शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पाेलीस गेले तरी कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:08 IST

नितीन नागपुरे लाेकमत न्यूज नेटवर्क जलालखेडा : नागपूर-अमरावती मार्गावरील जलालखेडा (ता. नरखेड) गावाशी परिसरातील ४० गावांमधील नागरिकांचा संपर्क येताे. ...

नितीन नागपुरे

लाेकमत न्यूज नेटवर्क

जलालखेडा : नागपूर-अमरावती मार्गावरील जलालखेडा (ता. नरखेड) गावाशी परिसरातील ४० गावांमधील नागरिकांचा संपर्क येताे. या पाेलीस ठाण्यात ३५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे. यात वाहतूक शाखेचाही समावेश आहे. आठवडी बाजाराच्या दिवशी (शुक्रवार) येथील मुख्य मार्गावर वाहतूक काेंडी हाेत असून, ती अपघातांना कारणीभूत ठरत आहे; मात्र वाहतूक पाेलीस राेडवर शाेधूनही दिसत नाहीत. हा प्रकार दाेन महिन्यापासून सुरू असल्याने वाहतूक पाेलीस नेमके गेले तरी कुठे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

राज्य शासनाच्या आदेशान्वये १५ जुलैपासून इयत्ता ८ ते १२ वीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची वर्दळ वाढली आहे. नागपूर-अमरावती मार्ग गावाच्या मध्यभागातून गेला असून, रहदारीमुळे विद्यार्थ्यांना राेड ओलांडणे धाेकादायक झाले आहे. येथील आठवडी बाजारात शुक्रवारी परिसरातील ३० गावांमधील नागरिक खरेदी-विक्रीसाठी येत असल्याने राेडवरील गर्दीत आणखी भर पडते. नागरिक त्यांची वाहने मुख्य मार्गालगत उभी करीत असल्याने राेड ओलांडणे शक्य हाेत नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

या मार्गावरील बसस्थानक चाैकात वाहने व नागरिकांची गर्दी अधिक असल्याने वाहतूक नियंत्रित करण्यासाठी या ठिकाणी वाहतूक पाेलिसांची नियुक्ती करणे गरजेचे आहे. याबाबत पाेलीस अधिकाऱ्यांना वेळाेवेळी सूचना दिली; मात्र काहीही उपयाेग झाला नाही, असा आराेप विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. संभाव्य धाेका टाळण्यासाठी ही समस्या वेळीच साेडविण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.

...

रुंदीकरणामुळे वाहनांचा वेग अनियंत्रित

नागपूर-काटाेल-जलालखेडा-वरुड-अमरावती या मार्गाचे रुंदीकरण व सिमेंटीकरणाचे काम करण्यात आले आहे. जलालखेडा येथे या मार्गाला दुभाजक तयार केले आहेत. त्यामुळे नागपूरहून अमरावती आणि अमरावतीहून नागपूरच्या दिशेने धावणाऱ्या बहुतांश वाहनांचा वेग अधिक असताे. या अनियंत्रित वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. काही दिवसांपूर्वी जलाखेडा येथे झालेल्या अपघातात दाेघांचा मृत्यू झाला तर काही जण गंभीर जखमी झाले.

...

दीपक डेकाटे यांची पुन्हा नियुक्ती करा

दीपक डेकाटे यांची जलालखेडा पाेलीस ठाण्याच्या ठाणेदारपदी वर्षभरापूर्वी नियुक्ती करण्यात आली हाेती. काेराेना संक्रमण काळात त्यांनी भरीव कामगिरी केली हाेती. परिसरातील अवैध धंद्यांवरही त्यांनी नियंत्रण मिळविले हाेते. त्यांची नागपूर शहरात बदली करण्यात आल्यानंतर परिस्थिती जैसे थे झाली आहे. त्यामुळे या भागातील गुन्हेगारांवर वचक निर्माण करणाऱ्या दीपक डेकाटे यांची पुन्हा ठाणेदारपदी नियुक्ती करावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.

300721\2308img_20210730_155344.jpg

फोटो ओळी. मुख्य रस्त्यावर लागलेली गाड्यांची पार्किंग.