शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
5
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
6
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
7
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
8
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
9
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
10
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
11
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
12
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
13
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
14
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
15
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
16
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
17
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
18
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
19
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
20
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय

लढाईच्या काळात कुठे होता ?

By admin | Updated: April 23, 2017 03:10 IST

नागपुरात महापालिकेच्या निवडणुकीत बलाढ्य भाजपाशी टक्कर होती. त्यामुळे पक्षाकडून रसद मिळेल,

संतप्त शिवसैनिकांचा तानाजींना सवाल : चिंतन बैठकीत ‘रसद’ न मिळाल्याची नाराजी नागपूर : नागपुरात महापालिकेच्या निवडणुकीत बलाढ्य भाजपाशी टक्कर होती. त्यामुळे पक्षाकडून रसद मिळेल, ताकद मिळेल, दिग्गज नेते प्रचारात उतरतील, निवडणूक अंगावर घेतील, अशी अपेक्षा होती. मात्र, असे काहीच घडले नाही. शिवसैनिक एकट्याच्या बळावर लढला. लढाईच्या काळात आपल्यासह नेते कुठे होते, असा संतप्त सवाल शिवसैनिकांनी संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांना केला. महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेनेचे संपर्क प्रमुख आ. तानाजी सावंत यांनी गणेशपेठेतील कार्यालयात बैठक घेत चिंतन केले. बैठकीला जिल्हा प्रमुख सतीश हरडे, माजी खासदार व सहसंपर्कप्रमुख प्रकाश जाधव, शेखर सावरबांधे, शहर प्रमुख मंगेश काशीकर, नगरसेवक किशोर कुमेरिया, माजी नगरसेवक बंडू तळवेकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत उमेदवारांसह काही पदाधिकाऱ्यांना बोलण्याची संधी देण्यात आली. या वेळी काहींनी निवडणूक काळात नेत्यांनी उमेदवारांना वाऱ्यावर सोडल्याची तर काहींनी चुकीच्या व्यक्तींना उमेदवारी देण्यात आल्याची तक्रार केली. पावणेतीन वर्षांपासून पक्षाची कार्यकारिणी नाही. अशात पक्षाचे काम चालणार कसे, असा सवालही काहींनी केला. सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर आ. सावंत म्हणाले, नागपूरच्या निवडणुकीसाठी दोन खासदार व दोन मंत्र्यांवर जबाबदारी सोपवा. त्यांना नागपुरातून हलू देऊ नका, अशी विनंती आपण पक्षप्रमुखांकडे केली होती. मात्र, निवडणुकीच्या काळात नागपुरात मदतीसाठी कुणीच आले नाही ही वास्तविकता आहे. निवडणुकीच्या १५ दिवसांपूर्वी आपल्यावर संंपर्क प्रमुखाची जबाबदारी आली. निवडणूक काळात पुणे, धारशिव, म्हाडा, पंढरपूर आदी ठिकाणचीही जबाबदारी होती. त्यामुळे नागपूरकडे फारसे लक्ष देता आले नाही, अशी कबुलीही त्यांनी दिली. दुसरीकडे भाजपामध्ये केंद्रीय नेतृत्वापासून ते बुथ स्तरापर्यंतचे कार्यकर्ते ताकदीने कामाला लागले होते. शिवसेनेला कुणी वाली नाही. येथे काहीच हालचाली दिसत नाही. हे लक्षात आल्यावर काठावरील मतदार भाजपाकडे वळला व असा निकाल आला. आपला उमेदवार निवडून येत नाही म्हणून शिवसैनिकाने दुसऱ्याला मतदान करायचे का, असा सवाल करीत अशा गद्दारांची नावे सुचवा मी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवतो, असा इशाराही त्यांनी दिला.(प्रतिनिधी) एबी फॉर्म वेळेत का पोहचले नाहीत? महापालिकेच्या प्रभागांच्या यादीत पहिल्याच पानावर प्रभाग क्रमाक १ येतो. हा अतिशय महत्त्वाचा प्रभाग असताना येथे शिवसेनेच्या चारही उमेदवारांचे ए-बी फॉर्म वेळेवर का पोहचले नाहीत, असा सवाल प्रभागप्रमुख आशीष घाडगे यांनी केला. या प्रभागात मुख्यमंत्र्यांचे खासमखास विक्की कुकरेजा हे भाजपाकडून मैदानात होते. त्यांना मदत व्हावी म्हणून असे करण्यात आले का, असा प्रश्न उपस्थित करीत या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. नितीन सोळंके यांनी चुकीच्या पद्धतीने तिकीट वाटप केल्याचा आरोप केला. तर सुरेश मटकरी म्हणाले, आपण जुने निष्ठावंत शिवसैनिक असतानाही प्रभाग २ मध्ये आपल्याला डावलून दुसऱ्याला तिकीट देण्यात आले. त्यामुळे मी अपक्ष लढलो पण शिवसेनेने तिकीट दिलेल्या त्या उमेदवारापेक्षा जास्त मते घेतली. असे चुकीचे तिकीट वाटप करणाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली. तीन हजारांची लीड सांगणाऱ्यांचे डिपॉझिट का गेले ? संपर्कप्रमुख सावंत यांनी कार्यकर्त्यांचे ऐकून घेतले. मात्र, नंतर आपल्या भाषणातून कानउघाडणीही केली. ते म्हणाले, निवडणुकीपूर्वी अनेकजण भेटायचे. अमूक प्रभागातून आपण तीन हजाराने निवडून येतो, असा दावा करायचे. निकालानंतर मात्र त्यांचे डिपॉझिट गेले. अनेकांना दखलपात्र मतेही मिळाली नाहीत. हे असे का घडले यावर संबंधितांनी आत्मचिंतन करण्याची गरज सावंत यांनी व्यक्त केली.