शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीच्या अपयशाचे शिल्पकार कोण ?

By admin | Updated: February 1, 2016 02:57 IST

नागपूरचा समावेश स्मार्ट सिटीमध्ये झाला असता तर नागपुरातील भाजप नेते फेटे बांधून मिरवले असते.

विकास ठाकरे यांचा सवाल : भाजपच्या अकार्यक्षमतेचे सर्टिफिकेट मिळालेनागपूर : नागपूरचा समावेश स्मार्ट सिटीमध्ये झाला असता तर नागपुरातील भाजप नेते फेटे बांधून मिरवले असते. नागपुरात हेवीवेट नेते आणि कर्तबगार अधिकारी असतानाही नंबर हुकला. एकेकाळी टॉप १० मध्ये असलेले नागपूर आता पहिल्या २० मध्येही येऊ शकले नाही. आता या अपयशाचे शिल्पकार कोण, हे महापौरांनी जाहीर करावे, अशी मागणी करीत विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढविला. सोबतच स्मार्ट सिटी करताना जनतेवर किती कर लादल्या जाणार आहे हे आधी जाहीर करावे व त्यानंतर जनमत घेऊनच सुधारित प्रस्ताव सादर करावा, अशी मागणीही त्यांनी केली. स्मार्ट सिटीत नागपूरचा नंबर हुकल्यावरून ठाकरे यांनी पत्रकार परिषद धेत सत्ताधाऱ्यांवर नेम साधला. ठाकरे म्हणाले, गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे दोन हेवीवेट नेते नागपुरातील आहेत. त्यामुळे नागपूरचा नंबर लागेल अशी अपेक्षा होती. नागपूरचा नंबर लागला असता तर महापौर प्रवीण दटके यांनी क्रेडिट घेतले असते. भाजप नेत्यांचे फेटे घातलेले होर्डिंग लागून सत्कार सोहळे झाले असते. विरोधी पक्ष म्हणून आम्ही पूर्वीच विरोध केला असता तर या अपयशाचे खापर आमच्यावर फोडण्यात आले असते. आता या अपयशासाठी जबाबदार कोण, केंद्र सरकारमध्ये आपसातील लढाईमुळे नागपूर कटले का, महापालिकेचा प्रस्तावच दुबळा होता का याची कारणे महापौरांनी जनतेला द्यावी. महापालिकेची विशेष सभा घेऊन तीत या विषयावर चर्चा करावी, अशी मागणी त्यांनी केली. ठाकरे म्हणाले, गेली नऊ वर्षे महापालिकेत भाजपची सत्ता आहे. या नऊ वर्षात स्टारबस घोटाळा, पाणीपुरवठ्यात घोटाळा, कचरा घोटाळा, दहन घाट लाकूड घोटाळा, असे अनेक घोटाळे झाले. जेएनएनयुएमआर अंतर्गत महापालिकेला १९ प्रकल्प मिळाले. पण महापालिकेने एकही काम बरोबर केले नाही. केंद्राच्या पैशाचा अपव्यय करण्यात आला. अंकेक्षण अहवालात यावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. कदाचित या घोटाळ्यांची दखल घेऊन नागपूरचा नंबर कटला असावा, अशी शंका व्यक्त करीत महापालिकेला नऊ वर्षातील अकार्यक्षमतेचे सर्टिफिकेट मिळाले असल्याची टीका त्यांनी केली.(प्रतिनिधी)कर किती वाढेल ते आधी सांगाठाकरे म्हणाले, केंद्रीय नगर विकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी स्मार्ट सिटीसाठी अधिक कर भरावा लागेल, असे सूतोवाच केले आहे. आधीच नागपूरकर ओसीडब्ल्यूचे वाढीव पाण बिल, मालमत्ता करात झालेली वाढ, विजेचे अवास्तव बिल यामुळे त्रस्त आहेत. अशात स्मार्ट सिटीच्या नावावर नागपूरकरांवर आणखी एक कर लादला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी करण्यापूर्वी जनतेच्या खिशातील किती पैसे उकळले जातील, त्यांना किती वाढीव कर भरावा लागेल हे आधी जाहीर करावे. त्यानंतर महापालिका प्रशासनाने जनमत घ्यावे. त्यानंतरही जनता तयार असेल तरच प्रस्ताव पाठवावा, अशी मागणीही त्यांनी केली. नासुप्र बरखास्त केल्यास कस्तूरचंद पार्कवर सत्कार स्मार्ट सिटीच्या अपयशाचे खापर नासुप्रवर फोडणे चुकीचे आहे. प्रस्ताव महापालिकेने सादर केला होता. त्यामुळे सर्वस्वी जबाबदारी महापालिकेची आहे. महापौर नासुप्रच्या बरखास्तीसाठी पाठपुरावा करू म्हणतात. पण आता तर भाजपचेच मुख्यमंत्री आहेत. तेतीन दिवसात नासुप्र बरखास्त करू शकतात. राज्य सरकारने खरोखरच नासुप्र बरखास्त करून दाखविली तर आपण भाजप नेत्यांचा कस्तुरचंद पार्कवर सत्कार करू, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.