शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

अवनीच्या मादा बछड्यास कुणी मारले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:08 IST

संजय रानडे नागपूर : नरभक्षक झाली म्हणून ठार मारण्यात आलेल्या अवनी (टी-१) वाघिणीच्या तीन वर्षीय मादा बछड्याचा शनिवारी रात्री ...

संजय रानडे

नागपूर : नरभक्षक झाली म्हणून ठार मारण्यात आलेल्या अवनी (टी-१) वाघिणीच्या तीन वर्षीय मादा बछड्याचा शनिवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसऱ्या वाघाने जखमी केल्यामुळे त्याच्यावर पेंच व्याघ्र प्रकल्पात उपचार सुरू होते. या बछड्याच्या मृत्यूस कारणीभूत कोण, असा प्रश्न वन्यजीवप्रेमी विचारत आहेत.

या बछड्याला (पीटीआरफ-८४) ५ मार्च रोजी पेंच व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आले होते. दरम्यान, सीमाधिकारावरून दुसऱ्या वाघासोबत संघर्ष झाल्यामुळे हा बछडा गंभीर जखमी झाला होता. त्याला ८ मार्च रोजी पेंच व्याघ्र प्रकल्पातील उपचार केंद्रात आणण्यात आले होते. पांढरकवडा येथील अवनीला दोन बछडे होते. तिला ठार मारण्यात आल्यानंतर वनविभागाला केवळ एका बछड्यास पकडण्यात यश मिळाले होते. त्याचाही आता मृत्यू झाला आहे. या घटनेसाठी वनाधिकारी दोषी असल्याचा आरोप होत आहे.

१३ माणसांची शिकार केल्यामुळे अवनीला नोव्हेंबर-२०१८ मध्ये ठार मारण्यात आले. त्या कारवाईवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. अवनीला एक नर बछडाही होता. वन विभागाला त्यास पकडता आले नाही, पण मादा बछड्याला डिसेंबर-२०१८मध्ये पकडून दोन वर्षे ५.११ हेक्टरच्या बंदिस्त वनात ठेवण्यात आले होते. मादा बछडा मोकळ्या वनात जिवंत राहू शकणार नाही, असा वनाधिकाऱ्यांचा अंदाज होता. परंतु, त्याला आवश्यक प्रशिक्षण दिल्यानंतरही जगता आले नाही. दुसरीकडे नर बछडा मानवी हस्तक्षेपाशिवाय मोकळ्या वनामध्ये यशस्वीपणे जगत आहे. अवनीने मृत्यूपूर्वी दोन्ही बछड्यांना शिकारीचे कौशल्य शिकवले होते. असे असताना मादा बछड्याला दोन वर्षे बंदिस्त वनात ठेवण्याची काय गरज होती, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यावरून तिच्याबाबतीत चुकीचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट होते.

वाघाच्या बछड्याला शिकार करणे शिकवले जाऊ शकते, पण दुसऱ्या प्राण्यासोबत लढणे शिकवले जाऊ शकत नाही. पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या जास्त आहे. या परिस्थितीत या बछड्याला पेंचमध्ये सोडल्यास त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो याकडे वनविभागाने दुर्लक्ष केले. अशा घटना यापूर्वीही घडल्या आहेत. असे असताना तज्ज्ञांच्या समितीने काहीच धडा घेतला नाही. येणाऱ्या काळात ते पुन्हा निसर्ग नियमात हस्तक्षेप करणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.