शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अवनीच्या मादा बछड्यास कुणी मारले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:08 IST

संजय रानडे नागपूर : नरभक्षक झाली म्हणून ठार मारण्यात आलेल्या अवनी (टी-१) वाघिणीच्या तीन वर्षीय मादा बछड्याचा शनिवारी रात्री ...

संजय रानडे

नागपूर : नरभक्षक झाली म्हणून ठार मारण्यात आलेल्या अवनी (टी-१) वाघिणीच्या तीन वर्षीय मादा बछड्याचा शनिवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसऱ्या वाघाने जखमी केल्यामुळे त्याच्यावर पेंच व्याघ्र प्रकल्पात उपचार सुरू होते. या बछड्याच्या मृत्यूस कारणीभूत कोण, असा प्रश्न वन्यजीवप्रेमी विचारत आहेत.

या बछड्याला (पीटीआरफ-८४) ५ मार्च रोजी पेंच व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आले होते. दरम्यान, सीमाधिकारावरून दुसऱ्या वाघासोबत संघर्ष झाल्यामुळे हा बछडा गंभीर जखमी झाला होता. त्याला ८ मार्च रोजी पेंच व्याघ्र प्रकल्पातील उपचार केंद्रात आणण्यात आले होते. पांढरकवडा येथील अवनीला दोन बछडे होते. तिला ठार मारण्यात आल्यानंतर वनविभागाला केवळ एका बछड्यास पकडण्यात यश मिळाले होते. त्याचाही आता मृत्यू झाला आहे. या घटनेसाठी वनाधिकारी दोषी असल्याचा आरोप होत आहे.

१३ माणसांची शिकार केल्यामुळे अवनीला नोव्हेंबर-२०१८ मध्ये ठार मारण्यात आले. त्या कारवाईवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. अवनीला एक नर बछडाही होता. वन विभागाला त्यास पकडता आले नाही, पण मादा बछड्याला डिसेंबर-२०१८मध्ये पकडून दोन वर्षे ५.११ हेक्टरच्या बंदिस्त वनात ठेवण्यात आले होते. मादा बछडा मोकळ्या वनात जिवंत राहू शकणार नाही, असा वनाधिकाऱ्यांचा अंदाज होता. परंतु, त्याला आवश्यक प्रशिक्षण दिल्यानंतरही जगता आले नाही. दुसरीकडे नर बछडा मानवी हस्तक्षेपाशिवाय मोकळ्या वनामध्ये यशस्वीपणे जगत आहे. अवनीने मृत्यूपूर्वी दोन्ही बछड्यांना शिकारीचे कौशल्य शिकवले होते. असे असताना मादा बछड्याला दोन वर्षे बंदिस्त वनात ठेवण्याची काय गरज होती, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यावरून तिच्याबाबतीत चुकीचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट होते.

वाघाच्या बछड्याला शिकार करणे शिकवले जाऊ शकते, पण दुसऱ्या प्राण्यासोबत लढणे शिकवले जाऊ शकत नाही. पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या जास्त आहे. या परिस्थितीत या बछड्याला पेंचमध्ये सोडल्यास त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो याकडे वनविभागाने दुर्लक्ष केले. अशा घटना यापूर्वीही घडल्या आहेत. असे असताना तज्ज्ञांच्या समितीने काहीच धडा घेतला नाही. येणाऱ्या काळात ते पुन्हा निसर्ग नियमात हस्तक्षेप करणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.