लोकांनी रस्त्यावर येऊन फटाके फोडले. त्यामुळे रस्त्यावर फटाक्यांचा कचरा झाला. शुक्रवारी सकाळपासून मनपाचे सफाई कर्मचारी गल्लोगल्लीत झालेला कचरा साफ करण्यासाठी सकाळपासून लागले. मुख्य रस्त्यांवरील कचरा त्यांनी साफ केला. परंतु कचरा जास्त असल्याने, गल्ल्यांमध्ये ते पोहचू शकले नाही. त्यामुळे कचरा दिवसभर तसाच पडून होता.विशेष म्हणजे फटाक्यांचा झालेला कचरा हासुद्धा घातकच असतो. यात फुटलेल्या फटाक्यांचे कागद, फटाक्यांचे रसायनमिश्रित वेस्टन हेसुद्धा घातकच असतात. याला बारुद लागलेली असते. जनावरे ती खातात. विशेषत: गार्इंनी तो खाल्यास, त्याचा परिणाम दुधावर होतो. दिवाळीच्या निमित्ताने शहरात लाखो टन फटाक्यांचा कचरा होतो. हा कचरा डम्पिंग यार्डमध्ये साठविला जातो. यात न फुटलेले फटाकेही असतात, बारुद असते. त्यामुळे डम्पिंग यार्डमध्ये आग लागण्याची शक्यता असते.