शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

कुजबूजसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:07 IST

कोरोनामुळे प्लॅटफार्मवर गर्दी होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने प्लॅटफार्म तिकिटाचे दर १० रुपयांवरून ५० रुपये केले. प्रवाशांची तपासणी करूनच ...

कोरोनामुळे प्लॅटफार्मवर गर्दी होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने प्लॅटफार्म तिकिटाचे दर १० रुपयांवरून ५० रुपये केले. प्रवाशांची तपासणी करूनच त्यांना रेल्वेस्थानकात सोडण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी केलेली धडपड कुणीही समजू शकतो. परंतु प्रसारमाध्यमांना रेल्वेस्थानकात जाण्यास बंदी घालून रेल्वे प्रशासन काय साध्य करत आहे, हे मात्र समजण्याच्या पलीकडे आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने हा तुघलकी निर्णय लागू करून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना रेल्वेस्थानकात प्रवेश देऊ नका, असा आदेशच दिला आहे, तर दुसरीकडे मात्र चोरटे बिनधास्त रेल्वेस्थानकाच्या परिसरात प्रवेश करून प्रवाशांच्या महागड्या साहित्यावर डल्ला मारत आहेत. रेल्वेस्थानकातील अव्यवस्थेवर बोट ठेवून प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रसारमाध्यमे वृत्तांकन करतात. मात्र प्रसारमाध्यमांच्या रेल्वेस्थानकावरील बंदीबाबत आग्रही भूमिका घेत असतानाच रेल्वेस्थानकात सहज प्रवेश करीत असलेल्या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी रेल्वे प्रशासन भूमिका का घेत नाही ? अशी कुजबूज उपराजधानीतील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींमध्ये सुरू आहे.

-दयानंद पाईकराव

...................