शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

नागपूरकरांचा कौल कुणाला?

By admin | Updated: February 23, 2017 02:07 IST

नागपूर महानगर महानगरपालिका निवडणुकांचा निकाल अवघ्या काही तासांत जाहीर होणार आहे.

मनपा निवडणुकीचा आज निकाल सर्वेक्षणाचा कल भाजपलाच काँग्रेस मारणार का बाजी ? नागपूर : नागपूर महानगर महानगरपालिका निवडणुकांचा निकाल अवघ्या काही तासांत जाहीर होणार आहे. मतदारांचा कौल नेमका कुणाला गेला व कोणता पक्ष मनपात गुढी उभारणार, यावरुन पडदा उठणार आहे. ३८ प्रभागांमधील १५१ जागांच्या मतांची मोजणी गुरुवारी होणार आहे. मनपामध्ये भाजपा ‘हॅटट्रिक’ साधणार की कॉंग्रेसची ‘घरवापसी’ होणार, याकडे राजकीय वर्तुळासोबतच सामान्यांचेदेखील लक्ष लागले आहे. सत्तेच्या सारीपाटावर कुणाचे फासे नेमके सरळ पडतात, हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिष्ठा या निकालात पणाला लागली आहे. भाजपा-शिवसेना यांच्यातील तुटलेली युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीमधील झालेली बिघाडी यामुळे सर्वच प्रभागांत चौरंगी लढतींचे चित्र पहायला मिळाले. शिवाय सर्वच पक्षांत झालेल्या बंडखोरीमुळे अनेक प्रभागांत काट्याची लढत होती. मागील वर्षीच्या तुलनेत अवघ्या दीड टक्क्यांनी वाढलेले मतदान, बंडखोरी, पक्षाअंतर्गत नाराजी इत्यादी मुद्यांवर निकाल अवलंबून राहणार आहे. अनपेक्षित निकाल आल्यास बसपा, ‘एमआयएम’ हे पक्षदेखील राजकीय समीकरणे बदलविण्यास मौलिक भूमिका पार पाडू शकतात. (प्रतिनिधी)